शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

‘मगो’ला सरकारमधून हटवणार नाही!

By admin | Updated: January 20, 2015 02:14 IST

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले.

पणजी : महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला सरकारमधून हटविण्याचा मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अन्य ज्येष्ठ भाजप नेते मुळीच विचार करत नाहीत, हे सोमवारी स्पष्ट झाले. भाजपच्या सर्व मंत्री, आमदारांची व निवडक पदाधिकाऱ्यांची बैठक कळंगुट येथील एका हॉटेलमध्ये सोमवारी रात्री सुरू झाली. मात्र आमदार विष्णू वाघ बैठकीत सहभागी झाले नाहीत. तसेच उद्योगमंत्री महादेव नाईक दिल्लीत असल्याने तेही बैठकीत भाग घेऊ शकले नाहीत. सरकारची प्रगती कशी काय आहे, विविध मंत्र्यांकडून भाजपच्या आमदारांची कामे केली जातात की नाही, विविध योजनांबाबत लोक खुश आहेत की नाही याविषयी बैठकीत ढोबळ मानाने चर्चा झाली. काही आमदारांनी आपली मते मांडली. जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर होणार असल्याने त्याबाबतही बैठकीत चर्चा झाली. पार्सेकर मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाची बैठक सुरू झाली असून ती आज संपुष्टात येईल. चिंतन बैठक तथा श्रम परिहार, असेही बैठकीचे स्वरूप आहे. पाच वर्षांसाठी युतीस कौल माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी म.गो. पक्षाच्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवले आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २०१२ च्या निवडणुकीवेळी भाजप व मगोची युती झाली होती. ही युती पाच वर्षांसाठी होती. लोकांनी मगो-भाजप युतीला पाच वर्षांसाठी कौल दिलेला असल्याने आता युती तोडायचा भाजपचे नेते विचार करत नाहीत, असे संकेत काही मंत्र्यांकडून मिळाले. युतीविरुद्ध फक्त एक-दोन आमदारच बोलत आहेत. युती तोडून पुढे जाणे हे थोडे अवघड ठरेल, असे मत काही भाजप नेते व्यक्त करत आहेत. (खास प्रतिनिधी)