शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवरच शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2019 6:56 PM

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवरच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे.

पणजी : राज्यातील जिल्हा पंचायतींच्या निवडणुका पक्षीय पातळीवरच घेतल्या जाण्याची दाट शक्यता आहे. सत्ताधारी भाजपा व विरोधी काँग्रेसलाही या निवडणुका पक्षीय पातळीवर झालेल्या हव्या आहेत. सरकारने अजून त्याविषयी वेगळा कोणता निर्णय घेतलेला नसला तरी, जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवरच घेण्याची तरतूद कायद्यात आहे.पाच वर्षांपूर्वी जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या गेल्या. काँग्रेसने त्यावेळी विरोध केला होता. तथापि, सरकारने संबंधित कायद्यात दुरुस्ती करून जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर घेतल्या होत्या. काँग्रेसने त्यावेळी निषेध म्हणून जिल्हा पंचायत निवडणुकीत भाग घेतला नव्हता. मात्र यावेळी काँग्रेसने उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले, की जिल्हा पंचायत निवडणुका येत्या मार्चच्या दुस-या पंधरवड्यात होऊ शकतात. त्या पक्षीय पातळीवर घ्याव्यात की घेऊ नयेत हे अजून ठरलेले नाही. जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख राज्य निवडणूक आयोग जाहीर करील पण आम्ही निवडणुकीला कधी सामोरे जाऊ शकतो हे आम्ही आयोगाला कळवले आहे.निवडणुका पुढे ढकला : मगोपदरम्यान, मगोपचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुका मार्चनंतर घ्या किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच घ्या अशी मागणी केली आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस व मार्च महिन्यातही विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात. त्यामुळे त्या काळात व्यत्यय नको. त्यामुळेच जिल्हा पंचायत निवडणुका मार्च महिन्यात घेण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी फेरविचार करावा, अशी मागणी ढवळीकर यांनी केली आहे.