शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

"गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांना आवडते, परंतु राज्याची क्षमता आधी तपासा"

By किशोर कुबल | Updated: July 2, 2024 14:49 IST

- सुरेश प्रभू: पश्चिम घाटातील पर्यावरणाचेही संरक्षण करण्याचे आवाहन

किशोर कुबल/पणजी 

पणजी :  'गोव्यात स्थायिक व्हायला सर्वांनाच आवडते. गोवा हे दिल्लीचे तर विस्तार केंद्रच बनले आहे. लोकसंख्या वाढत असल्याने गोव्याच्या क्षमतेचा शास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक आहे. तसेच पश्चिम घाटातील पर्यावरणाचे रक्षण होणेही तेवढेच गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. शहरातील एका पंचतारांकित हॉटेलात  'टेरी'च्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रभू म्हणाले की, 'गोवा हा शांत प्रदेश आहे येथील लोकांचे आदरातिथ्य अन्य प्रदेशांमध्ये लोकांना भावते. दिल्लीतील अनेकांनी येथे आपले 'सेकंड होम' केले आहे. निवृत्तीनंतर वरिष्ठ अधिकारीही गोव्यात स्थायिक व्हायला बघतात. इतर राज्यातील लोकांना गोव्यात स्थायिक होणे आवडते. परंतु येथील उपलब्ध पायाभूत सुविधांच्या तुलनेत क्षमता तपासणेही तेवढेच गरजेचे आहे. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीने अभ्यास व्हायला हवा.'

ते पुढे म्हणाले की, 'गोव्याच्या पश्चिम घाटात दुर्मिळ वनस्पती, प्राण्यांच्या जाती आहेत. पश्चिम घाटातील पर्यावरणाचे संवर्धन होणे काळाची गरज आहे.'

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, पर्यावरणाबाबत सरकार गंभीर आहे. सांडपाणी प्रक्रिया न करणाऱ्या कारखान्यांवर सरकार कारवाई करणार आहे. कारखान्यांनी स्वतःचा प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) स्थापन करणे अनिवार्य आहे.

टॅग्स :Suresh Prabhuसुरेश प्रभूgoaगोवा