शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

माझा मुख्यमंत्रीपदावर कधीच दावा नसेल: दिगंबर कामत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 09:51 IST

'लोकमत'ने कामत यांना संपर्क करून सध्या चाललेल्या चर्चेविषयी मत विचारले.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : २०२७ सालीही प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार सत्तेवर येईल, असे मी म्हणत असतो. मी स्वतः मुख्यमंत्री पदावर दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मी पूर्वी मुख्यमंत्री होतो, आता नव्याने पुन्हा मी मुख्यमंत्री व्हावे, अशी माझी मुळीच इच्छा नाही व यापुढे असणारही नाही, असे दिगंबर कामत यांनी काल, शनिवारी स्पष्ट केले.

'लोकमत'ने कामत यांना संपर्क करून सध्या चाललेल्या चर्चेविषयी मत विचारले. कामत यांनी काही दिवसांपूर्वी मडगाव येथे भाजपच्या मतदार अभिनंदन संमेलनात प्रभावी भाषण केले होते. त्या भाषणाचा चुकीचा अर्थ काहीजणांनी लावला व राजकीय वाद सुरू झाला. कामत यांनी याविषयी शनिवारी 'लोकमत'ला सांगितले की, मी माझ्या भाषणात कुणाचेच नाव घेतले नव्हते. मी गोव्यातील कोणत्याच विरोधी आमदाराविषयी बोललो नव्हतो. माझ्या भाषणाचा व्हिडीओ तुम्ही काढून पहा. माझे भाषण ऐका, मी कुठेच गोव्याचा संदर्भ किंवा गोव्यातील आमदारांचा संदर्भ भाषणात दिलेला नाही.

दरम्यान, कामत म्हणाले की, देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला १९ खासदार मिळाले व भाजपला सर्वांत जास्त खासदार लोकांनी दिले. तरीदेखील विरोधकांमधील काहीजणांना पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पडतात, असे मी भाषणात म्हणालो होतो. मी गोव्यात २०२७ साली विरोधकांपैकी कुणी आमदार मुख्यमंत्री होऊ पाहतो, असे म्हणालो नव्हतो. तसे कुणा विरोधी आमदाराचे नाव वगैरे घेऊन बोलणे हा माझा स्वभावच नव्हे.

मुख्यमंत्री सावंत यांनाच माझा पाठिंबा

तुम्ही मुख्यमंत्री पदावर यापुढे कधी दावा करणार नाही का? असे 'लोकमत'ने विचारले असता, कामत म्हणाले की, मी दावा करण्याचा प्रश्नच येत नाही. मी भाजपमध्ये असल्याने माझा पाठिंधा मुख्यमंत्री सावंत यांना आहे. मी मुख्यमंत्री होण्याचा टप्पा आता राहिलेलाच नाही. तो टप्पा मी कधीच पार केला आहे. मी पूर्वी पाच वर्षे मुख्यमंत्रिपदी होतो, आता पुन्हा तो टप्पा गाठण्याचा प्रश्नच नाही. मला ती इच्छादेखील नाहीं. मी मुख्यमंत्री म्हणून पूर्वी काम केले आहे. आता तो काळ राहिलेला नाही.

माझ्या भाषणाचा काहींनी चुकीचा अर्थ लावला

कामत म्हणाले की, मला आणखी कोणतेच नवे विधान करुन नवा वाद सुरु करायचा नाही. तुम्ही प्रतिक्रीया मला विचारली म्हणून सांगतो, मी गोव्यातील किंवा सासष्टीतील कोणत्या आमदारांविषयी काहीच बोललो नव्हतो. माझे भाषण जर नीट ऐकले तर प्रसार माध्यमांना वस्तुस्थिती कळून येईल. मी भाषण करताना माझ्या नजरेसमोर लोकसभा निवडणुकीचा निकाल होता. अलिकडेच काँग्रेसला केवळ ९९ जागा मिळाल्याने राहून गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, हा माझा मुळ मुद्दा होता. मात्र काही जणांनी चुकीचा समज पसरवला. आता प्रमोद सांवत हे आमचे नेते असून मी त्यांच्या नेतृत्वाशी सहमत आहे.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणBJPभाजपाLokmatलोकमत