शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीला फेडलेल्या २0८ कोटी रुपयांची चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 18:36 IST

जीवरक्षकांनी संपावर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पर्यटन खात्याच्या कंत्राटात गौडबंगाल असल्याचा आमच्या आरोपाला परत एकदा बळकटी मिळाली आहे.

पणजी :  किनाऱ्यांवरील जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे आणि दृष्टी लाइफ सेव्हिंग कंपनीला किनारे सुरक्षा व्यवस्थेसाठी फेडलेले १४१ कोटी आणि किनाऱ्यांवरील साफसफाईच्या कंत्राटावर खर्च केलेले ६७ कोटी  मिळून एकूण २0८ कोटी रुपयांची चौकशी करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने केली आहे. 

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, ‘जीवरक्षकांनी संपावर जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने पर्यटन खात्याच्या कंत्राटात गौडबंगाल असल्याचा आमच्या आरोपाला परत एकदा बळकटी मिळाली आहे. व्यवस्थित व वेळेवर पगार मिळत नसल्यानेच जीवरक्षकांनी संपाचा इशारा दिला आहे. ताबडतोब सर्व जीवरक्षकांना सरकारी सेवेत सामावून घ्यावे व माजी लष्करी किंवा माजी नौदल अधिकाºयांच्या मार्गदर्शनाखाली किनारे सुरक्षा सेवा पुरवावी.

जीवरक्षकांनी त्यांना पिण्याचे पाणीसुद्धा कंत्राटदाराकडून  मिळत नव्हते असा गौप्यस्पोट केल्याने, सरकारने मागील पाच वर्षात किनारे सुरक्षा सेवेवर खर्च केलेले रु १४१ कोटी कुठे गेले याची चौकशी करणे गरजेचे आहे. किनारे सुरक्षा व जीवरक्षकाना वॉकी-टॉकी तसेच इतर उपकरणे कंत्राटदार देत नव्हता हे जीवरक्षकानी उघड केले आहे. कंत्राटदाराने किनाऱ्यांवर तैनात केलेल्या जीपगाड्यांचीही दुरुस्ती आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे देखील गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

कंत्राटात १४१ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप असूनही मुख्यमंत्री प्रमोद सावंत गप्प आहेत. त्यावरुन सरकार पर्यटन मंत्री व सदर कंत्राटात सहभाग असलेल्या एका भाजप पदाधिकारी यांची पाठराखण करत असल्याचे सिद्ध होते. 

पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यानी १७ आॅगस्ट रोजी गोवा विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरात मेसर्स दृष्टी लाईफ सेव्हिंगचे  कंत्राट गेल्या ३0 जून रोजी संपले असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता ही सेवा कोण पुरवीत आहे हे मुख्यमंत्र्यानी  स्पष्ट करणे गरजेचे असल्याचेही चोडणकर यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, वेतन तसेच इतर भत्ते देण्यास होणारा विलंब आपल्या नियंत्रणाबाहेर असल्याचे दृष्टी कंपनीने म्हटले असून त्याबद्दल खेदही व्यक्त केला आहे. जुलैपासूनच्या पगारवाढीची प्रक्रिया चालू आहे. जे जीवरक्षक, कप्तान किंवा पर्यवेक्षक संपात सहभागी होणार नाहीत त्यांनाच ही वाढ दिली जाईल. शुक्रवारी जे कामावर हजर होते त्यांना थकबाकी सोमवारी दिली जाईल. दिवाळीला बोनस जाहीर करुन नोव्हेंबरमध्ये दिला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. काही जीवरक्षक गेले दोन दिवस कामावर आलेले नाहीत त्यांनी सेवेत रुजू व्हावे, असे आवाहन कंपनीने केलेआहे. किनाºयांवर जीवरक्षकांचे काम चालूच असून गुरुवारी वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचे तर काल शुक्रवारी ४ जणांचे प्राण वाचविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतgoaगोवा