शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
2
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
3
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
4
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
5
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
6
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
7
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
8
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
9
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
10
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
11
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
12
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
13
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले
14
IPL 2024 Playoff qualification scenario : १६ सामने, ४ जागा अन् ९ संघ शर्यतीत; वाचा मुंबई इंडियन्सचं गणित कसं जुळेल
15
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
16
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
17
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
18
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
19
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
20
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप

CoronaVirus News: भाजपा सरकारकडून 'त्या' १८ जणांची हत्या केली; काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 8:11 PM

कृती आराखडा जाहीर करा, अन्यथा आत्मक्लेश आंदोलन; काँग्रेसचा इशारा

मडगाव - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केलेला लॉकडाऊन अविचारी व कोणताही ठोस शास्त्रीय आधार नसलेला आहे व तो निर्णय डिफेक्टिव्ह भाजप सरकारचे प्रतिबिंब आहे. गोव्यातील असंवेदनशील व भ्रष्ट भाजप सरकारने निष्पाप १८ कोविड रुग्णांची  एकाप्रकारे हत्याच केली आहे. आज सरकारच्या बेपर्वाईमुळे जनता भयभीत झाली आहे असा आरोप काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी ताबडतोब कोविड हाताळणीचा कृती आराखडा तसेच श्वेतपत्रिका जारी करावी. सरकारने त्वरित याची दखल न घेतल्यास काँग्रेस पक्ष आत्मक्लेशाचे आंदोलन करेल.

सरकारने कृती आराखडा व श्वेतपत्रातुन सर्व माहिती जनतेसमोर ठेवल्यानंतर त्याचा अभ्यास करुन आम्ही सरकारला योग्य सल्ला देऊ शकतो.

काँग्रेसने पहिल्या दिवसापासून सरकारला कोविडचा सामना करण्यासाठी योग्य सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे विधिमंडळ गट नेते तसेच चार आमदार यांनी अनेक विधायक सूचना सरकारला केल्या. सामाजिक क्षेत्रातील तज्ञ व लष्करांचे काही सदस्य यांचा टास्क फोर्स करणे, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी सर्व भुसारी दुकाने लॉकडाऊन काळात उघडी ठेवणे, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ पुर्णपणे कार्यांवित करुन तेथे कोविड सेंटर स्थापन करणे यासह लॉकडाऊनमुळे हलाखीच्या परिस्थितीत असलेले छोटे व्यावसायिकांना १०० कोटींची आर्थिक पॅकेज देणे अशा अनेक सूचना आम्ही सरकारला केल्या. 

मुख्यमंत्र्यानी हट्टाला पेटून केलेल्या सामाजिक सर्वेक्षणाला काँग्रेसने आक्षेप घेतला होता व त्याऐवजी सामाजिक चाचणी करण्याची मागणी केली होती. मांगोरचे कोविड रुग्ण वाढू लागल्यानंतर वास्को शहर लॉकडाऊन करण्याच्या आमची मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. काँग्रेसचे आमचे दिवंगत नेते जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनानंतर लगेच गोमेकोतील चाचणी व्यवस्था व आकडेवारी यांवर प्रश्न विचारले होते. परंतु, सरकारने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले व त्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 

लोक संकटात असताना गोव्यातील भाजप सरकार मोदींची वर्षपूर्ती व आभासी सभा घेण्यात व्यस्त होते. त्यामुळे कोविडचा संसर्ग आज संपूर्ण गोव्यात झाला आहे. सरकारने वेळ न घालवता सर्वांना विश्वासात घेऊन तसेच वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वजण यांची बैठक घ्यावी व त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावरुन पुढची कृती ठरवावी. मागील ३ महिने काँग्रेस पक्ष मागणी करीत असलेला कृती आराखडा व श्वेतपत्रिका सरकारने ताबडतोब काढावी.