शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
2
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
3
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
4
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
5
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
6
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
7
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
8
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
9
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
10
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
11
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
12
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
13
Video - मेलेलं झुरळ, वर कीटकांची पावडर... कॉकरोच कॉफी तुफान व्हायरल, जाणून घ्या किंमत
14
जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं ट्रॅविस हेडची ‘तोडफोड’ सेंच्युरी! असा पराक्रम करणारा ठरला जगतातील पहिला फलंदाज
15
टीव्हीवर तुफान गाजलेली विनोदी मालिका, 'भाभीजी घर पर है' आता मोठ्या पडद्यावर करणार धमाल
16
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
17
सामुद्रिक शास्त्र: शरीराच्या कुठल्या भागावर 'तिळ' आहे, त्यानुसार समुद्र शास्त्र सांगते तुमचे भाकीत!
18
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
20
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पराभवाने खचू नका, मतदारांचे घरी जाऊन भार माना; मुख्यमंत्र्यांचा दक्षिणेतील कार्यकर्त्यांना सल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2024 09:30 IST

मडगाव येथे सभा

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून खचून न जाता पुन्हा एकदा जोमाने कामाला लागावे. ज्या मतदारांनी भाजपला मतदान केले त्यांना विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच त्यांच्या घरी जाऊन आभार माना, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दक्षिण गोव्यातील भाजप कार्यकर्त्यांना केले.

येथील दक्षिण गोवा भाजप कार्यालयात आयोजित 'धन्यवाद मतदार, अभिनंदन मतदार' या सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मडगावचे आमदार दिगंबर कामत, कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नावेली आमदार उल्हास तुयेकर, आमदार संकल्प आमोणकर, एनआरआय आयुक्त नरेंद्र सावईकरस, माजी आमदार दामू नाईक, भाजपचे दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सर्वानंद भगत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर उपस्थित होते. त्यांनी दक्षिण गोव्यात भाजप उमेदवाराचा का पराभव झाला, याचा आढावा घेतला. 

उत्तर गोव्यात १६ मतदारसंघात जिंकलो तर दक्षिण गोव्यात ११ मतदारसंघात जिंकलो. सांतआंद्रे मतदारसंघात केवळ ७६ मतांनी, तर हळदोणा मतदारसंघात केवळ ८० मतांनी आम्ही मागे राहिलो त्यामुळे तसे आम्ही २९ मतदारसंघात जिंकल्या सारखेच आहे. आपण २०२२ मध्ये २२ जागा जिंकल्या. आता २०२७ मध्ये २७ हून अधिक जागा जिंकू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. २०२७ मध्ये भाजपला बहुमत मिळेल, यावर आपल्याला १०० टक्के विश्वास आहे, असे ते म्हणाले.

दक्षिण गोव्यातील वेळ्ळी, नुवे, कुडतरी, कुंकळ्ळी व नावेली मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकणे आव्हानात्मक असते. परंतु आज जरी विधानसभा निवडणूक झाली तरीही आम्ही या जागा जिंकणार, याचा आपल्याला विश्वास आहे.

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले, की २०२७ मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता येणार आहे. पुन्हा एकदा डॉ. सावंत हे मुख्यमंत्री बनतील. केंद्रात भाजपचे सरकार आहे त्यामुळे गोव्यातही भाजपचेच सरकार सत्तेवर येणे अपेक्षित आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असल्याने राज्यात विकासाला गती मिळाल्याचे कामत यांनी सांगितले.

मतदारांमधील 'तो' संभ्रम दूर करा

दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार केवळ १३ हजार मतांच्या फरकाने पराभूत झाला. लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान केल्यास संविधानात बदल केला जाईल, अशी भीती मतदारांच्या मनात निर्माण केल्याने काही मतदारांनी मतदानच केले नाही, अशी माहिती आपल्याला काही लोकांनी दिली. मतदारांच्या मनातील भ्रम दूर करण्याची हीच खरी वेळ आहे त्यासाठी कामाला लागा, असा सल्ला मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिला. 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंत