शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

संजीवनी साखर कारखान्यासमोर शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा 

By आप्पा बुवा | Updated: December 22, 2023 16:59 IST

संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले.

अप्पा बुवा,फोंडा : संजीवनी साखर कारखान्याबाबत सरकारने कधीच ठोस भूमिका घेतली नाही. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नेहमीच अंधारात ठेवले. कारखाना बंद करताना तो कायमस्वरूपी बंद राहील असे सांगण्यात आले नव्हते. कारखाना बंद करताना ऊस उत्पादकांना विश्वासात घेतले नाही. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्याचे गाजर दाखवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चांगला असून, याबाबतीत सरकारने नक्की काय ते सांगावे, अन्यथा दोन जानेवारीपासून कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोमंतक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटनेने दिला आहे.

शुक्रवारी संघटनेची बैठक कारखान्याच्या आवारात झाली. बैठकीत ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या महिन्यात इथेनॉल प्रकल्पासंबंधी ठोस धोरण स्पष्ट करण्यासाठी सरकारला मुदत दिली होती. परंतु सरकारने अजून धोरण जाहीर केले नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. चार वर्षांपूर्वी कारखाना बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांना थातूरमातूर प्रस्ताव देण्यात आले. ऊस उत्पादन होणार नसल्याचे लक्षात येतात शेतकऱ्यांनी स्वतःच पुढाकार घेऊन इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी काही कंपन्या सरकारच्या नजरेस आणून दिल्या. परंतु सरकारने चालढकल केली आहे. इथेनॉल प्रकल्प सुरू करण्यासाठी सरकारने सुविधा समितीची नियुक्त केली. त्या समितीलासुद्धा शेतकऱ्यांचे काहीच देणे-घेणे नाही. प्रकल्प सुरू करण्यासाठी कंपनी तयार असताना राज्य सरकार धोरण स्पष्ट करण्यास पुढे येत नाही. 

२ जानेवारीपासून आंदोलन :

राजेंद्र देसाई म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षात ऊस उत्पादकांना आंदोलनच करावे लागत आहे. राज्यातील काही भागात फक्त ऊस लागवड चांगल्या प्रमाणात होऊ शकते. त्यातून अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह होईल. सरकार भूमिका स्पष्ट करीत नसल्याने ऊस उत्पादकांनी २ जानेवारीपासून कारखान्यासमोर धरणे आंदोलन सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :goaगोवाFarmer strikeशेतकरी संप