शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

“जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेलं बरं, सद्बुद्धी तरी मिळेल”; देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 20:47 IST

संजय राऊत जे डायलॉग ते मारतात, ते पाचवीतील मुलेही मारत नाहीत, त्यांना कोण घाबरणार, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

पणजी: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात आता नवीन मुद्द्याची भर पडली आहे. मुंबईतील राजभवन येथील दरबार हॉलचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. तुमच्या मंत्र्यांप्रमाणे जेलमध्ये जाण्यापेक्षा राजभवनावर गेलेले बरे, तिथे गेल्याने सद्बुद्धी मिळेल, असा टोला भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. 

देवेंद्र फडणवीस आताच्या घडीला गोव्यात प्रचारात मग्न आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेसंदर्भात विचारणा करण्यात आली. यावर, राजभवर जाणे म्हणजे ती योग्य जागा आहे, त्या ठिकाणावर तर आक्षेप घेता कामा नये. तुमचे मंत्री जेलमध्ये जातायत. आणखी तुमचे मंत्री कुठे कुठे जातायत हे मला सांगताही येत नाही. त्यामुळे राजभवनावरच्या हिरवळीवर जा, राजभवनावर गेल्यावर सद्बुद्धी मिळेल, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल

महाराष्ट्राची लूट चालली आहे, ती बंद होईल. त्यामुळे सद्बुद्धी घेण्यासाठी तरी राज्यभवनावर जावे, असे सांगत संजय राऊत जे डायलॉग ते मारतात, ते पाचवीतील मुलेही मारत नाहीत, कोण घाबरणार यांना, ते अस्वस्थ आहेत, ते दिसते आहे. त्यामुळे मनात येईल, ते बोलायचे हे कोण खपवून घेणार नाही. कुणी काही बोलून चालत नसते, जशाच तसे उत्तर देऊ. आम्ही अशा गोष्टी ऐकणार नाही, असे प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना दिले. ते टीव्ही ९ शी बोलत होते. 

काय म्हणाले होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाजप नेते सारखे राजभवनावर राज्यपलांकडे जातात आणि राज्य सरकारची तक्रार करतात. त्यावर बोलताना राजकीय हवा कशीही असू द्या. पण, मलबार हिलची हवा चांगली असते, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. या आवारात मोरही आहेत. विषारी नागही आहेत. सर्प मित्रांनी नागांचे पकडलेले फोटो आपण पाहतच असतो, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांचा जो व्हिडिओ समोर आला आहे. त्यात सोमय्या यांच्या हत्येचा कट दिसतोय. लोकशाही, पुरोगामी महाराष्ट्र हाच काय, तुमचे भष्ट्राचार बाहेर काढले तर मारायचे का, असा थेट सवाल करत तुम्ही काही केले तरी भष्ट्राचार बाहेर काढणार. तुम्ही अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे