शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

ढवळी येथील भंगार आग प्रकरण: भरलेला संसार सुद्धा बेचिराख

By आप्पा बुवा | Updated: May 8, 2023 23:23 IST

भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली आहेत.

अजय बुवा, फोंडाः शुक्रवारी ढवळी येथील भंगार अड्ड्याला लागलेल्या भीषण आगीत भंगार अड्डा बेचिराख झालाच.स्क्रॅप यार्डात  असलेला प्रत्येक नग आगीच्या भक्षस्थानी पडला.ह्या बरोबर ह्या आगीत दोन संसार सुद्धा बेचिराख झालेले आहेत. भंगार अड्ड्याच्या बाजूला असणारी दोन कुटुंबे सुद्धा ह्या आगीत होरपळून निघाली  आहेत.

सदर भंगार अड्ड्याच्या बाजूलाच काही भाडोत्री खोल्या आहेत. काही खोल्यांमध्ये गवंडी काम करणारी दोन कुटुंबे राहात होती. त्या दोन्ही कुटुंबात संसाराला ज्ये गोष्टी पाहिजे असतात त्या सगळ्या भरलेल्या होत्या . टीव्ही, फ्रिज, सिलेंडर, गृहोपयोगी वस्तू.कपडेलत्ते,जेवणाला लागणारे किराणामाल इत्यादी इत्यादी .ज्यावेळी भीषण आग लागली त्यावेळी घरातील कर्ते पुरुष नमाज साठी मस्जिद मध्ये गेले होते. तर लहान मुले जेवायला बसणार होती. घरातील स्त्रिया जेवणाची अंतिम तयारी चालू करण्यात मग्न होती. एवढ्यातच आगेचा लोट स्क्रॅप यार्डातून त्या दोन्ही घरात घुसला. काही कळायच्या आत दोन्ही कुटुंबातील खोल्या आगीच्या भक्षस्थानी पडल्या. एकही कागदाचा चिटोर काढण्यासाठी त्यांना संधी मिळाली नाही. घरात जेवढे सामान भरले होते ते बेचिराख झाले.पै  पैसे जमवून जे काही किरकोळ दागिने करण्यात आले होते ते दागिने सुद्धा पूर्णपणे आगीत वितळून गेले. खोल्याच्या भिंती डोळ्यासमोरच पडल्या. अंगावर घातलेल्या कपड्यांवर  ती दोन्ही कुटुंबीय जे बाहेर पडले ते अजून बाहेरच आहेत. आणखीन दोन-तीन दिवस त्यांना ओळखीचे व बाकीचे जेवू खाऊ घालतील. आयुष्यभर काही त्यांना कोणी पोसायच्या भानगडीत पडणार नाही.

थोडक्यात या दोन्ही कुटूंबाला पुन्हा नव्याने संसार उभा करावा लागेल. जे काही पण जे होते ते आगीच्या भक्षस्थानी पडले. आता पुन्हा एकदा संसाराला लागणारा प्रत्येक नग मिळवावा लागेल. तो बसवावा लागेल.त्या आगीत एका व्यवसायिकाचे स्वप्न जसे भस्मसात झाले त्याचबरोबर बाजूला असणारी   दोन गरीब कुटुंबे सुद्धा उद्ध्वस्त झाली आहेत.

वखार कुणाची वाट बघते?

सदर स्क्रॅप यार्डाच्या बाजूला एक लाकडाची वखार सुद्धा आहे. जिथे मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवून ठेवण्यात आले आहे. नशीब त्या दिवशी वखार वर आगीची वक्रदृष्टी पडली नाही. अन्यथा आणखीन एक मोठी आग लागली असती. आज ती आग  जरी आटोक्यात आली असली तरी काही ठिकाणी अजून धूमसत आहे. उद्या वाऱ्याच्या झोक्या बरोबर एखादी चिंगारी या वखारीवर पडली तर पुन्हा एकदा आहाकार माजू शकतो. कारण बाजूलाच आणखीन काही कुटुंबे राहात आहेत. मुख्य बाब म्हणजे ज्या खोल्या येथे बांधण्यात आल्या आहेत त्या कायदेशीर असण्याची शक्यता खूपच कमी आहे. तेव्हा प्रशासनाने वखार हलविण्यात जर  अडथळे निर्माण होत असतील तर निदान त्या खोल्या संबंधित चौकशी करावी. जेणेकरून भविष्यातील आणखीन एक अनर्थ टाळता येऊ शकतो.

टॅग्स :goaगोवाfireआग