शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

धावपट्टीवर कुत्रा आल्याने विमानाचं उड्डाण थांबवलं, दाबोळी विमानतळावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 12:26 PM

गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं.

ठळक मुद्दे गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं. मुंबईकडे जायला निघालेल्या इंडिगोच्या 6 इ 458 विमानासमोर संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास हा प्रकार घडला.

पणजी : गोव्यातील दाबोळी विमानतळाच्या धावपट्टीवर भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून बुधवारी एका घटनेत असाच भटक्या कुत्र्यामुळे इंडिगो विमानाचे उड्डाण वैमानिकाला थांबवावं लागलं. मुंबईकडे जायला निघालेल्या इंडिगोच्या 6 इ 458 विमानासमोर संध्याकाळी ५.३0 च्या सुमारास हा प्रकार घडला. वैमानिकाला विमानावर नियंत्रण ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. 

वैमानिकाने विमान थांबवलं पण खबरदारी म्हणून नंतर ते विमान पार्किंग तळावर आणून काही टायर बदलावे लागले. विमानतळ सूत्रांनी या वृत्तास दुजोरा दिला. विमानात सुमारे १00 प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना न घडल्याने सर्वजण बचावले. या घटनेमुळे अडीच तास विलंबाने विमानाने उड्डाण केलं 

वैमानिकाने ग्राउंड स्टाफ, अभियंते तसेच प्रवाशांना या गोष्टीची कल्पना दिली. बुधवारी संध्याकाळी  ५.३0 च्या सुमारास विमान उ्डडाण करायला सज्ज असताना धावपट्टीवर अचानक कुत्रा आडवा आल्याने वैमानिकाला अचानक ब्रेक लावावे लागले. त्यामुळे विमान हेलकावे खात उजवीकडे आणि डाविकडे धावू लागले. परंतु अखेर वैमानिकाने त्यावर नियंत्रण आणले. टायर बदलण्याच्या किरकोळ दुरुस्तीनंतर अभियंत्यांनी विमानाची पुन्हा एकदा तपासणी केली आणि नंतरच ते मुंबईकडे रवाना केलं. रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी या विमानाने मुंबईकडे झेप घेतली आणि ९.३८ वाजता ते मुंबईला उतरले. 

दाबोळी विमानतळाच्या परिसरात भटकी कुत्री, गाई, म्हशी आदी जनावरांचा वावर वाढलेला आहे. उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने घारी, तसेच अन्य पक्षीही आकाशात घिरट्या घालत असतात. अनेकदा हे पक्षीही वैमानिकांना विमान उड्डाणाच्या वेळी तसंच लँडिंगच्यावेळी त्रासदायक ठरतात. भटकी जनावरे विमानतळाच्या अवारात किंवा धावपट्टीवर येऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आल्याचा दावा विमानतळ प्रधिकरणाच्या अधिकाऱ्याकडून केला जातो परंतु अशा घटना नेहमीच्याच बनल्या आहेत. 

दरम्यान, दाबोळी मतदारसंघाचे आमदार तथा विद्यमान पंचायतमंत्री मॉविन गुदिन्हो यांनी विरोधात असताना विमानतळ परिसरातील कचरा तसेच भटक्या जनावरांच्या प्रश्नावर वेळोवेळी विधानसबेत आवाज उठविला आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केवळ दाबोळी पंचायतीलाच नव्हे तर राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना कचरा विल्हेवाटीबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मॉविन म्हणाले की, दाबोळी, सांकवाळ, चिखली, चिकोळणा, बोगमाळो, वास्को आदी भागातील लोकसंख्या ३0 हजार होती ती आज १ लाखापेक्षा अधिक झालेली आहे.  

टॅग्स :goaगोवाAirportविमानतळ