शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोव्यात दिवाळीला पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 21:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत. उद्या मंगळवारी नरक चतुर्दशी अर्थात दिपावलीच्या दिवशी  पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येतील. 

खात्याचे संचालक आयएएस अधिकारी रवी झा यांनी ही अधिसूचना काढली आहे. बुधवार दि. ७ लक्ष्मीपूजन व गुरु वार दि. ८ रोजी बली प्रतिपदेला रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडता येतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्थानकावरील प्रमुखांची असेल त्यामुळे वरील वेळेव्यतिरिक्त फटाक्यांचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांची निर्मिती, वितरण आणि वापरावर निर्बंध घातलेले आहेत. दिवाळी सणात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे आवाजाचे प्रदूषण तर होतेच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीनिमित्त केवळ दोन तास फटाके फोडण्यास मुभा दिली आहे हे दोन तास राज्य सरकारने निश्चित केले आहेत. 

गोव्यात नरकासूर प्रतिमा तयार करुन दिपावलीच्या पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. अशा हजारो नरकासूर प्रतिमा राज्यभर तयार केल्या जातात. लहान मुलांपासून मोठमोठी मंडळे नरकासूर प्रतिमा तयार करतात. प्रमुख शहरांमध्ये पहाटेपर्यंत नरकासूर स्पर्धाही घेतल्या जातात. दहनाच्यावेळी

फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अभ्यंगस्नानानंतरही फटाके फोडण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या काळात कुठले दोन तास फटाके वापरण्यास द्यावेत याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे कोर्टाने म्हटले होते. त्या अनुषंगाने वरील अधिसूचना काढण्यात आली आहे. 

टॅग्स :CrackersफटाकेDiwaliदिवाळीgoaगोवा