शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग तिसऱ्या दिवशीही धुमसतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 17:59 IST

मुंबईतील कंपनीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न

मडगाव: सोनसडो कचरा यार्डाला लागलेली आग सतत तिसऱ्या दिवशीही धुमसत राहिल्याने या भागात प्रचंड धुराचे लोट पसरले आहेत. त्यामुळे स्थानिक हैराण होऊन त्यांनी पालिका प्रशासनाला याबाबत जबाबदार धरले. दरम्यान ही आग आटोक्यात आणण्यासाठी मुंबईच्या ट्रंकविल स्पेशालिटी या कंपनीचे सहकार्य घेतले असून रेन्झाईम रसायनाचा पाणी मिश्रीत फवारा मारुन ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु होता.

सोमवारी दुपारी ही आग लागली होती. या कचरा यार्डात कचऱ्याच्या प्रचंड राशी असून त्या कचऱ्याने पेट घेतल्याने मागचे तीन दिवस ही आग धुमसत आहे. ही आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन हजार लिटर रेन्झाईम रसायन मुंबईहून मागवण्यात आले आहे.स्थानिक आमदार व उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी बुधवारी घटनास्थळाला भेट देऊन स्थितीची पहाणी केली. यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन दिवस आग धुमसत आहे आणि अद्याप त्यावर तोडगा निघत नाही याबद्दल स्थानिकांनी प्रशासनाला जबाबदार धरले.

अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे, या यार्डातील कचऱ्याची रास बरीच मोठी असल्यामुळे आणि दुपारच्या वेळेस वारा वाहत असल्यामुळे आग आटोक्यात आणणे अडचणीचे ठरत आहे. अशातच सगळ्या परिसरात धुराचे साम्राज्य पसरल्याने स्थानिकांना समस्यांना सामोर जावे लागत आहे.  

टॅग्स :fireआगgoaगोवा