शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 12:52 IST

गुन्हेगारीत ६० टक्के बाहेरील लोकांचा समावेश: अधीक्षक वाल्सन.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'विदेशी गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी म्हापसा येथे स्थापन करण्यात आलेले स्थानबद्धता केंद्राचा खूप चांगला परिणाम दिसून आला आहे. विदेशी संशयितांची गोव्यातील गुन्हेगारी मोडून काढण्यास हे केंद्र कारणीभूत ठरले आहे. त्यामुळे राज्यात आज विदेशींची गुन्हेगारी संपली आहे,' असे उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले. 'लोकमत'शी केलेल्या अनौपचारिक वार्तालापात ते बोलत होते.

गोव्यात होणाऱ्या गुन्ह्यात राज्याबाहेरील लोकांचा ६० टक्क्यांहून अधिक समावेश आढळून आला आहे. शेजारील राज्यातील नागरिक यात अधिक असल्याचेही ते म्हणाले. अधीक्षक वाल्सन म्हणाले की, १२ वर्षापूर्वी पर्वरी येथे महामार्गावर घडलेल्या प्रकाराचा बोध घेऊन पोलिस प्रशासनाने हा विषय अत्यंत गांभीर्याने हाताळला. अशा समस्यांचा कायम स्वरूपी बंदोबस्त केला आहे. त्यामुळे राज्यात आज गुन्हेगारी वृत्तीच्या विदेशींचा जमाव एकत्र येऊ शकत नाही' असे त्यांनी सांगितले.

'राज्यात गुन्हे वाढलेले नाहीत. परंतु गुन्ह्यांचा छडा लावण्याचे प्रमाणही वाढले आहे, अनेक गुन्हे घडण्यापूर्वीच खबरदारी घेऊन ते घडू न देण्याचे काम खूप वेळा करण्यात आले आहे. जे गुन्हे होतात, त्यात शेजारील राज्यांतील संशयितांचा समावेश अधिक आढळून आला आहे' असे अधीक्षक वाल्सन यांनी सांगितले. ते म्हणाले की, 'खात्याच्या गुन्हेविषयक आकडेवारीनुसार राज्यात गुन्हे कमी झाल्याचे दर्शवित आहेत. परंतु अलीकडे घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याची माहिती सोशल मीडियावरून सर्वांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांचे प्रमाण मोठे असल्याचे चित्र बनत आहे.

सायबर जागृती झाली, पण...

'राज्यात सायबर गुन्ह्यांबाबत खूप चांगली जागृती झाली आहे. त्यामुळे ओटीपी मिळवून फसवणूक करण्यचे प्रकार आता फार कमी झाले आहे. राज्यातील लोक आता ओटीपी कोणालाही देत नाहीत. परंतु सायबर गुन्हेगारांच्या मोडस ओपरेन्डी वेगाने बदलतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने फसवणूक करीत असतात. त्यामुळे मोबाइल हाताळताना खूप सावध राहण्याची गरज आहे' असे मत पोलिस अधीक्षक वाल्सन यांनी व्यक्त केले.

 

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिसLokmatलोकमत