शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:06 IST

राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी योगदिन पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना योगा करतानाचे फोटो कार्यालयात पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहेत. राज्यातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये ४ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवसापासून योगासनांचा अभ्यास घेतला जाणार आहे. सर्व सरकारी कार्यालयात आणि खाजगी कार्यालयातही अस्थापनांमध्येही योगासने व्हावीत अशी अपेक्षा आहे. ज्यांना योग प्रशिक्षणासाठी शिक्षक हवा असेल, त्यांनी आयुष खात्याकडे संपर्क साधावा. त्यांना योग प्रशिक्षक मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच योगा कीटही दिले जाणार आहे.

दरम्यान, जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाचे आभार मानले.

आणिबाणीची ५० वर्षे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावल्यास ५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 'लोकशाहीचा खून' म्हणून हे वर्ष पाळतानाच अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एनडीएशासीत सर्व राज्यांत हे कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

सौरऊर्जा प्रकल्प

राज्यातील पडीक जमिनींचा वापर करून सौरऊर्जा निर्माण करण्याच्या नवीन प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी लिमिटेडने साळावली, आमठाणे, अणजूण, आणि चापोली या धरणांवर १३०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता.

नक्षलवादमुक्तीची मोहीम

याशिवाय नक्षलवादमुक्त भारताच्या मोहिमेची माहिती एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन करण्याचा ठरावही संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रालोआ बैठकीत विकसित गावांबाबत चर्चा

विकसित भारतची संकल्पना ही विकसित गावापासून व्हावी आणि ती कशी करावी या विषयी रालोआ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'नीती आयोगाला दिलेल्या नियोजन आराखड्यात साधन सुविधा निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रात टीबीमुक्त गोवा अशा दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे.'

नीती आयोगाची टीम येणार

राज्य सरकारने १० हजार चौरस मीटर खाजन जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रस्तावाचा अभ्यास नीती आयोगाची टीम करेल. त्यासाठी ही टीम राज्याला भेट देऊन त्याचा अभ्यास करील आणि नंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाला अहवाल सादर करील असे मुख्यमंत्री म्हणाले 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारYogaयोगासने प्रकार व फायदे