शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

सेरेंडिपिटीचा ‘शोध’ गोव्याला लागला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 21:45 IST

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे.

- राजू नायक

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असा दिमाखदार कला महोत्सव गोवा पहिल्यांदाच अनुभवतो आहे. त्यात चित्रकलेपासून, नाटक, सिनेमा, शिल्प, नृत्य असे सारे प्रकार सामावलेले आहेत. जगभरातील कलाकार आले आहेत. विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना गर्दी उडते आहे. 

सेरेंडिपिटी म्हणजे कलेच्या तत्त्वांचा शोध. नवीन दृष्टिकोनातून, एका अनामिक ओढीने घेतलेला शोध. कलेचा नवा शोध असाही अर्थ आपण घेऊ शकतो. त्यादृष्टीने गोव्याला सेरेंडिपिटीचा ‘शोध’ लागला का, याचा आपल्याला तपास करायचा आहे. 

मी एका कलाकाराला विचारलेही, एवढा मोठा खर्च, दिमाख, नवे प्रयोग एवढा उपक्रम असूनही तुम्हाला खरोखरीचा गोवा त्यात दिसला काय? तो म्हणाला नाही म्हणजे, वृत्तपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे, लोक गर्दी करताहेत. परंतु त्याला ‘गोव्याचा सहभाग’ म्हणता येईल का?

गोव्यात इफ्फी होतो. पहिली काही वर्षे गोव्याचे लोक कमी दिसायचे. परंतु आता 14 वर्षानंतर गोवा त्यात दिसतो. म्हणजे स्थानिक चित्रपट निर्माण होतात, गोव्याचे कलाकार चित्रपटांच्या विचार प्रक्रियेत सहभागी होतात, साधक-बाधक चर्चा होते. तसा उत्स्फूर्त प्रतिसाद सेरेंडिपिटीला नाही. 

त्याचे एक कारण, सेरेंडिपिटीचे संपूर्ण आयोजन दिल्लीतून होते. सारी टीम दिल्लीस्थित. ते सारे दिल्लीहून येतात- स्वयंसेवकांपासून ते छायाचित्रकारांपर्यंत.. त्यामुळे गोव्याची भूमिका केवळ प्रेक्षकाची राहते. काही चित्रकार तेवढे कला प्रदर्शनात आपली चित्रे-शिल्पे मांडतात. चित्रकार सुबोध केरकर यांच्या मते, या वर्षी सेरेंडिपिटीमध्ये स्थानिक चित्रकारांना वेगळे दालन दिलेले आहे आणि बहुतेकांची चित्रे विकलीही गेली. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळाले. परंतु ते असेही म्हणतात की हा महोत्सव ‘उच्चभ्रू’ बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यापासून दूर राहातो. ही उणीव भरून काढण्यासाठी महोत्सव खेडेगावांमध्येही न्यावा व लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी पावले उचलावी.

सेरेंडिपिटीमुळे पणजी राजधानीत कलेचे वेगवेगळे नमुने व फॉर्म लोकांना पाहायला मिळतात. परंतु शेवटी ही ‘कला’ श्रीमंत व उच्चभ्रू लोकांपुरतीच मर्यादित राहाते यात तथ्य आहे. या वर्षी महिलांचे व समलैंगिक घटकांचे प्रश्न, कलेतील वैविध्य, प्रामाणिकपणा असे विषय घेतले आहेत. दक्षिण आशियातील कलेला प्रोत्साहन देण्याचा तर या महोत्सवाचा प्रमुख उद्देश राहिला आहे. आयोजक या महोत्सवासाठी गोवा का निवडतात? कारण, गोवा हे कलेचे माहेरघर आहे असे त्यांना वाटते. गोव्यात जगभरचे लोक येतात. येथे कलेची कदर होते व समाज खराच प्रगल्भ आणि बुद्धिमान आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे. एक गोष्ट खरी आहे, कोणताही प्रयोग गोव्यात चांगल्या प्रकारे स्वीकारला जातो. येथे कलेला विधायक प्रतिसाद मिळतो. परंतु प्रश्न आहेय तो असे नवे प्रयोग व कलेतील तत्त्वे शहरी प्रेक्षकांपर्यंतच आपण नेणार आहोत काय? जोपर्यंत ही कला ग्रामीण भागात जाणार नाही, स्थानिकांना सहभागी करून घेणार नाही तोपर्यंत सरकारही चांगल्या प्रकारे त्यात सहभागी होणार नाही. गेली तीन वर्षे सेरेंडिपिटीमध्ये गोवा सरकारचा सहभाग नाममात्र राहिला आहे. वास्तविक सेरेंडिपिटीने गोव्याला कायमचे स्थान बनवावे, अशी अपेक्षा जेव्हा सरकार बाळगते तेव्हा वर्षभर त्यासाठी जागृतीचे कार्यक्रम चालले पाहिजेत. या वर्षी स्थानिक चित्रकार व अपंग, मुले यांना सामावून घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहिला तसा ग्रामीण परंपरागत कारागीर, पारंपरिक कलाकार, स्थानिक कलांचे विविध प्रकार यांनाही सहभागी करून घेणे शक्य आहे. वर्षभर तसा ‘शोध’ चालला पाहिजे. हा महोत्सव केवळ दरवर्षी गोव्यात होऊन चालणार नाही, तो गोव्यात ‘रुजला’ पाहिजे, तरच त्याचे महत्त्व वाढेल, संवर्धन होईल. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी