शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात मोटर वाहन कायदा अंमलात आणणे बंधनकारक - मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 19:35 IST

गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे.

पणजी : नवा दुरुस्त रुपातील मोटर वाहन कायदा हा केंद्र सरकारचा कायदा असून तो अंमलात आणण्याचे काम हे कोणत्याही राज्याला करावेच लागते. गोव्यातही मोटर वाहन कायदा अंमलात आणावाच लागेल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. बस मालक, टेक्सी मालक व अन्य संघटनांशी बोलून कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

केंद्रीय मोटर वाहन कायद्यास आक्षेप घेणारी विविध विधाने सध्या काही मंत्री व विरोधी आमदारांकडूनही येत आहेत. गोव्यात रस्ते ठिक नसल्याने व रस्ता किंवा वाहतूकविषयक अन्य साधनसुविधा ठिक नसल्याने तूर्त कायद्याची अंमलबजावणी करू नये, असे बंदर कप्तान खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनीही म्हटले आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही तशीच मागणी केली आहे. केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील दंडाची रक्कम ही खूप मोठी आहे. त्यामुळे गोव्याच्या मंत्रिमंडळ बैठकीसमोरही  यापूर्वी कायद्याचा  प्रस्ताव आला तरी,  तो मंजुर  न करता निर्णय पुढे ढकलला गेला.

या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीवेळी केलेले विधान महत्त्वाचे ठरत आहे. मुख्यमंत्री म्हणाले की,  गोव्यात रस्त्यांची थोडी समस्या आहे हे खरे आहे पण रस्ते दुरुस्तीचे काम सुरू आहे. राज्यात खूपच पाऊस पडल्याने रस्ते खराब झाले.  अतिवृष्टीमुळे खड्डे पडले. सध्या खड्डे बुजविले जात आहेत. तसेच राष्ट्रीय महामार्गांची कामे देखील सुरू आहेत. येत्या तीन-चार महिन्यांत  ती कामे पूर्ण होतील. मुख्यमंत्री म्हणाले की, मोटर वाहन कायदा अंमलात आणावा लागेल, त्याबाबत गोवा सरकारच्या हाती  मोठेसे  काही नाही, कारण तो केंद्राचा कायदा आहे. फक्त वाहतूक क्षेत्रातील विविध घटकांशी  अगोदर या कायद्यातील तरतुदींविषयी आपण  बोलूया असे मी वाहतूक मंत्र्यांना सांगितले आहे. टेक्सी वादाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गोव्यात ओला- उबेर आलेले नाहीत. गोव्यातील टेक्सी व्यवसायिकांचे आम्ही हितरक्षण करू पण मीटर लावावे लागतील. गोव्यात मीटरआधारित किंवा अेपआधारित टेक्सी  सेवाही रहायला हवी.

श्रीमंतांनी बीपीएलचा लाभ बंद करावा 

गृह आधार व अन्य काही योजनांचे जे कुणी खरोखर पात्र लाभार्थी नाहीत, अशा लाभार्थींना आम्ही योजनांमधून वगळत आहोत.  लाभार्थींची छाननी सुरू आहे. काही लाभार्थी महाराष्ट्र व कर्नाटकात राहतात व गोव्यातील योजनांचा लाभ घेतात. तसेच काही आर्थिकदृष्ट्या सबल घटक देखील बीपीएल योजनेखाली तांदूळ वगैरे मिळविण्याचा लाभ घेतात. कुणी आजीच्या किंवा आईच्या नावे लाभ घेतो. हे प्रकार लोकांनी बंद करावेत. त्यांनी स्वत:हून अशा पद्धतीने बीपीएल योजनेचा लाभ घेणे बंद करावे, जेणेकरून खऱ्या गरजूंनाच योजनांचा लाभ मिळेल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

४० टक्के आश्वासने पूर्ण 

२०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी आम्ही लोकांना जी आश्वासने दिली होती, त्यापैकी चाळीस टक्के आश्वासने आम्ही पाळली. ४० टक्के कामे पूर्ण केली. स्व. मनोहर पर्रीकर दोन वर्षे मुख्यमंत्री होते व त्यातील त्यांचे एक वर्ष त्यांच्या आजारपणामुळे वाया गेले. मला दोन वर्षे मिळाली तरी, एक वर्ष कोविड संकटासोबत लढताना गेले. यापुढील वर्षभरात आम्ही अधिकाधिक कामे करणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मानवी विकासावर आपण भर दिला आहे. राज्यात एकाच पक्षाचे सरकार (युतीचे नव्हे) अधिकारावर आहे हे राज्यासाठी हिताचे आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा