शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

तज्ज्ञ समिती सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे; वेदांताच्या ईसीबाबत पर्यावरणप्रेमींची प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2024 09:04 IST

१६७ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील खाण ब्लॉकसाठी पर्यावरणीय परवाना (ईसी) दिलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : बोर्डे-मुळगाव-शिरगाव खाण ब्लॉकसाठी वेदांता कंपनीला केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने मंजूर केलेल्या ईसीवरुन खाणविरोधी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी संतप्त बनले आहेत. एक्सपर्ट अप्रायझल कमिटीवरील सदस्यांनी राजीनामे देऊन घरी जावे, अशी मागणी करण्यात येत असून प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.

१६७ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील खाण ब्लॉकसाठी पर्यावरणीय परवाना (ईसी) दिलेला आहे, त्या क्षेत्रात २३० घरे, १४ मंदिरे, शाळा आणि नैसर्गिक जलस्रोत आहेत. परंतु पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीच्या (ईआयए) न अहवालात याचा उल्लेखच नसल्याची -. माहिती पुढे आली आहे. या भागात खाण व्यवसाय सुरु झाल्यास जलस्रोतांवर मोठा परिणाम होऊन शेती, कुळागरेही नष्ट होतील, अशी भीती व्यक्त होत आहे. लोकांच्या भविष्याशी खेळून ईसी कशा दिल्या जातात? असा प्रश्न केला जात आहे.

या खाण ब्लॉकमध्ये येणारी तिन्ही गावे यापूर्वी खाणींचे खंदक कोसळून गावातील सुपीक शेतजमिनी आणि जलकुंभ नष्ट झालेले आहेत. पावसात खनिजमिश्रित पाणी शेतांमध्ये शिरुन शेती उद्ध्वस्त झालेली आहे. मुळगाव येथील श्री केळबाई देवस्थानचे भाविक नाराज आहेत. खाणकामामुळे संस्कृती, धर्म, जीवन, उपजीविका आणि गावाशी निगडित प्रत्येक गोष्टीला धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, क्लॉड शेवटी म्हणाले की, या ईसीला न्यायालयात आव्हान दिले जाईलच. आधी राष्ट्रीय हरित लवादाकडे व नंतर सर्वोच्च न्यायालयात अशा प्रकारे खटल्यास आणखी दहा ते पंधरा वर्षे जातील आणि याला जबाबदार केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रायलच राहील.'

क्लॉड पुढे म्हणाले की; सेसाने गेल्या ५० वर्षांत काय केले याचा संबंध आमच्याशी नाही. आम्ही नव्याने ईसी मागितली आहे, असा जो बचाव वेदांताने घेतला आणि केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालय त्यास बळी पडले ही बाब अत्यंत संतापजनक आहे.

हे दिसले नाही का?

क्लॉड आल्वारिस म्हणाले की, या आधी सेसा कंपनीने पर्यावरणाची त्याच्याशी संबंध नाही, असे म्हणून वेदांताने केंद्रीय हात वर करणे व पर्यावरण मंत्रालयाने निमूटपणे करणे योग्य नव्हे. एक्सपर्ट अप्रायझल कमिटीवरील सदस्यांनी राजीनामे हवे. कंपनीने शंभर टक्के जी हानी केली आपला काहीच हे म्हणणे मान्य तज्ज्ञांच्या देऊन घरी जायला मालकी वेदांताकडे आहे हे जगाला ठाऊक आहे. त्यामुळे असे हात झटकता येणार नाहीत. तज्ज्ञ समितीने वेदांताला साधा प्रश्न विचारायला हवा होता की, या खाण ब्लॉकमध्ये अखेरचे उत्खनन झाले तेव्हा सेसाकडे ईसी होती का?'

'ईसी'ला कवडीमोल किंमत

क्लॉड पुढे म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण तथा वन मंत्रालयाने दिलेल्या या ईसीला कवडीमोलाची किमत आहे. सेसाकडेही गेली दहा वर्षे ईसी होती. परंतु पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवत कंपनीने पिळगाव, लामगाव, मये गाव नष्ट केले. शिरगावमध्ये केवळ लोक राहतात ती घरेच शिल्लक राहिली आहेत. 'नीरी'च्या अहवालानुसार भूमिगत जलपातळीही बरीच खाली गेलेली आहे.

 

टॅग्स :goaगोवा