शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

कचरा हटवा, निधीचा योग्य वापर करा! मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2024 12:06 IST

साखळी मतदारसंघातील स्थानिक लोकप्रतिनिधींना कानपिचक्या

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : पंचायत सदस्य, नगरसेवक हे केवळ गावागावांत गटारे उभारण्यासाठी नाहीत तर त्यांनी 'आउट ऑफ बॉक्स' जाऊन प्रत्येक कुटुंबाचा विकास साधण्यासाठी प्रयत्न करावेत. गावातील कचरा व्यवस्थापनाबरोबर पंचायतीसाठी मंजूर झालेल्या निधीचा योग्य वापर करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळी मतदारसंघातील सातही ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका मंडळ, सर्व सचिव व अधिकाऱ्यांची रविवारी संयुक्त बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली. यावेळी तपशीलवार आढावा ढावा घेताना त्यांनी संबंधितांना सूचनाही केल्या. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सिद्धी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, मुख्याधिकारी कबीर शिरगावकर, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष विशांत चिमूरकर आदी उपस्थित होते. आजपर्यंतचा अनुभव हा स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ वेगवेगळ्या ठिकाणी गटारे बांधून निधीचा अपव्यय करतात, असे निदर्शनास आलेले आहे. गावाच्या विकासाचा निश्चित आराखडा तयार करून गावासाठी काय करणे उपयुक्त आहे, याबाबत स्थानिक प्रतिनिधींनी ग्रामस्थांशी चर्चा करून प्रकल्प राबवले तर तो निधी खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपल्या भागातील प्रत्येक घराबाबत चांगल्या-वाईट गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. लोक केवळ विविध प्रकल्प उभारले म्हणून मते देणार नाहीत तर त्यांची गरज ओळखून कामे करा, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

कचरा व्यवस्थापन करताना प्रत्येक पंचायत सदस्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पंचायतीत कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक व सर्वसामान्य अशा चौफेर घटकांच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी योगदान देणे महत्त्वाचे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी हे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत, त्यामुळे तशा भावनेनेच त्यांनी काम करावे. निवडणुकी पुरतेच मर्यादित न राहता त्यानंतर आपण जनतेला कशाप्रकारे वेगवेगळ्ळ्या योजनांचा फायदा मिळवून देऊ शकतो यावर भर द्या.

पंचायती उदासीन 

आपल्या पंचायत क्षेत्रातील प्रत्येक घरात आपण कशाप्रकारे लोकांपर्यंत वेगवेगळ्या योजना राबवू शकतो, यावर विशेष भर देणे गरजेचे आहे. मात्र, अनेक पंचायती याबाबत उदासीन दिसून येत असल्याची खंत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

पंचायतींना इशारा

आज अनेक पंचायतींचा वेगवेगळ्ळ्या पातळीवरचा निधी तसाच पडून आहे. अनेक ठिकाणी पंचायत मंडळाकडे दूरदृष्टीचा अभाव व काम करण्याची प्रवृत्ती नसल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, यापुढे अशा प्रकारच्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. निधीचा योग्य वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत