शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 12:11 IST

विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले. नेतृत्वहीन बनून आम्ही लोकांकडे जाऊ शकत नाही, अशी भावना गोव्यातील भाजपामध्ये आणि भाजपाच्या काही मंत्री व आमदारांमध्ये प्रबळ बनण्यास आरंभ झाला.भाजपाचे एक मंत्री व एक आमदार तर मुख्यमंत्रीपदासाठी नव्याने फिल्डींग लावू लागले आहेत.

पणजी : विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या पाचपैकी तीन राज्यांमध्ये भाजपाच्या वाट्याला आलेली स्थिती पाहता गोव्यात मुख्यमंत्री बदलाच्या मागणीला आता वेग येणार आहे हे स्पष्ट झाले. नेतृत्वहीन बनून आम्ही लोकांकडे जाऊ शकत नाही, अशी भावना गोव्यातील भाजपामध्ये आणि भाजपाच्या काही मंत्री व आमदारांमध्ये प्रबळ बनण्यास आरंभ झाला आहे. भाजपाचे एक मंत्री व एक आमदार तर मुख्यमंत्रीपदासाठी नव्याने फिल्डींग लावू लागले आहेत.

येत्या 19 डिसेंबर रोजी गोवा मुक्तीदिन असून त्यावेळी मुख्य शासकीय सोहळ्यात साखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत हे झेंडावंदन करणार आहेत. एरव्ही हा मान मुख्यमंत्र्यांकडे असतो पण मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आजारी असल्याने व ते घराबाहेर पडू शकत नसल्याने गोव्यात सभापती सावंत यांच्याकडे हा मान जात आहे. गेल्या 15 ऑगस्ट रोजीही सावंत यांनीच मुख्य शासकीय सोहळ्यात झेंडा फडकविला होता. दुसऱ्याबाजूने भाजपाच्या एका महत्त्वाकांक्षी मंत्र्याला हे आवडलेले नाही. गोव्यात आता नव्याने नेता बदलला जायला हवा, भाजपाचा नेता कोण व लोकसभा निवडणुकीवेळी गोव्यात भाजपाचे नेतृत्व कोण करील याबाबत अधिक स्पष्टता यायला हवी, अशी चर्चा भाजपाच्या काही आमदारांमध्ये व मंत्र्यांमध्येही सुरू झाली आहे.

2012 साली गोव्यात भाजपाचा पराभव झाला होता. त्यावेळी केंद्रात पर्रीकर संरक्षण मंत्री होते. आता नेतृत्व बदल केला नाही तर छत्तीसगडसारखी स्थिती गोव्यात उद्भवेल अशा प्रकारची प्रतिक्रिया भाजपाच्या एका आमदाराने आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सोमवारी लोकमतकडे व्यक्त केली. विविध राज्यांचे निवडणूक निकाल हे गोव्यात आमच्या डोळ्यांमध्ये अंजन टाकण्यास पुरेसे आहेत, असे हे आमदार म्हणाले. मुख्यमंत्री सचिवालयात येऊ शकत नसल्याने प्रशासन ठप्प झाल्याची टीका चारहीबाजूंनी होत आहे व या टीकेला भाजपा अजून प्रबळ उत्तर देऊ शकलेला नाही. मगोप, गोवा फॉरवर्ड व अपक्ष हे पर्रीकर सरकारचे घटक आहेत. आता त्यांचे वजन गोवा सरकारमध्ये थोडे वाढेल अशी चर्चा राजकीय गोटात सुरू आहे. दुसऱ्या बाजूने विरोधी काँग्रेस पक्ष गोव्यात अधिक आक्रमक होईल याचीही कल्पना भाजपाला सोमवारी आली.

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपाPoliticsराजकारण