शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:06 IST

राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी योगदिन पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना योगा करतानाचे फोटो कार्यालयात पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहेत. राज्यातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये ४ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवसापासून योगासनांचा अभ्यास घेतला जाणार आहे. सर्व सरकारी कार्यालयात आणि खाजगी कार्यालयातही अस्थापनांमध्येही योगासने व्हावीत अशी अपेक्षा आहे. ज्यांना योग प्रशिक्षणासाठी शिक्षक हवा असेल, त्यांनी आयुष खात्याकडे संपर्क साधावा. त्यांना योग प्रशिक्षक मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच योगा कीटही दिले जाणार आहे.

दरम्यान, जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाचे आभार मानले.

आणिबाणीची ५० वर्षे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावल्यास ५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 'लोकशाहीचा खून' म्हणून हे वर्ष पाळतानाच अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एनडीएशासीत सर्व राज्यांत हे कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

सौरऊर्जा प्रकल्प

राज्यातील पडीक जमिनींचा वापर करून सौरऊर्जा निर्माण करण्याच्या नवीन प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी लिमिटेडने साळावली, आमठाणे, अणजूण, आणि चापोली या धरणांवर १३०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता.

नक्षलवादमुक्तीची मोहीम

याशिवाय नक्षलवादमुक्त भारताच्या मोहिमेची माहिती एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन करण्याचा ठरावही संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रालोआ बैठकीत विकसित गावांबाबत चर्चा

विकसित भारतची संकल्पना ही विकसित गावापासून व्हावी आणि ती कशी करावी या विषयी रालोआ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'नीती आयोगाला दिलेल्या नियोजन आराखड्यात साधन सुविधा निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रात टीबीमुक्त गोवा अशा दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे.'

नीती आयोगाची टीम येणार

राज्य सरकारने १० हजार चौरस मीटर खाजन जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रस्तावाचा अभ्यास नीती आयोगाची टीम करेल. त्यासाठी ही टीम राज्याला भेट देऊन त्याचा अभ्यास करील आणि नंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाला अहवाल सादर करील असे मुख्यमंत्री म्हणाले 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारYogaयोगासने प्रकार व फायदे