शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

coronavirus : समुद्रात अडकलेल्या खलाशांना मायदेशात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2020 19:45 IST

सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 200 जहाजावर 21 हजारापेक्षा अधिक खलाशी अडकून असून त्यात सुमारे 8 हजारांच्या आसपास गोवेकर आहेत.

मडगाव: जगभरात अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिका सात आठवडे पुढे ढकलल्या असतानाही समुद्रात अडकलेल्या खलाशाना  मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारला आदेश द्यावे अशा  आशयाची आणखी एक याचिका दाखल केली आहे.गोव्यातील व्यावसाईक आणि सामाजिक कार्यकर्ते केनेथ सिल्व्हेरा यांनी ही याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या संबंधी ' लोकमत' शी बोलताना सिल्व्हेरा म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले आहेत ते जमिनीवर असलेल्या नागरिकांसाठी आहेत. आपण जी याचिका पाठविली आहे ती समुद्रात अडकलेल्यासाठी आहे असे ते म्हणाले.सध्या संपूर्ण जगात वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 200 जहाजावर 21 हजारापेक्षा अधिक खलाशी अडकून असून त्यात सुमारे 8 हजारांच्या आसपास गोवेकर आहेत. या खलाशाना परत आणण्यास  सरकार त्वरित पाऊले उचलत नसल्याने गोव्यात या खलाशांच्या नातेवाईकामध्ये प्रचंड  नाराजीचे वातावरण आहे. लोकांचा बांध तुटल्यास ते रस्त्यावरही येऊ शकतील अशी परिस्थिती आहे.सिल्व्हेरा यांनी आपल्या याचिकेत समुद्रात अडकलेले खलाशी प्रचंड मानसिक तणावाखाली असून त्यांच्या कुटुंबियानाही घोर लागून राहिली आहे याकडे लक्ष वेधले आहे.कित्येकांना जहाजावरच मरण आले असून त्यांचे मृतदेहही तिथेच आहेत, कित्येकांना कोरोनाची लागणही झाली आहे. या परिस्थितीत ज्यांची प्रकृती चांगली आहे त्यांना त्वरित बाहेर काढणे गरजेचे असून त्यासाठी केंद्र सरकारला प्रत्येक देशातील भारतीय दूतावसाच्या साहाय्याने ह्या खलाशाना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयIndiaभारत