शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

गोव्यात दिवाळीला पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2018 21:15 IST

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत.

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याने अधिसूचना काढून फटाके फोडण्यावर निर्बंध जारी केले आहेत. उद्या मंगळवारी नरक चतुर्दशी अर्थात दिपावलीच्या दिवशी  पहाटे ४.३0 ते ५.३0 आणि रात्री ७ ते ८ या वेळेतच फटाके फोडता येतील. 

खात्याचे संचालक आयएएस अधिकारी रवी झा यांनी ही अधिसूचना काढली आहे. बुधवार दि. ७ लक्ष्मीपूजन व गुरु वार दि. ८ रोजी बली प्रतिपदेला रात्री ८ ते १0 या वेळेतच फटाके फोडता येतील. या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित पोलिस स्थानकावरील प्रमुखांची असेल त्यामुळे वरील वेळेव्यतिरिक्त फटाक्यांचा वापर झाल्यास पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांची निर्मिती, वितरण आणि वापरावर निर्बंध घातलेले आहेत. दिवाळी सणात फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे आवाजाचे प्रदूषण तर होतेच, शिवाय पर्यावरणाचीही हानी होते. सर्वोच्च न्यायालयाने सणासुदीनिमित्त केवळ दोन तास फटाके फोडण्यास मुभा दिली आहे हे दोन तास राज्य सरकारने निश्चित केले आहेत. 

गोव्यात नरकासूर प्रतिमा तयार करुन दिपावलीच्या पहाटे दहन करण्याची प्रथा आहे. अशा हजारो नरकासूर प्रतिमा राज्यभर तयार केल्या जातात. लहान मुलांपासून मोठमोठी मंडळे नरकासूर प्रतिमा तयार करतात. प्रमुख शहरांमध्ये पहाटेपर्यंत नरकासूर स्पर्धाही घेतल्या जातात. दहनाच्यावेळी

फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अभ्यंगस्नानानंतरही फटाके फोडण्याची प्रथा आहे. दिवाळीच्या काळात कुठले दोन तास फटाके वापरण्यास द्यावेत याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असे कोर्टाने म्हटले होते. त्या अनुषंगाने वरील अधिसूचना काढण्यात आली आहे. 

टॅग्स :CrackersफटाकेDiwaliदिवाळीgoaगोवा