शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

सरकार बरखास्त करण्यास काँग्रेसने न्यायालयात जावे, भाजपाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:51 IST

राज्यातील भाजप सरकार जर बरखास्त करायची काँग्रेसची इच्छा असेल व तशी धमक जर असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असे आव्हान भाजप देत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

पणजी - राज्यातील भाजप सरकार जर बरखास्त करायची काँग्रेसची इच्छा असेल व तशी धमक जर असेल तर काँग्रेसने न्यायालयात जावे असे आव्हान भाजप देत असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

मंत्री माविन गुदिन्हो व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत बोलताना तेंडुलकर म्हणाले, की काँग्रेस पक्षाचे आमदार संघटीत नाहीत. काँग्रेसच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे दोघे आमदार अगोदरच राजीनामे देऊन भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. काही तथाकथित बुद्धीवाद्यांनी व काँग्रेसने मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांच्या खासगी निवासस्थानी मंगळवारी जो मोर्चा काढला, त्या मोर्चाला नऊ आमदार गेले होते. अन्य पाच आमदार का गेले नाहीत याचा शोध काँग्रेसने घ्यावा. त्या मोर्चाला लोकांपेक्षाही जास्त पोलिसच होते. जर मोर्चा काढायचाच होता तर निदान काँग्रेसच्या प्रत्येक आमदाराने किमान पंचवीस तरी लोक आणायला हवे होते. फक्त 60-70 व्यक्तींना घेऊन मोर्चा काढला गेला. दिगंबर कामत यांच्यासारखा ज्येष्ठ नेताही ह्या मोर्चात सहभागी होत असल्याने कामत यांची आम्हाला किव येते.

तेंडुलकर म्हणाले, की मुख्यमंत्री र्पीकर यांनी आजाराचे सोंग घेतलेले नाही. ते खरोखर आजारी आहेत व अशावेळी त्यांच्या राजीनाम्यासाठी त्यांच्या निवासस्थानी मोर्चा नेणो हे गैर आहे. आम्ही काँग्रेसच्या मोर्चाचा निषेध करतो. तथाकथित बुद्धीवादीही मोर्चात सहभागी झाले होते. यापूर्वी देशातील विविध राज्यांमध्ये स्व. जयललिता, बिजू पटनाईक आदी अनेकजण मुख्यमंत्रीपदी असताना आजारी पडले होते पण त्यांच्या निवासस्थानी कुणी मोर्चा नेला नव्हता. पंडित जवाहरवाल नेहरूही पंतप्रधानपदी  असताना त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता व ते तीन वर्षे आजारी होते पण त्यावेळच्या विरोधी पक्षांनी त्यांच्या घरी मोर्चा नेला नव्हता किंवा त्यांचा राजीनामा मागितला नव्हता. काँग्रेस पक्ष प्रसिद्धीसाठी मोर्चाचे नाटक करत आहे.

उपोषणाचा परिणाम नाही 

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी राजन घाटे यांनी आझाद मैदानावर उपोषण चालविले आहे. ते मुळात काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. ते आरटीआय कार्यकर्ते नव्हे. त्यांना काँग्रेस पक्षाचीच फुस आहे. त्यांनी शक्य आहे, तोर्पयत उपोषण सुरूच ठेवावे. भाजपवर किंवा सरकारवर त्यांच्या उपोषणाचा काहीही परिणाम होणार नाही. तसेच काँग्रेस नेत्यांनीही घाटे यांच्यासोबत बसणोही सुरूच ठेवावे, असा उपहासात्मक सस्ला तेंडुलकर यांनी दिला. दरम्यान, 2019 साली मोदी सरकार प्रचंड बहुमताने पुन्हा अधिकारावर येईल व त्यावेळी कदाचित गोव्यातील सगळे काँग्रेस आमदार भाजपमध्ये येऊ पाहतील, असे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण