लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : संविधान म्हणजे नक्की काय आहे, त्याबाबत नव्या पिढीमध्ये जागृती होणे गरजेचे आहे. संविधान म्हणजे केवळ हक्क नसून ती एक जबाबदारी आहे. 'संविधान बचाव' अशी मोहीम कांग्रेस राबवत असली तरी प्रत्यक्षात त्यांनी संविधाची हत्या केली आहे. संविधानाचा खरा आदर हा भाजप सरकारने केला असल्याचे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.
भाजपतर्फे पणजीत आयोजित 'संविधान दिन' कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, भाजपचे राष्ट्रीय नेते के. अन्नमलाई, तरुण चुग, मंत्री, आमदार, नेते व पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत म्हणाले, की संविधानाचे पुस्तक हाती घेऊन संविधान बचाव अशी मोहीम कांग्रेसले राबवली. केवळ मोहीम राबवली म्हणून काही होत नाही. संविधानाचा खरा आदर हा भाजप सरकारने केला.
कलम ३७० रद्द करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अखंड भारताचे स्वप्न साकार केले. वंचितांना न्याय देण्याचे काम खरे तर संविधानात नमूद आहे. त्याला जर कोणी विलंब केला असेल तर ते काँग्रेसने केला. संविधानाचे पुस्तक घेऊन फिरुन काहीच होत नाही. भाजपने संविधानचा आदर केला आहे. संविधान ही एक जबाबदारी आहे. म्हणजेच सरकारने काय करावे व लोकांनी काय कराते हे देखील समजून घ्यावे, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
Web Summary : Chief Minister Pramod Sawant stated that the constitution is a responsibility, not just rights. He criticized Congress' 'Save the Constitution' campaign, asserting BJP truly respects it. He highlighted the abrogation of Article 370 under Prime Minister Modi and emphasized BJP's commitment to the constitution.
Web Summary : मुख्यमंत्री प्रमोद सावंत ने कहा कि संविधान केवल अधिकार नहीं, जिम्मेदारी भी है। उन्होंने कांग्रेस के 'संविधान बचाओ' अभियान की आलोचना करते हुए कहा कि भाजपा वास्तव में इसका सम्मान करती है। उन्होंने प्रधानमंत्री मोदी के तहत अनुच्छेद 370 को निरस्त करने पर प्रकाश डाला और संविधान के प्रति भाजपा की प्रतिबद्धता पर जोर दिया।