शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

गोवा फॉरवर्डने सरकारचा पाठिंबा काढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2019 17:59 IST

गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.

ठळक मुद्देगोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे.मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर टीका केली. 

पणजी - गोवा फॉरवर्ड पक्षाने भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचे जाहीर केले आहे. पक्षाच्या तिन्ही आमदारांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आल्यानंतर माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या समाधीस्थळाजवळ आयोजित निषेध सभेत बोलताना पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी ही घोषणा केली. 

एका बाजूने नवीन आमदारांना मंत्रिमंडळात सामावून घेऊन राजभवनावर त्यांचा शपथविधी व्हायला अर्धा तास असताना सरदेसाई यांच्याकडून सरकारचा पाठिंबा काढून घेण्यात आल्याची घोषणा केली. तसे पत्रही ते राज्यपालांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याचे दु:ख नाही, परंतु भाजपाने विश्वासाला तडा दिल्यामुळे वाईट वाटल्याचे त्यांनी सांगितले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अवघ्या १३ जागा मिळाल्या असताना या पक्षाचे सरकार स्थापन करण्यास गोवा फॉरवर्डने भक्कम पाठिंबा दिला. मनोहर पर्रीकर हे एकमेव नेते मुख्यमंत्री म्हणून पात्र होते आणि त्यांना गोवा फॉरवर्डने शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले होते. हे वचन पक्षाने शेवटपर्यंत पाळले. पर्रीकर यांच्या आजारपणाच्या काळात काही भाजपा आमदार काँग्रेसमध्ये उडी घेऊन काँग्रेस सरकार स्थापन करण्याच्या हालचालीत होते, परंतु गोवा फॉरवर्डने आणि अपक्ष असलेले रोहन खंवटे यांनी हे होवू दिले नाही. चौघेही सरकारच्या पाठिमागे खंबीरपणे राहिले. पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपाने पर्रीकर यांची तत्वे पायदळी तुडविली असे सरदेसाई म्हणाले. पर्रीकर यांचे शारिरीक दृष्ट्या मृत्यू पूर्वी झाला होता परंतु त्यांचा राजकीय मृत्यू आता झाला आहे आणि तो त्याच्या पक्षातील नेत्यांनी केला आहे असे ते म्हणाले. 

मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेले दुसरे मंत्री रोहन खंवटे यांनीही भाजपा सरकारवर जोरदार टीका केली. ज्यावेळी भाजपा आमदार भाजपाचे सरकार पाडू पाहत होते. त्यावेळी गोवा फॉरवर्ड व ते स्वत: खंबीर राहिल्याचे ते म्हणाले. सध्या अत्यंत घृणास्पद राजकारण चालविले जात आहे.  सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या व त्यांच्या नेत्यांच्या डोक्यात काय चालले आहे ते काही कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. कधाचित या दलदलीतून त्यांनी बाहेर पडावे असे देवालाच वाटले असावे. सरकारात असताना एनडीएचा भाग बनून प्रामाणिकपणे काम केल्याचे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच पर्वरी मतदारसंघात भाजपाला ३९९६ मतांची आघाडी मिळवून दिली होती व भाजपाला स्वत:च्या कळंगूट मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती याचा उल्लेखही त्यांनी केला. पणजीची जागा बाबूश मोंसेरात यांना पूर्वीच भेट दिली होती हा संशय आता बळावत असलयाचे त्यांनी सांगितले. इतर दोन पदच्चूत मंत्री जयेश साळगावकर व विनोद पालयेकर यांनीही सरकारवर यावेळी टीका केली. 

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेसManohar Parrikarमनोहर पर्रीकर