शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Cyclone Tauktae : गोव्यात वादळामुळे प्रचंड हाणी; केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य मिळेल, अमित शहा यांची ग्वाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 16:30 IST

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे.

पणजी : गोव्यात वादळाने जी प्रचंड हानी केली आहे, त्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चौकशी केली व गोव्यातील स्थिती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडून सर्व सहाय्य तथा पाठींबा मिळेल, अशी ग्वाही दिली आहे. (Cyclone Tauktae: Massive damage due to storms in Goa; All assistance will be provided by the central government says Amit Shah)

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. उत्तर व दक्षिण गोव्यात वीज खांब तुटणे, वीज तारा तुटून वीज खंडीत होणे, घरांवर माड पडणे, आंबा, फणसाची झाडे पडणे, भींती खचणे, दीडशे घरांची छोटी- मोठी हानी होणे, टेलिफोन तारा तुटणे, रस्त्यांवर झाडे पडणे अशी बरीच हानी झालेली आहे. शहा यांचा फोन आला तेव्हा मुख्यमंत्र्यांनी शहा यांना याविषयीची कल्पना दिली. राज्यात वादळामुळे दोघांचा बळी गेला व चौघे जखमी झाले. आपत्त्कालीन निधीतून राज्य सरकारने लोकांना मदत करण्याची ग्वाही दिलेली आहे. वादळामुळे ज्यांची हानी झाली त्यांना गोवा सरकार सहाय्य करील, असे मुख्यमंत्र्यांनीही सोमवारी म्हटले आहे.

अनेक गावे अंधारातदरम्यान, तिसवाडी, फोंडा, सत्तरी, सांगे, केपे, काणकोण, पेडणे, डिचोली, बार्देश, धारबांदोडा आदी तालुक्यांतील अनेक गावांमध्ये शनिवारी रात्री वीज पुरवठा खंडीत झाला होता. सोमवारी दुपारपर्यंत तिथे वीज सुरळीत झाली नाही. पणजी व काही शहरांमधील वीज पुरवठा सुरळीत झाला. वीज खात्याची यंत्रणाही दिवसभर काम करत आहे. रात्रीच्यावेळीही वीज कर्मचारी काम करतात. त्यामुळे थोड्या ठिकाणी तरी वीज पुरवठा सुरळीत झाला पण काही भागांमध्ये काँक्रीटचे वीज खांब मोडून पडले. वीज तारा तुटल्या. ट्रान्सफोर्मर मोडले. वीज उपकेंद्रे बिघडली. तिथे साधनसुविधा उभ्या करण्यासाठी एक- दोन दिवस लागतीलच, असे खात्याच्या सुत्रांनी सांगितले. ताळगावमध्येही वीज पुरवठा चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ खंडीत आहे. दोनापावलच्या काही भागातली अशीच स्थिती होती. वीज नाही, म्हणून पाणी नाही अशी समस्या ताळगावमधील काही लोकांनी अनुभवली.

रस्त्यावरील अडथळे हटविण्याचे काम अग्नीशामक दलाचे जवान करत आहेत. एका पणजी व परिसरातून ८० फोन कॉल्स अग्ग्नीशामक दलाला आले. नगरसेवक, पंच, सरपंच यांनी मिळूनही काही मोडलेली झाडे कापणे किंवा ती रस्त्यावरून हटवून घेणे, असे काम केले.

कृषी क्षेत्राच्या हानीची पाहणी (चौकट)शेतकरी व बागायतदारांची वादळाने खूप हानी केली. गोव्याने असे वादळ कधीच अनुभवले नव्हते, असे लोकांनी सांगितले. कृषी अधिकाऱ्यांनी फिल्डवर जावे व प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या पिकाची हानी पहावी व पाहणी अहवाल तयार करून तो तीन दिवसांत सादर करावा, असा आदेश उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे. 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळgoaगोवाAmit Shahअमित शहा