शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

धोक्याची घंटा, गोव्याचा केरळ होणे अशक्य पण संकटे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 22:55 IST

आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात  पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे.

पणजी: आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात  पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही टेकड्या कोसळणे, डोंगर खाली येणे असे प्रकार होवू शकतात. त्यामुळे पूर्वीच खबरदारीचे उपाय घेणे शहाणपणाचे ठरेल असे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

एनआयओचे शास्त्रज्ञ डॉ.ए.के सरन यांनी यासंबंधी माहिती देताना म्हणाले, ‘गोव्यात पूर्वेला डोंगराळ भाग तर पश्चिमेला किनारपट्टी भाग आहे. किनारपट्टी असली तरी मोठ्या प्रमाणावर सखल प्रदेश नाहीत. जे काही सखल प्रदेश असतील त्या ठिकाणची जागा मोकळी ठेवणे उचित ठरणार आहे. अशा ठिकाणी बांधकामे होवू देऊ नये. गोव्यात केरळसारख्या मोठ्या नद्या नाहीत, असे असतानाही काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये तळपण, गाळजीबाग व पैंगीण या छोट्या नद्यांनी केलेला कहर लक्षात घेता खबरदारी घेणे अगत्याचे ठरत आहे. नदीचे दोन्ही काठ भरून पाणच्या पातळीने 2 मीटर अधिक उंची गाठली तर पाणी कुठे कुठे पोहोचू शकते याचा अभ्यास, आखणी व खबरदारीच्या उपाय योजना करून ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी टेकड्या कोसळण्याचा धोका अधिक आहे. कुठे कुठे टेकड्या कोसळण्याची शक्यता आहे, अशा जागांचीही पाहणी करुन उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. एनआयओचे आणखी एक शास्त्रज्ञ डॉ बबन हिंगोले यांनीही खबरदारी घेणे नितांत आवश्यक असल्याचे सांगितले.

केरळसारखी गोव्यात परिस्थिती नाही हे खरे आहे, परंतु मेरशी, पोंबुर्फा, पणजी व इतर काही ठिकाणी बरेच सखल भाग आहेत. करेळमध्ये नद्यांतील पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे हे पूरासाठी मुख्य कारण ठरले आहे. तशी परिस्थिती येथे होवू देता कामा नये. परिस्थिती कशी होवू नये याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे पाटो-पणजी या ठिकाणी झालेली इमारतींची दाटी. काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये आलेल्या पुराने काय परिस्थिती निर्माण केली होती, याचे स्मरणही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :goaगोवाKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस