शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

दहशतवादाची भीती नाही, जमाव बंदीचा आदेश हा सोपस्कार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 12:25 PM

राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे.

पणजी - राज्यात दहशतवादी हल्ला होण्याची भीती नाही. कलम 144 लागू करणे  किंवा जमाव बंदीचा आदेश लागू करणे हा पोलीस खात्याचा एक सोपस्कार आहे. ती एक प्रक्रिया आहे व त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनी किंचितही अस्वस्थ होऊ नये किंवा चिंता करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले आहे.

राज्यात 144 कलम लागू केल्याने सरकारवर विरोधी काँग्रेस पक्ष व इतरांनी टीका सुरू केली आहे. उत्तर गोव्यातच जमाव बंदीचा आदेश का लागू केला जात आहे अशीही विचारणा केली जात आहे. राज्याला दहशतवादापासून धोका आहे काय असे पत्रकारांनी मुख्यमंत्री सावंत यांना येथे विचारले असता, ते म्हणाले की धोका नाही. कलम 144 लागू करणे ही प्रक्रिया राज्यात अधूनमधून सुरूच असते. सहा महिन्यांतून एकदा किंवा वर्षातून दोन-तीनवेळा असे कलम लागू केले जात असते. जिल्हाधिकारी व पोलीस मिळून तसा आदेश जारी करत असतात. ती प्रक्रिया सुरूच असते. त्यामुळे कुणी घाबरून जाण्याचे कारण नाही. पर्यटकांनी तर चिंताच करू नये.

मुख्यमंत्री म्हणाले, की यापूर्वीही अनेकदा कलम 144 लागू केले गेले होते. राज्यातील सरकारी सोहळ्य़ांवर किंवा उत्सवांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. आता लवकरच विविध शहरांत कार्निव्हल साजरा होणार आहे. सध्याही फिश महोत्सव व अन्य सोहळे सुरूच आहेत व त्यानिमित्ताने लोक एकत्र येत आहेत. त्यावर कुणी बंदी लागू केलेली नाही. जमाव बंदीचा आदेश लागू करण्याची जी प्रक्रिया आहे, ती राज्यासाठी नवी नाही. पर्यटकांनी निश्चिंतपणे गोव्यात यावे. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतtourismपर्यटन