शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
2
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
3
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
4
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
6
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
7
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
8
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
9
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
10
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
11
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
12
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
13
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
14
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
15
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
16
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
17
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
18
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
19
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...
20
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजना बंद झाल्याची चर्चा? शालेय शिक्षण विभागाने दिली अशी माहिती

वडील रात्रभर फोन करत होते, सकाळी हॉस्टेलमध्ये आढळला मुलाचा मृतदेह; घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 08:52 IST

रात्रीपासून वडील फोन करत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांना मुलगा गेल्याची माहिती मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : साकवाळ-वेर्णा येथील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये काल, शनिवारी आणखी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली. या कॅम्पसमधील वसतीगृहाच्या खोलीत काल २० वर्षीय कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. शुक्रवारी रात्रीपासून कुशाग्रचे वडील त्याला फोन करत होते. मात्र, दुसऱ्या दिवशी त्यांना मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाली.

पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास कुशाग्रचा मृत्यू झाल्याचे उघड झाले. कुशाग्रचे वडील शुक्रवारी रात्रीपासून त्याला मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. शनिवारी सकाळी कुशाग्र त्याच्या खोलीतून बाहेर आला नसल्याचे काही विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावण्यास सुरुवात केली. बराचवेळ कुशाग्र दरवाजा उघडत नसल्याने काही जणांनी जोर लावून खोलीचा दरवाजा उघडला असता खोलीतील पलंगावर कुशाग्र मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. 

या घटनेची माहिती वेर्णा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनेचा पंचनामा केला. कुशाग्र इकॉनॉमिक्स अॅण्ड कम्प्युटर सायन्सच्या तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आहे. सध्या तरी या मृत्यू मागचे कारण स्पष्ट नसले तरी पोलिस तपास करत आहेत.

वेर्णा पोलिसांना घटनास्थळाची पाहणी करून चौकशीला सुरुवात केली आहे. तसेच फोरेंन्सिक पथकानेही घटनास्थळाला भेट दिली असून त्यांनी तपास कार्य केले. कुशाग्रचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच त्याचे वडील आणि कुटुंबातील अन्य सदस्य उत्तर प्रदेश येथून गोव्यात पोचल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्याकडून मिळाली. कुशाग्र याचा मृतदेह शवचिकित्सेसाठी पाठवून देण्यात आला आहे. अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

९ महिन्यांत चार मृत्यू, त्यातील तीन आत्महत्या

गेल्या ९ महिन्यांत बिट्स पिलानीमध्ये चार विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. पहिल्या तीन घटनेत तिन्ही विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी दिली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये कॅम्पसमध्ये आत्महत्येची पहिली घटना घडली. त्यानंतर मार्च २०२५, मे २०२५ मध्ये आत्महत्येची घटना घडली.

अभ्यासक्रमाचा फेरविचार करा : युरी आलेमाव

अभ्यासाच्या दडपणामुळे गेल्या तीन वर्षात नऊ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुहे सरकारने अभ्यासक्रमांचा फेरविचार करून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. बिट्स पिलानीमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या संस्थेव्यतिरिक्त राज्यात आणखी पाच घटना घडल्या आहेत, ज्यात बोर्डाच्या परीक्षेचा ताण, कमी गुणांमुळे नैराश्य आल्याने विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आम्हाला विद्यार्थ्यांकडून अचूक कारणे शोधणे आवश्यक आहे, अभ्यासक्रम कठीण आहे का आणि त्याबाबत जाणून घेतले पाहिजे. सरकारने तातडीने कार्यवाही करावी, असेही आलेमाव म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी