शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
3
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
4
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
5
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
6
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
7
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
8
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
9
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
10
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
11
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
12
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
13
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
14
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
15
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
16
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
17
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
18
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
20
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

खाण कंपन्यांनी वाहतूक बंद केल्याने 70 मुले शाळेपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 19:52 IST

संस्थेचे सरचिटणीस अशोक श्रीमाली व गोवा शाखेचे सदस्य रविंद्र वेळीप यांनी पत्रकार परिषद घेतली.

पणजी : खनिज खाणी बंद होताच खाण कंपन्यांनी सोनशी, पिसुर्ले व अन्य अनेक परिसरांमधील विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था बंद केली. यामुळे 70 पेक्षा जास्त मुले सध्या विद्यालयात जाऊ शकत नाही असे माईन्स, मिनरल्स अॅण्ड पिपल ह्या राष्ट्रीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी येथे सांगितले.

संस्थेचे सरचिटणीस अशोक श्रीमाली व गोवा शाखेचे सदस्य रविंद्र वेळीप यांनी पत्रकार परिषद घेतली. खनिज खाणींच्या दुष्परिणामांची झळ ज्यांना बसली, अशा लोकांसाठी सोनशी येथे संस्थेने एक कार्यक्रम घडवून आणला. सोनशीसह त्या परिसरातील विविध गावांतील लोकांनी त्यात भाग घेतला. खनिज खाणी सुरू होत्या, तेव्हा खाण कंपन्यांनी मुलांची शाळेत वाहतूक करण्यासाठी वाहन व्यवस्था केली होती. खाणी बंद होताच ती वाहतूक बंद झाली व आता 70 पेक्षा जास्त मुले विद्यालयात जाण्यापासून वंचित आहेत असे आम्ही सोनशीमधील उपक्रमावेळी आढळून आले असे श्रीमाली व वेळीप यांनी सांगितले. वास्तविक विद्यार्थ्यांना वाहतूक पुरविणे ही सरकारची जबाबदारी आहे. ती खाण कंपन्यांची जबाबदारी नव्हे. त्यामुळे आता तरी सरकारने वाहतुकीची सोय करावी, असे वेळीप म्हणाले.सरकारच्या जिल्हा मिनरल फाऊंडेशनकडे एकूण 186 कोटी रुपयांचा निधी आहे. हा निधी अशा खाण अवलंबितांच्या सोयीसाठी वापरला जावा. सोनशी व परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. त्यासाठीही 186 कोटींचा निधी उपयोगात आणला जावा. यापूर्वी गोवा सरकारने जिल्हा मिनरल फाऊंडेशनमधून 10 कोटी रुपये खर्च केले पण गैरव्यवस्थापन झाले. त्यामुळे त्या पैशांचा लाभ खाणबाधित लोकांर्पयत पोहचला नाही, असे वेळीप म्हणाले. गोव्यात पर्यावरणाची मोठी हानी खनिज खाणींनी केली. आरोग्य सेवा, मलनिस्सारण, पिण्याचे पाणी यासाठी गोवा सरकारने निधी वापरावा व रोजगाराच्या संधीही त्यातून निर्माण कराव्यात. 

सरकारने खनिज खाणी कशा पद्धतीने चाललेल्या लोकांना हव्या आहेत याचे सर्वेक्षण खाणग्रस्त भागांमध्ये जाऊन करावे. महामंडळ स्थापन करून की सहकारी तत्त्वावर की अगोदरच्याच लिजधारकांनी खाणी चालवाव्यात हे लोकांकडून जाणून घेऊन मग सरकारने धोरण ठरवावे, असे वेळीप म्हणाले. देशभरात जिल्हा मिनरल फाऊंडेशनद्वारे एकूण 13 हजार 398 कोटी रुपये गोळा केले गेले. त्यापैकी फक्त 2 हजार 260 कोटी रुपये वापरले गेले. म्हणजेच फक्त 17 टक्के पैसे वापरले. ओरिसामध्ये सर्वाधिक निधी मिनरल फाऊंडेशनद्वारे येतो पण तिथे फक्त 8 टक्के निधी खाणबाधितांसाठी वापरला गेला, असे अशोक श्रीमली यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवाSchoolशाळा