शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

फेरीबोट भाडेवाढ निर्णय मागे; मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 08:44 IST

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाडेवाढीमुळे जनतेचा रोष परवडणार नाही, याची जाणीव झाल्याने सत्ताधारी भाजपमध्येही भाडेवाढीच्या प्रश्नावर नाराजी होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : फेरीबोट भाडेवाढप्रश्नी लोकदबाव तसेच खुद्द सत्ताधारी पक्षाने केलेला हस्तक्षेप यामुळे सरकार अखेर बॅकफूटवर आले असून, तिकीट दरवाढ व दुचाकी वाहनांना लागू केलेले शुल्क मागे घेण्यात आले आहे.

लोकसभा निवडणूक तोंडावर असताना भाडेवाढीमुळे जनतेचा रोष परवडणार नाही, याची जाणीव झाल्याने सत्ताधारी भाजपमध्येही भाडेवाढीच्या प्रश्नावर नाराजी होती. काही आमदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे नाराजी व्यक्त केली. भाडेवाढीच्या प्रश्नावर विविध राजकीय पक्ष मैदानात उतरले होते. गोवा फॉरवर्डने आठ दिवसांची मुदत दिली होती. काँग्रेस आक्रमक झाला होता. तसेच आपनेही निदर्शने चालू केली होती. आरजीचे प्रमुख मनोज परब यांनी नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांना खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. एकूणच लोकदबाव वाढू लागला. सरकारमध्ये घटक असलेल्या मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनीही दुचाकी वाहनांना फेरीबोट तिकीट माफीची सवलत चालूच ठेवावी अशी मागणी रविवारी केली होती. 

या सर्व पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याशी संपर्क साधून भाडेवाढ तसेच दुचाकी वाहनांना लागू केलेले तिकीट मागे घ्यावे, असे आवाहन केले व दोघांनीही ते मान्य केले. तानावडे यांच्याकडे या प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री व नदी परिवहनमंत्र्यांकडे माझे बोलणे झालेले आहे. या प्रश्नावर लोकभावना काय आहेत, हे मी दोघांनाही सांगितले आहे. भाडेवाढ व दुचाकी वाहनांचे शुल्क मागे घेतले जाईल. नदी परिवहन खात्यातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सुधारित अधिसूचना काढली जाणार आहे.

सोपस्कार सुरू 

वाढत्या दबावामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अखेर भाडेवाढप्रश्नी हस्तक्षेप केला. सावंत सध्या निवडणूक प्रचारानिमित्त तेलंगणामध्ये आहेत. परंतु, त्यांच्या कार्यालयातून नदी परिवहन खात्याला भाडेवाढ अधिसूचना मागे घेण्यासंबंधी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आता सोपस्कार सुरू झाले असून, १६ नोव्हेंबरपासून भाडेवाढ लागू करणारी पूर्वीची अधिसूचना आता रद्द केली जाणार आहे.

सामान्यांवर बोजा नको: मायकल लोबो

मायकल लोबो यांनीही सरकारने दुचाकी वाहनांना असलेली मोफत फेरीबोट सेवा चालूच ठेवावी, अशी मागणी केली. बेटांवर राहणारे लोक दिवसाकाठी तीन ते चार वेळा फेऱ्या मारतात. प्रत्येक वेळी दुचाकी वाहनांसाठी दहा रुपये पंडवडणारे नाहीत. गरीब, सर्वसामान्यांसाठी पूर्वी सरकारने दिलेली सवलत चालूच राहायला हवी.

४० टीसींना अतिरिक्त ठरवण्याचा प्रस्ताव?

सध्या खात्याकडे ४० तिकीट कलेक्टर आहेत. त्यांच्या वेतनावर महिना २० लाख याप्रमाणे वर्षाला २.५० कोटी खर्च केले जातात. फेरीबोटीत चारचाकींना शुल्क आकारले जाते. त्यातून वर्षाकाठी ७० लाख रुपये महसूल मिळतो. असा एक प्रस्ताव चर्चेत आहे की, फेरीबोट सेवा चारचाकी वाहनांनाही मोफत करावी. ४० टीसींना अतिरिक्त ठरवून अन्य खात्यांत पाठवल्यास वर्षांचे किमान १.५० कोटी वाचतील. दुचाकी वाहनांना तिकीट लागू करण्याची किंवा भाडेवाढ करण्याची गरज भासणार नाही. या प्रस्तावावर नजीकच्या काळात गंभीरपणे विचार होऊ शकतो. २००२ साली दिवंगत पर्रीकर मुख्यमंत्री असताना त्यांनी नदी परिवहन खात्यातील ५० टीसींना अतिरिक्त ठरवून अन्य खात्यांमध्ये पाठवले होते. त्यापैकी काहीजण गोमेकॉत तसेच इतर खात्यांमध्ये काम करत आहेत.

 

टॅग्स :goaगोवा