शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

खाणींना आठवडाभरात पर्यावरण दाखले

By admin | Updated: February 26, 2015 02:28 IST

पणजी : राज्यातील सर्व खनिज खाणींचे पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित करण्याचा सप्टेंबर २०१२ मध्ये जारी झालेला आदेश आता मागे

पणजी : राज्यातील सर्व खनिज खाणींचे पर्यावरणविषयक दाखले (ईसी) निलंबित करण्याचा सप्टेंबर २०१२ मध्ये जारी झालेला आदेश आता मागे घेण्याचे केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने ठरविले आहे. केंद्रीय वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. खनिज खाणींचे ईसी जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत खाणी सुरू होऊ शकत नाहीत, हे लक्षात आल्यामुळे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी ईसींवरील निलंबन उठविले जावे, अशी विनंती करणारे पत्र केंद्रीय मंत्री जावडेकर यांना लिहिले होते. ईसी निलंबनाचा आदेश थेट मागे घेता येणे शक्य नाही, अशी भूमिका प्रारंभी वन व पर्यावरण मंत्रालयाने घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्री पार्सेकर यांनी दिल्लीला भेट देऊन मंत्री जावडेकर यांच्याशी चर्चा केली होती. जावडेकर यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांशी फोनवरूनही चर्चा केली व आपल्या काही शंकांचे निरसन करून घेतले. गोवा सरकारने यापूर्वी ८४ खनिज लिजांचे नूतनीकरण केले असून त्यापैकी ४३ लिज करारांवर सह्याही झाल्या आहेत, याची माहिती पार्सेकर यांनी जावडेकर यांना दिली. खनिज व्यवसाय सुरू व्हावा, अशी लोकांना अपेक्षा असल्याने राज्यातील थोड्या तरी खनिज लिजांच्या ईसींवरील निलंबन मागे घेतले जायला हवे, असा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. मुख्यमंत्री बुधवारी सायंकाळी येथील मच्छीमार खात्याच्या जेटीवर एका कार्यक्रमास आले होते. त्या वेळी पत्रकारांनी खाणींबाबत विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले की, खनिज खाणी याच मोसमात सुरू करण्याचे आम्ही ठरविले आहे. निदान तसा प्रयत्न तरी आम्ही करत आहोत व त्या दृष्टिकोनातून मंत्री जावडेकर यांच्याशी माझी चर्चाही झाली आहे. आठवडाभरात ईसींचे निलंबन मागे घेतले जाईल, असा माझा अंदाज आहे. (खास प्रतिनिधी)