शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

एसपी मलिक यांना निरोप, कोश्यारींनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 18:16 IST

मलिक यांना केवळ दहा महिन्यांत गोव्याहून बदलीवर मेघालयाला पाठविण्यात आल्याबाबत समाजाच्या विविध घटकांनी टीका चालवली आहे.

पणजी : राज्यपाल म्हणून मेघालयाला नियुक्ती झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांनी बुधवारी सकाळी आठ वाजताच गोव्याचा निरोप घेतला. सायंकाळी दोनापावल येथील राजभवनवर झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमावेळी भगत सिंग कोश्यारी यांना राज्यपाल म्हणून पद व गोपनियतेची शपथ देण्यात आली. कोश्यारी यांनी कोंकणीतून शपथ घेतली.कोश्यारी हे महाराष्ट्रातही राज्यपाल म्हणून काम पहात आहेत. त्यांना गोव्याचीही अतिरिक्त जबाबदारी दिली गेली आहे. दुपारी दीडच्या सुमारास कोश्यारी यांचे गोव्यात आगमन झाले. दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. तत्पूर्वी सकाळी मलिक यांना दाबोळी विमानतळावर मुख्यमंत्री सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणोकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी निरोप दिला. मलिक हे नौदलाच्या विमानाने मेघालयाला रवाना झाले. त्यांची नियुक्ती राज्यपाल म्हणून मेघालयाला झालेली आहे. कोंकणीतून शपथ घेणारे कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत.दरम्यान, मलिक यांना केवळ दहा महिन्यांत गोव्याहून बदलीवर मेघालयाला पाठविण्यात आल्याबाबत समाजाच्या विविध घटकांनी टीका चालवली आहे. दोनापावल येथे नवे राजभवन बांधण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मलिक यांनी हरकत घेतली होती. सध्या कोविड संकट काळात सरकारचे पूर्ण लक्ष कोविड व्यवस्थापनावर असावे तसेच राज्य आर्थिक संकटात असताना तूर्त मोठय़ा नव्या प्रकल्पांवर खर्च केला जाऊ नये, अशी अपेक्षा राज्यपाल मलिक यांनी व्यक्त केली होती. सरकारचे व सत्ताधारी भाजपचे मन त्यामुळे दुखावले होते. मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांशी अन्य काही विषयांवरून संघर्ष सुरू होता. या संघर्षाची परिणती मलिक यांच्या बदलीमध्ये झाली. तथापि, मलिक यांनी गोवा राज्य कायम आपल्या काळजात राहील असे बुधवारी रात्री जारी केलेल्या पत्रकातून स्पष्ट केले.

टॅग्स :goaगोवाGovernmentसरकार