शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

संजीवनी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

By आप्पा बुवा | Updated: December 22, 2023 16:59 IST

संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले.

अप्पा बुवा,फोंडा : संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले. कारखाना बंद करताना तो कायमस्वरूपी बंद राहील असे सांगण्यात आले नव्हते. कारखाना बंद करताना ऊस उत्पादकांना विश्वासात घेतले नाही. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चांगला असून, याबाबतीत सरकारने नक्की काय ते सांगावे, अन्यथा दोन जानेवारीपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.

शुक्रवारी संघटनेची बैठक कारखान्याच्या आवारात झाली. बैठकीत ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात इथेनॉल प्रकल्पासंबंधी ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी सरकारला मुदत दिली होती. परंतु सरकारने अजून धोरण जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चार वर्षांपूर्वी कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना थातूरमातूर प्रस्ताव देण्यात आले. ऊस उत्पादन होणार नसल्याचे लक्षात येतात शेतकऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी काही कंपन्या सरकारच्या नजरेस आणून दिल्या. परंतु सरकारने चालढकल केली आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने सुविधा समितीची नियुक्त केली. त्या समितीलासुद्धा शेतकऱ्यांचे काहीच देणे-घेणे नाही. प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी तयार असताना राज्य सरकार धोरण स्पष्ट करण्यास पुढे येत नाही. 

२ जानेवारीपासून आंदोलन :

राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षात ऊस उत्पादकांना आंदोलनच करावे लागत आहे. राज्यातील काही भागात फक्त ऊस लागवड चांगल्या प्रमाणात होऊ शकते. त्यातून अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल. सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने ऊस उत्पादकांनी २ जानेवारीपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :goaगोवाFarmer strikeशेतकरी संप