शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

“जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेलं बरं, सद्बुद्धी तरी मिळेल”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:47 IST

संजय राऊत जे डायलॉग ते मारतात, ते पाचवीतील मुलेही मारत नाहीत, त्यांना कोण घाबरणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

पणजी: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता नवीन मुद्द्याची भर पडली आहे. मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तुमच्या मंत्र्यांप्रमाणे जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेले बरे, तिथे गेल्याने सद्बुद्धी मिळेल, असा टोला भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस आताच्या घडीला गोव्यात प्रचारात मग्न आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावर, राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर आक्षेप घेता कामा नये. तुमचे मंत्री जेलमध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगताही येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा, राजभवनावर गेल्यावर सद्बुद्धी मिळेल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल

महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल. त्यामुळे सद्बुद्धी घेण्यासाठी तरी राज्यभवनावर जावे, असे सांगत संजय राऊत जे डायलॉग ते मारतात, ते पाचवीतील मुलेही मारत नाहीत, कोण घाबरणार यांना, ते अस्वस्थ आहेत, ते दिसते आहे. त्यामुळे मनात येईल, ते बोलायचे हे कोण खपवून घेणार नाही. कुणी काही बोलून चालत नसते, जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना दिले. ते टीव्ही ९ शी बोलत होते. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजप नेते सारखे राजभवनावर राज्यपलांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात. त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या. पण, मलबार हिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सोमय्या यांच्या हत्येचा कट दिसतोय. लोकशाही, पुरोगामी महाराष्ट्र हाच काय, तुमचे भष्ट्राचार बाहेर काढले तर मारायचे का, असा थेट सवाल करत तुम्ही काही केले तरी भष्ट्राचार बाहेर काढणार. तुम्ही अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे