शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सेरेंडिपिटीचा ‘शोध’ गोव्याला लागला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 21:45 IST

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे.

- राजू नायक

गेला आठवडाभर गोव्यात सेरेंडिपिटी महोत्सव चालू आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात असा दिमाखदार कला महोत्सव गोवा पहिल्यांदाच अनुभवतो आहे. त्यात चित्रकलेपासून, नाटक, सिनेमा, शिल्प, नृत्य असे सारे प्रकार सामावलेले आहेत. जगभरातील कलाकार आले आहेत. विविध ठिकाणच्या कार्यक्रमांना गर्दी उडते आहे. 

सेरेंडिपिटी म्हणजे कलेच्या तत्त्वांचा शोध. नवीन दृष्टिकोनातून, एका अनामिक ओढीने घेतलेला शोध. कलेचा नवा शोध असाही अर्थ आपण घेऊ शकतो. त्यादृष्टीने गोव्याला सेरेंडिपिटीचा ‘शोध’ लागला का, याचा आपल्याला तपास करायचा आहे. 

मी एका कलाकाराला विचारलेही, एवढा मोठा खर्च, दिमाख, नवे प्रयोग एवढा उपक्रम असूनही तुम्हाला खरोखरीचा गोवा त्यात दिसला काय? तो म्हणाला नाही म्हणजे, वृत्तपत्रांनी, प्रसारमाध्यमांनी दखल घेतली आहे, लोक गर्दी करताहेत. परंतु त्याला ‘गोव्याचा सहभाग’ म्हणता येईल का?

गोव्यात इफ्फी होतो. पहिली काही वर्षे गोव्याचे लोक कमी दिसायचे. परंतु आता 14 वर्षानंतर गोवा त्यात दिसतो. म्हणजे स्थानिक चित्रपट निर्माण होतात, गोव्याचे कलाकार चित्रपटांच्या विचार प्रक्रियेत सहभागी होतात, साधक-बाधक चर्चा होते. तसा उत्स्फूर्त प्रतिसाद सेरेंडिपिटीला नाही. 

त्याचे एक कारण, सेरेंडिपिटीचे संपूर्ण आयोजन दिल्लीतून होते. सारी टीम दिल्लीस्थित. ते सारे दिल्लीहून येतात- स्वयंसेवकांपासून ते छायाचित्रकारांपर्यंत.. त्यामुळे गोव्याची भूमिका केवळ प्रेक्षकाची राहते. काही चित्रकार तेवढे कला प्रदर्शनात आपली चित्रे-शिल्पे मांडतात. चित्रकार सुबोध केरकर यांच्या मते, या वर्षी सेरेंडिपिटीमध्ये स्थानिक चित्रकारांना वेगळे दालन दिलेले आहे आणि बहुतेकांची चित्रे विकलीही गेली. या महोत्सवामुळे स्थानिक कलाकारांना चांगले व्यासपीठ मिळाले. परंतु ते असेही म्हणतात की हा महोत्सव ‘उच्चभ्रू’ बनला आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणूस त्यापासून दूर राहातो. ही उणीव भरून काढण्यासाठी महोत्सव खेडेगावांमध्येही न्यावा व लोकांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी पावले उचलावी.

सेरेंडिपिटीमुळे पणजी राजधानीत कलेचे वेगवेगळे नमुने व फॉर्म लोकांना पाहायला मिळतात. परंतु शेवटी ही ‘कला’ श्रीमंत व उच्चभ्रू लोकांपुरतीच मर्यादित राहाते यात तथ्य आहे. या वर्षी महिलांचे व समलैंगिक घटकांचे प्रश्न, कलेतील वैविध्य, प्रामाणिकपणा असे विषय घेतले आहेत. दक्षिण आशियातील कलेला प्रोत्साहन देण्याचा तर या महोत्सवाचा प्रमुख उद्देश राहिला आहे. आयोजक या महोत्सवासाठी गोवा का निवडतात? कारण, गोवा हे कलेचे माहेरघर आहे असे त्यांना वाटते. गोव्यात जगभरचे लोक येतात. येथे कलेची कदर होते व समाज खराच प्रगल्भ आणि बुद्धिमान आहे असे आयोजकांचे म्हणणे आहे. एक गोष्ट खरी आहे, कोणताही प्रयोग गोव्यात चांगल्या प्रकारे स्वीकारला जातो. येथे कलेला विधायक प्रतिसाद मिळतो. परंतु प्रश्न आहेय तो असे नवे प्रयोग व कलेतील तत्त्वे शहरी प्रेक्षकांपर्यंतच आपण नेणार आहोत काय? जोपर्यंत ही कला ग्रामीण भागात जाणार नाही, स्थानिकांना सहभागी करून घेणार नाही तोपर्यंत सरकारही चांगल्या प्रकारे त्यात सहभागी होणार नाही. गेली तीन वर्षे सेरेंडिपिटीमध्ये गोवा सरकारचा सहभाग नाममात्र राहिला आहे. वास्तविक सेरेंडिपिटीने गोव्याला कायमचे स्थान बनवावे, अशी अपेक्षा जेव्हा सरकार बाळगते तेव्हा वर्षभर त्यासाठी जागृतीचे कार्यक्रम चालले पाहिजेत. या वर्षी स्थानिक चित्रकार व अपंग, मुले यांना सामावून घेण्याचा आयोजकांचा प्रयत्न राहिला तसा ग्रामीण परंपरागत कारागीर, पारंपरिक कलाकार, स्थानिक कलांचे विविध प्रकार यांनाही सहभागी करून घेणे शक्य आहे. वर्षभर तसा ‘शोध’ चालला पाहिजे. हा महोत्सव केवळ दरवर्षी गोव्यात होऊन चालणार नाही, तो गोव्यात ‘रुजला’ पाहिजे, तरच त्याचे महत्त्व वाढेल, संवर्धन होईल. 

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)

टॅग्स :goaगोवाIFFIइफ्फी