शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

संजीवनी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

By आप्पा बुवा | Updated: December 22, 2023 16:59 IST

संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले.

अप्पा बुवा,फोंडा : संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले. कारखाना बंद करताना तो कायमस्वरूपी बंद राहील असे सांगण्यात आले नव्हते. कारखाना बंद करताना ऊस उत्पादकांना विश्वासात घेतले नाही. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चांगला असून, याबाबतीत सरकारने नक्की काय ते सांगावे, अन्यथा दोन जानेवारीपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.

शुक्रवारी संघटनेची बैठक कारखान्याच्या आवारात झाली. बैठकीत ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात इथेनॉल प्रकल्पासंबंधी ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी सरकारला मुदत दिली होती. परंतु सरकारने अजून धोरण जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चार वर्षांपूर्वी कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना थातूरमातूर प्रस्ताव देण्यात आले. ऊस उत्पादन होणार नसल्याचे लक्षात येतात शेतकऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी काही कंपन्या सरकारच्या नजरेस आणून दिल्या. परंतु सरकारने चालढकल केली आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने सुविधा समितीची नियुक्त केली. त्या समितीलासुद्धा शेतकऱ्यांचे काहीच देणे-घेणे नाही. प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी तयार असताना राज्य सरकार धोरण स्पष्ट करण्यास पुढे येत नाही. 

२ जानेवारीपासून आंदोलन :

राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षात ऊस उत्पादकांना आंदोलनच करावे लागत आहे. राज्यातील काही भागात फक्त ऊस लागवड चांगल्या प्रमाणात होऊ शकते. त्यातून अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल. सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने ऊस उत्पादकांनी २ जानेवारीपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :goaगोवाFarmer strikeशेतकरी संप