शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा"

By किशोर कुबल | Updated: July 2, 2024 14:49 IST

- सुरेश प्रभू: पश्चिम घाटातील पर्यावरणाचेही संरक्षण करण्याचे आवाहन

किशोर कुबल/पणजी 

पणजी :  'गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांनाच आवडते. गोवा हे दिल्लीचे तर विस्तार केंद्रच बनले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने गोव्याच्या क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच पश्चिम घाटातील पर्यावरणाचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात  'टेरी'च्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रभू म्हणाले की, 'गोवा हा शांत प्रदेश आहे येथील लोकांचे आदरातिथ्य अन्य प्रदेशांमध्ये लोकांना भावते. दिल्लीतील अनेकांनी येथे आपले 'सेकंड होम' केले आहे. निवृत्तीनंतर वरिष्ठ अधिकारीही गोव्यात स्थायिक व्हायला बघतात. इतर राज्यातील लोकांना गोव्यात स्थायिक होणे आवडते. परंतु येथील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तुलनेत क्षमता तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हायला हवा.'

ते पुढे म्हणाले की, 'गोव्याच्या पश्चिम घाटात दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या जाती आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाबाबत सरकार गंभीर आहे. सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार आहे. कारखान्यांनी स्वतःचा प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) स्थापन करणे अनिवार्य आहे.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूgoaगोवा