शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
2
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
3
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
4
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
5
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
6
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
7
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
8
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
9
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
10
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
11
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
12
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
13
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
14
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
15
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
16
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
17
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
18
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
19
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
20
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!

योगा करा, फोटो पाठवा: मुख्यमंत्री सावंत; सरकारी व खासगी आस्थापनांना सहभागाची सक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 07:06 IST

राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना २१ जून रोजी योगदिन पाळणे सक्तीचे करण्यात आले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना योगा करतानाचे फोटो कार्यालयात पाठविण्याची सक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात कमीत कमी ३० हजार लोकांनी तरी योगासने करावीत असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहेत. राज्यातील शाळा व उच्च माध्यमिक विद्यालये ४ जूनपासून सुरू होत आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवसापासून योगासनांचा अभ्यास घेतला जाणार आहे. सर्व सरकारी कार्यालयात आणि खाजगी कार्यालयातही अस्थापनांमध्येही योगासने व्हावीत अशी अपेक्षा आहे. ज्यांना योग प्रशिक्षणासाठी शिक्षक हवा असेल, त्यांनी आयुष खात्याकडे संपर्क साधावा. त्यांना योग प्रशिक्षक मोफत उपलब्ध करून दिला जाईल. तसेच योगा कीटही दिले जाणार आहे.

दरम्यान, जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर राज्याच्यावतीने मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानाचे आभार मानले.

आणिबाणीची ५० वर्षे

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावल्यास ५० वर्षे पूर्ण होत असल्यामुळे 'लोकशाहीचा खून' म्हणून हे वर्ष पाळतानाच अनेक कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एनडीएशासीत सर्व राज्यांत हे कार्यक्रम होणार असल्याचेही ते म्हणाले.

सौरऊर्जा प्रकल्प

राज्यातील पडीक जमिनींचा वापर करून सौरऊर्जा निर्माण करण्याच्या नवीन प्रस्तावावर सरकार विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली. गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या ग्रीन एनर्जी लिमिटेडने साळावली, आमठाणे, अणजूण, आणि चापोली या धरणांवर १३०० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव सादर केला होता.

नक्षलवादमुक्तीची मोहीम

याशिवाय नक्षलवादमुक्त भारताच्या मोहिमेची माहिती एनडीएच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल सशस्त्र दलांचे अभिनंदन करण्याचा ठरावही संमत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

रालोआ बैठकीत विकसित गावांबाबत चर्चा

विकसित भारतची संकल्पना ही विकसित गावापासून व्हावी आणि ती कशी करावी या विषयी रालोआ मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन केले असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'नीती आयोगाला दिलेल्या नियोजन आराखड्यात साधन सुविधा निर्मिती आणि आरोग्य क्षेत्रात टीबीमुक्त गोवा अशा दोन महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे.'

नीती आयोगाची टीम येणार

राज्य सरकारने १० हजार चौरस मीटर खाजन जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी नीती आयोगाकडे प्रस्ताव सादर केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रस्तावाचा अभ्यास नीती आयोगाची टीम करेल. त्यासाठी ही टीम राज्याला भेट देऊन त्याचा अभ्यास करील आणि नंतर केंद्रीय कृषी मंत्रालयाला अहवाल सादर करील असे मुख्यमंत्री म्हणाले 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतState Governmentराज्य सरकारYogaयोगासने प्रकार व फायदे