शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

बांधकाम भरती घोटाळा; लोकायुक्तांकडे तक्रार करू: माणिकम टागोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 11:24 IST

सरकारच्या कारभारावर साधला निशाणा.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : बांधकाम खात्यातील भरती घोटाळा प्रकरणी काँग्रेस लोकायुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे पक्षाचे गोवा प्रभारी माणिकम टागोर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत हा मुद्दा उपस्थित करून प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी टागोर यांना काँग्रेसच्या एकाही आमदाराने या भरती घोटाळा प्रकरणात आवाज उठवलेला नाही, याकडे लक्ष वेधले असता टागोर यांनी वरील विधान केले.

बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व टेक्निकल असिस्टंट पदांवरील भरतीत घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले, असे असतानाही काँग्रेसचा एकही आमदार काहीच बोलत नाही हे पत्रकारांनी टागोर यांच्या निदर्शनास आणले. त्यावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या प्रकरणी काँग्रेसने दक्षता खात्याकडे तक्रार केलेली आहे. परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही, असे सांगितले.

पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, सावंत सरकारच्या गेल्या कार्यकाळात मंत्र्याने या पदांच्या भरतीत घोटाळा केला होता. ३६० पदे गृहीत धरली तरी सरकारने ३६,००० उमेदवारांवर अन्याय केला आहे. दक्षता खाते तक्रारीला दाद देत नाही. त्यामुळे आम्हाला आता लोकायुक्तांकडे जाण्याशिवाय पर्याय नाही. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, माध्यम विभागप्रमुख अमरनाथ पणजीकर हेही उपस्थित होते.

६०० कोटी आले अन् गेले

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले की, नीलेश काब्राल यांचे मंत्रिपदाच्या राजीनाम्याचे पत्र बारकाईने वाचल्यास काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी भाजपने फुटिरांना मंत्रिपदाच्या ऑफर दिल्या होत्या हे सिद्ध होते. तसेच दोन वर्षापूर्वी केंद्राकडून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धासाठी ६०० कोटी रुपये आले होते. परंतु पायाभूत सुविधा निर्माण केल्या नाहीत. अखेरच्या क्षणी हंगामी शेड उभारल्या. गोव्याच्या खेळाडूंवर अन्याय केला.

पाच महिने कोण पेपर तपासत होते?

पक्षाचे नेते एल्विस गोम्स म्हणाले की, कर्मचारी निवड आयोग अजून कार्यान्वित होऊ शकलेला नाही. बांधकाम खात्यातील पदांसाठी घेतलेल्या परीक्षेचा निकाल ४८ तासांत जाहीर व्हायला हवा. पाच महिने का लागले? कोण पेपर तपासत होता, असा प्रश्न उपस्थित करत निकालास लावलेल्या विलंबामुळे संशय निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस