शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

गोव्यात दिवाळीला पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 21:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत. उद्या मंगळवारी नरक चतुर्दशी अर्थात दिपावलीच्या दिवशी  पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येतील. 

खात्याचे संचालक आयएएस अधिकारी रवी झा यांनी ही अधिसूचना काढली आहे. बुधवार दि. ७ लक्ष्मीपूजन व गुरु वार दि. ८ रोजी बली प्रतिपदेला रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडता येतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्थानकावरील प्रमुखांची असेल त्यामुळे वरील वेळेव्यतिरिक्त फटाक्यांचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांची निर्मिती, वितरण आणि वापरावर निर्बंध घातलेले आहेत. दिवाळी सणात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे आवाजाचे प्रदूषण तर होतेच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीनिमित्त केवळ दोन तास फटाके फोडण्यास मुभा दिली आहे हे दोन तास राज्य सरकारने निश्चित केले आहेत. 

गोव्यात नरकासूर प्रतिमा तयार करुन दिपावलीच्या पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. अशा हजारो नरकासूर प्रतिमा राज्यभर तयार केल्या जातात. लहान मुलांपासून मोठमोठी मंडळे नरकासूर प्रतिमा तयार करतात. प्रमुख शहरांमध्ये पहाटेपर्यंत नरकासूर स्पर्धाही घेतल्या जातात. दहनाच्यावेळी

फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अभ्यंगस्नानानंतरही फटाके फोडण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या काळात कुठले दोन तास फटाके वापरण्यास द्यावेत याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे कोर्टाने म्हटले होते. त्या अनुषंगाने वरील अधिसूचना काढण्यात आली आहे. 

टॅग्स :CrackersफटाकेDiwaliदिवाळीgoaगोवा