शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली 'मुंबईकर'ची व्याख्या; "बाहेरून आला म्हणून काय झाले..." 
2
मोठी बातमी! तृणमूलच्या आयटी विभागावर ईडीची रेड; ममता बॅनर्जी पोहोचल्या, फाईल्स ताब्यात घेतल्या...
3
१ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
4
टीम इंडियातून डावललेला पुणेकर ऋतुराज गायकवाड ठरला जगात भारी! २० वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडला
5
५ वर्षांचं प्रेम, लग्नानंतर बायकोला शिकवलं, पोलीस अधिकारी बनवलं; आता नवऱ्यावरच केला आरोप
6
अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक अखेर भाजपात, काँग्रेसनं केली होती निलंबनाची कारवाई
7
"मराठीत माधुरी दीक्षित नाहीये...", असं का म्हणाले रवी जाधव? 'फुलवरा' सिनेमाशी आहे कनेक्शन
8
४ राजयोगात २०२६ची पहिली कालाष्टमी: ९ राशींवर महादेव-लक्ष्मी कृपा, चौपट लाभ; कल्याण-मंगल योग!
9
घसरत्या बाजारातही रॉकेट बनलाय हा स्मॉलकॅप शेअर; ५७००% पेक्षाही अधिक आलीये तेजी
10
भाजप शिवसेनेला संपवणार? 'फोडाफोडी'वर एकनाथ शिंदेंचे रोखठोक उत्तर, म्हणाले; "आम्ही घाबरत नाही"
11
रस्त्यात जखमी दुचाकीस्वाराला पाहताच अजित पवारांनी केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक!
12
Madhav Gadgil: कोकणातील पर्यावरणीय संघर्षाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक हरपला!
13
१० मिनिटांच्या डिलिव्हरीवर गिग वर्कर्सचा आक्षेप; क्विक कॉमर्स कंपन्यांचे धाबे दणाणले, काय आहे मागणी?
14
रोहित शर्माची पत्नीने रितिका सजदेहने मुंबईतील पॉश एरियात घेतला आलिशान फ्लॅट, किंमत किती?
15
फक्त फोन जवळ नेला अन् पैसे उडाले! 'टॅप-टू-पे' वापरताय तर ही बातमी वाचाच; नाहीतर होईल मोठं नुकसान
16
Vijay Hazare Trophy : हार्दिक पांड्याची वादळी खेळी! ‘बडे मियाँ’च्या कॅप्टन्सीत ‘छोटे मियाँ’चा धमाका!
17
Akola Municipal Election 2026: कोणाला पुन्हा संधी? माजी महापौर, तीन माजी महापौरांचे कुटुंबीय आजमावणार नशीब!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले, एका झटक्यात चांदी ₹१२,२२५ नं स्वस्त; Gold च्या किंमतीत किती घसरण, पाहा
19
वडिलांना वाचवण्यासाठी लेकीने बिबट्याशी दोन हात केले, उसाच्या तुकड्याने फोडून पळवून लावले
20
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहरातील पेपर केला सोपा; २० जागांवर युतीचे नगरसेवक बिनविरोध
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:30 IST

मडगाव येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. ज्या मतदारांनी भाजपला मतदान केले त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या घरी जाऊन आभार माना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना केले.

येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात आयोजित 'धन्यवाद मतदार, अभिनंदन मतदार' या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नावेली आमदार उल्हास तुयेकर, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकरस, माजी आमदार दामू नाईक, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सर्वानंद भगत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उपस्थित होते. त्यांनी दक्षिण गोव्यात भाजप उमेदवाराचा का पराभव झाला, याचा आढावा घेतला. 

उत्तर गोव्यात १६ मतदारसंघात जिंकलो तर दक्षिण गोव्यात ११ मतदारसंघात जिंकलो. सांतआंद्रे मतदारसंघात केवळ ७६ मतांनी, तर हळदोणा मतदारसंघात केवळ ८० मतांनी आम्ही मागे राहिलो त्यामुळे तसे आम्ही २९ मतदारसंघात जिंकल्या सारखेच आहे. आपण २०२२ मध्ये २२ जागा जिंकल्या. आता २०२७ मध्ये २७ हून अधिक जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०२७ मध्ये भाजपला बहुमत मिळेल, यावर आपल्याला १०० टक्के विश्वास आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, नुवे, कुडतरी, कुंकळ्ळी व नावेली मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकणे आव्हानात्मक असते. परंतु आज जरी विधानसभा निवडणूक झाली तरीही आम्ही या जागा जिंकणार, याचा आपल्याला विश्वास आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले, की २०२७ मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे. पुन्हा एकदा डॉ. सावंत हे मुख्यमंत्री बनतील. केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे गोव्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असल्याने राज्यात विकासाला गती मिळाल्याचे कामत यांनी सांगितले.

मतदारांमधील 'तो' संभ्रम दूर करा

दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार केवळ १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्यास संविधानात बदल केला जाईल, अशी भीती मतदारांच्या मनात निर्माण केल्याने काही मतदारांनी मतदानच केले नाही, अशी माहिती आपल्याला काही लोकांनी दिली. मतदारांच्या मनातील भ्रम दूर करण्याची हीच खरी वेळ आहे त्यासाठी कामाला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत