शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
4
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
5
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
6
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
7
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
8
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
9
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
10
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
11
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
12
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
13
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
14
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
18
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
19
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
20
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...

धोक्याची घंटा, गोव्याचा केरळ होणे अशक्य पण संकटे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2018 22:55 IST

आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात  पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे.

पणजी: आजच्या परिस्थितीत 24 तासात राज्यात मोठ्या प्रमाणात  पाऊस पडल्यास गोव्यातही नैसर्गिक आपत्ती ओढवू शकते. केरळसारखे सखल प्रदेश व मोठ्या नद्या गोव्यात नसल्यामुळे एवढा मोठा महापूर ओढविण्याची शक्यता फार कमी आहे. तरीही टेकड्या कोसळणे, डोंगर खाली येणे असे प्रकार होवू शकतात. त्यामुळे पूर्वीच खबरदारीचे उपाय घेणे शहाणपणाचे ठरेल असे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या (एनआयओ)शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 

एनआयओचे शास्त्रज्ञ डॉ.ए.के सरन यांनी यासंबंधी माहिती देताना म्हणाले, ‘गोव्यात पूर्वेला डोंगराळ भाग तर पश्चिमेला किनारपट्टी भाग आहे. किनारपट्टी असली तरी मोठ्या प्रमाणावर सखल प्रदेश नाहीत. जे काही सखल प्रदेश असतील त्या ठिकाणची जागा मोकळी ठेवणे उचित ठरणार आहे. अशा ठिकाणी बांधकामे होवू देऊ नये. गोव्यात केरळसारख्या मोठ्या नद्या नाहीत, असे असतानाही काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये तळपण, गाळजीबाग व पैंगीण या छोट्या नद्यांनी केलेला कहर लक्षात घेता खबरदारी घेणे अगत्याचे ठरत आहे. नदीचे दोन्ही काठ भरून पाणच्या पातळीने 2 मीटर अधिक उंची गाठली तर पाणी कुठे कुठे पोहोचू शकते याचा अभ्यास, आखणी व खबरदारीच्या उपाय योजना करून ठेवणे आवश्यक आहे. या ठिकाणी टेकड्या कोसळण्याचा धोका अधिक आहे. कुठे कुठे टेकड्या कोसळण्याची शक्यता आहे, अशा जागांचीही पाहणी करुन उपाययोजना केल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. एनआयओचे आणखी एक शास्त्रज्ञ डॉ बबन हिंगोले यांनीही खबरदारी घेणे नितांत आवश्यक असल्याचे सांगितले.

केरळसारखी गोव्यात परिस्थिती नाही हे खरे आहे, परंतु मेरशी, पोंबुर्फा, पणजी व इतर काही ठिकाणी बरेच सखल भाग आहेत. करेळमध्ये नद्यांतील पाण्याचा निचरा होण्याच्या मार्गात निर्माण झालेले अडथळे हे पूरासाठी मुख्य कारण ठरले आहे. तशी परिस्थिती येथे होवू देता कामा नये. परिस्थिती कशी होवू नये याचे अत्यंत बोलके उदाहरण म्हणजे पाटो-पणजी या ठिकाणी झालेली इमारतींची दाटी. काही वर्षांपूर्वी काणकोणमध्ये आलेल्या पुराने काय परिस्थिती निर्माण केली होती, याचे स्मरणही करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :goaगोवाKerala Floodsकेरळ पूरRainपाऊस