शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:59 IST

गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देगोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर टीका केली. 

पणजी - गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ आयोजित निषेध सभेत बोलताना पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी ही घोषणा केली. 

एका बाजूने नवीन आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन राजभवनावर त्यांचा शपथविधी व्हायला अर्धा तास असताना सरदेसाई यांच्याकडून सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. तसे पत्रही ते राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याचे दु:ख नाही, परंतु भाजपाने विश्वासाला तडा दिल्यामुळे वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्या असताना या पक्षाचे सरकार स्थापन करण्यास गोवा फॉरवर्डने भक्कम पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर हे एकमेव नेते मुख्यमंत्री म्हणून पात्र होते आणि त्यांना गोवा फॉरवर्डने शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते. हे वचन पक्षाने शेवटपर्यंत पाळले. पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात काही भाजपा आमदार काँग्रेसमध्ये उडी घेऊन काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या हालचालीत होते, परंतु गोवा फॉरवर्डने आणि अपक्ष असलेले रोहन खंवटे यांनी हे होवू दिले नाही. चौघेही सरकारच्या पाठिमागे खंबीरपणे राहिले. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपाने पर्रीकर यांची तत्वे पायदळी तुडविली असे सरदेसाई म्हणाले. पर्रीकर यांचे शारिरीक दृष्ट्या मृत्यू पूर्वी झाला होता परंतु त्यांचा राजकीय मृत्यू आता झाला आहे आणि तो त्याच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे असे ते म्हणाले. 

मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजपा आमदार भाजपाचे सरकार पाडू पाहत होते. त्यावेळी गोवा फॉरवर्ड व ते स्वत: खंबीर राहिल्याचे ते म्हणाले. सध्या अत्यंत घृणास्पद राजकारण चालविले जात आहे.  सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात काय चालले आहे ते काही कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. कधाचित या दलदलीतून त्यांनी बाहेर पडावे असे देवालाच वाटले असावे. सरकारात असताना एनडीएचा भाग बनून प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पर्वरी मतदारसंघात भाजपाला ३९९६ मतांची आघाडी मिळवून दिली होती व भाजपाला स्वत:च्या कळंगूट मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती याचा उल्लेखही त्यांनी केला. पणजीची जागा बाबूश मोंसेरात यांना पूर्वीच भेट दिली होती हा संशय आता बळावत असलयाचे त्यांनी सांगितले. इतर दोन पदच्चूत मंत्री जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर यावेळी टीका केली. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर