शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

माझा मुख्यमंत्रीपदावर कधीच दावा नसेल: दिगंबर कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 09:51 IST

'लोकमत'ने कामत यांना संपर्क करून सध्या चाललेल्या चर्चेविषयी मत विचारले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०२७ सालीही प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येईल, असे मी म्हणत असतो. मी स्वतः मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी पूर्वी मुख्यमंत्री होतो, आता नव्याने पुन्हा मी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी मुळीच इच्छा नाही व यापुढे असणारही नाही, असे दिगंबर कामत यांनी काल, शनिवारी स्पष्ट केले.

'लोकमत'ने कामत यांना संपर्क करून सध्या चाललेल्या चर्चेविषयी मत विचारले. कामत यांनी काही दिवसांपूर्वी मडगाव येथे भाजपच्या मतदार अभिनंदन संमेलनात प्रभावी भाषण केले होते. त्या भाषणाचा चुकीचा अर्थ काहीजणांनी लावला व राजकीय वाद सुरू झाला. कामत यांनी याविषयी शनिवारी 'लोकमत'ला सांगितले की, मी माझ्या भाषणात कुणाचेच नाव घेतले नव्हते. मी गोव्यातील कोणत्याच विरोधी आमदाराविषयी बोललो नव्हतो. माझ्या भाषणाचा व्हिडीओ तुम्ही काढून पहा. माझे भाषण ऐका, मी कुठेच गोव्याचा संदर्भ किंवा गोव्यातील आमदारांचा संदर्भ भाषणात दिलेला नाही.

दरम्यान, कामत म्हणाले की, देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १९ खासदार मिळाले व भाजपला सर्वांत जास्त खासदार लोकांनी दिले. तरीदेखील विरोधकांमधील काहीजणांना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडतात, असे मी भाषणात म्हणालो होतो. मी गोव्यात २०२७ साली विरोधकांपैकी कुणी आमदार मुख्यमंत्री होऊ पाहतो, असे म्हणालो नव्हतो. तसे कुणा विरोधी आमदाराचे नाव वगैरे घेऊन बोलणे हा माझा स्वभावच नव्हे.

मुख्यमंत्री सावंत यांनाच माझा पाठिंबा

तुम्ही मुख्यमंत्री पदावर यापुढे कधी दावा करणार नाही का? असे 'लोकमत'ने विचारले असता, कामत म्हणाले की, मी दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. मी भाजपमध्ये असल्याने माझा पाठिंधा मुख्यमंत्री सावंत यांना आहे. मी मुख्यमंत्री होण्याचा टप्पा आता राहिलेलाच नाही. तो टप्पा मी कधीच पार केला आहे. मी पूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होतो, आता पुन्हा तो टप्पा गाठण्याचा प्रश्नच नाही. मला ती इच्छादेखील नाहीं. मी मुख्यमंत्री म्हणून पूर्वी काम केले आहे. आता तो काळ राहिलेला नाही.

माझ्या भाषणाचा काहींनी चुकीचा अर्थ लावला

कामत म्हणाले की, मला आणखी कोणतेच नवे विधान करुन नवा वाद सुरु करायचा नाही. तुम्ही प्रतिक्रीया मला विचारली म्हणून सांगतो, मी गोव्यातील किंवा सासष्टीतील कोणत्या आमदारांविषयी काहीच बोललो नव्हतो. माझे भाषण जर नीट ऐकले तर प्रसार माध्यमांना वस्तुस्थिती कळून येईल. मी भाषण करताना माझ्या नजरेसमोर लोकसभा निवडणुकीचा निकाल होता. अलिकडेच काँग्रेसला केवळ ९९ जागा मिळाल्याने राहून गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, हा माझा मुळ मुद्दा होता. मात्र काही जणांनी चुकीचा समज पसरवला. आता प्रमोद सांवत हे आमचे नेते असून मी त्यांच्या नेतृत्वाशी सहमत आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाLokmatलोकमत