शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:59 IST

गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देगोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर टीका केली. 

पणजी - गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ आयोजित निषेध सभेत बोलताना पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी ही घोषणा केली. 

एका बाजूने नवीन आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन राजभवनावर त्यांचा शपथविधी व्हायला अर्धा तास असताना सरदेसाई यांच्याकडून सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. तसे पत्रही ते राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याचे दु:ख नाही, परंतु भाजपाने विश्वासाला तडा दिल्यामुळे वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्या असताना या पक्षाचे सरकार स्थापन करण्यास गोवा फॉरवर्डने भक्कम पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर हे एकमेव नेते मुख्यमंत्री म्हणून पात्र होते आणि त्यांना गोवा फॉरवर्डने शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते. हे वचन पक्षाने शेवटपर्यंत पाळले. पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात काही भाजपा आमदार काँग्रेसमध्ये उडी घेऊन काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या हालचालीत होते, परंतु गोवा फॉरवर्डने आणि अपक्ष असलेले रोहन खंवटे यांनी हे होवू दिले नाही. चौघेही सरकारच्या पाठिमागे खंबीरपणे राहिले. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपाने पर्रीकर यांची तत्वे पायदळी तुडविली असे सरदेसाई म्हणाले. पर्रीकर यांचे शारिरीक दृष्ट्या मृत्यू पूर्वी झाला होता परंतु त्यांचा राजकीय मृत्यू आता झाला आहे आणि तो त्याच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे असे ते म्हणाले. 

मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजपा आमदार भाजपाचे सरकार पाडू पाहत होते. त्यावेळी गोवा फॉरवर्ड व ते स्वत: खंबीर राहिल्याचे ते म्हणाले. सध्या अत्यंत घृणास्पद राजकारण चालविले जात आहे.  सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात काय चालले आहे ते काही कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. कधाचित या दलदलीतून त्यांनी बाहेर पडावे असे देवालाच वाटले असावे. सरकारात असताना एनडीएचा भाग बनून प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पर्वरी मतदारसंघात भाजपाला ३९९६ मतांची आघाडी मिळवून दिली होती व भाजपाला स्वत:च्या कळंगूट मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती याचा उल्लेखही त्यांनी केला. पणजीची जागा बाबूश मोंसेरात यांना पूर्वीच भेट दिली होती हा संशय आता बळावत असलयाचे त्यांनी सांगितले. इतर दोन पदच्चूत मंत्री जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर यावेळी टीका केली. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर