शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

गोवा सरकारचा 'स्वयंपूर्ण' सर्व्हेक्षण अहवाल हा कॉपी पेस्ट! काँग्रेसची टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 21:16 IST

खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे.

पणजी - मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेली सात सूत्री योजना काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. गोवा व्हिजन डॉक्युमेंट २0३५ ची नक्कल करुन 'स्वयंपूर्ण' सर्वे रिपोर्ट बनविण्यात आला, अशी टीका प्रदेश कॉंग्रेसने केली आहे.प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणतात की, ''खोटारडेपणाच्या बाबतीत हे सरकार पुन: एकदा उघडे पडले आहे. उच्च शिक्षण संचालनालय आणि जिपार्डने तयार केलेला मोदींच्या आत्मनिर्भर भारताचा तथाकथित स्वयंपूर्ण सर्वे रिपोर्ट म्हणजे व्हिजन २0१५ ची हुबेहूब नक्कल आहे. या अहवालातील सर्व सातही प्रमुख मुद्दे हे राज्यात कॉंग्रेसचे सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गठीत केलेल्या नामवंत शास्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील गोल्डन ज्युबिली मंडळाने सूचविले होते. कामत यांनी विविध क्षेत्रातील १७ तज्ञांच्या समितीकडून तयार करुन घेतलेल्या अहवालाचे श्रेय सावंत सरकार आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला आहे. सावंत यांनी या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागावी. व्हिजन-२०३५ अहवालात सुरम्य गोवा, सुसंस्कृत गोवा, संतुलित गोवा, सुविद्य गोवा, समृद्ध गोवा, सुशासित गोवा व स्वानंदी गोवा या प्रमुख मुद्यांवर भर देऊन सन २०३५ पर्यंत गोवा आतंराष्ट्रीय स्तरावर आदर्श राज्य म्हणून नावारुपास आणण्याचा संकल्प ठेवण्यात आला होता. याच मुद्यांचा सावंत यांनी शनिवारी उल्लेख करुन गोमंतकीयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.ते म्हणतात की, ह्यदेर आयी दुरूस्त आयी' या म्हणी प्रमाणे, कॉंग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे स्वागत करतो व खरोखरच कॉंग्रेस सरकारने दूरदृष्टी ठेवून तयार केलेला हा अहवाल लवकरात लवकर हे सरकार अंमलात आणणार, अशी आशा बाळगतो, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.पर्रीकरांनी आकसापोटी अहवाल शीतपेटीत ठेवला : आरोपमाजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांनी केवळ व्यक्तिगत आकसापोटी विजय भाटकर, डॉ. अनिल काकोडकर, प्रा. माधव गाडगीळ, अशांक देसाई, डॉ. विजय केळकर, डॉ. पी.एस. रामाणी, स्व. आर्किटेक्ट चार्लस कुरैया अशा १७ मान्यवरांच्या समितीने तयार केलेला अत्यंत महत्वाचा हा अहवाल तब्बल सहा वर्षे कपाटात बंद करुन ठेवल्याचा आरोपही चोडणकर यांनी केला.श्रेय काँग्रेसचे : दिगंबर कामतविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनीही सरकारवर टीकेचे झोड उठविताना असे म्हटले आहे की, ह्यमुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यदिनी सातपदरी योजनेची जी घोषणा केली ती काँग्रेस सरकार सत्तेवर असताना स्थापन केलेल्या गोल्डन ज्युबिली मंडळाने सुचविली होती. २0१0 साली ज्येष्ठ शास्रज्ञ रधुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्त्वाखालील या मंडळाने गोवा-२0३५ व्हिजन डॉक्युमेंटमध्ये सुरम्य, सुसंस्कृत, संतुलित, सुविद्य, समृध्द, सुशासित आणि स्वानंदी गोवा संकल्पना मांडली होती. तत्कालीन काँग्रेस सरकारच्या प्रयत्नाने हे घडले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी हीच संकल्पना उचलली आहे. 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसBJPभाजपा