शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

खाणींना आठवडाभरात पर्यावरण दाखले

By admin | Updated: February 26, 2015 02:28 IST

पणजी : राज्यातील सर्व खनिज खाणींचे पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित करण्याचा सप्टेंबर २०१२ मध्ये जारी झालेला आदेश आता मागे

पणजी : राज्यातील सर्व खनिज खाणींचे पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित करण्याचा सप्टेंबर २०१२ मध्ये जारी झालेला आदेश आता मागे घेण्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ठरविले आहे. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. खनिज खाणींचे ईसी जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत खाणी सुरू होऊ शकत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ईसींवरील निलंबन उठविले जावे, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री जावडेकर यांना लिहिले होते. ईसी निलंबनाचा आदेश थेट मागे घेता येणे शक्य नाही, अशी भूमिका प्रारंभी वन व पर्यावरण मंत्रालयाने घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिल्लीला भेट देऊन मंत्री जावडेकर यांच्याशी चर्चा केली होती. जावडेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी फोनवरूनही चर्चा केली व आपल्या काही शंकांचे निरसन करून घेतले. गोवा सरकारने यापूर्वी ८४ खनिज लिजांचे नूतनीकरण केले असून त्यापैकी ४३ लिज करारांवर सह्याही झाल्या आहेत, याची माहिती पार्सेकर यांनी जावडेकर यांना दिली. खनिज व्यवसाय सुरू व्हावा, अशी लोकांना अपेक्षा असल्याने राज्यातील थोड्या तरी खनिज लिजांच्या ईसींवरील निलंबन मागे घेतले जायला हवे, असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. मुख्यमंत्री बुधवारी सायंकाळी येथील मच्छीमार खात्याच्या जेटीवर एका कार्यक्रमास आले होते. त्या वेळी पत्रकारांनी खाणींबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, खनिज खाणी याच मोसमात सुरू करण्याचे आम्ही ठरविले आहे. निदान तसा प्रयत्न तरी आम्ही करत आहोत व त्या दृष्टिकोनातून मंत्री जावडेकर यांच्याशी माझी चर्चाही झाली आहे. आठवडाभरात ईसींचे निलंबन मागे घेतले जाईल, असा माझा अंदाज आहे. (खास प्रतिनिधी)