शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

गोव्यात फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची काँग्रेसची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 20:15 IST

फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे.

पणजी : फॉर्मेलिन प्रश्नी सीबीआय किंवा न्यायालयीन चौकशीची मागणी काँग्रेसने केली आहे. फॉर्मेलिनयुक्त मासळी बाजारात आणून लाखो लोकांच्या जीवाशी हे सरकार खेळत आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार असून किमान दोन केबिनेट मंत्री तसेच वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत, असा आरोप प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यानी केला असून चौकशी होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. 

चोडणकर म्हणतात की, एफडीएच्या मडगांव येथील महिला अधिका-याने दिलेला अहवाल खात्याच्या संचालक तसेच आरोग्यमंत्र्यांनी बाजुला ठेवून उलट या अधिका-यालाच लक्ष्य बनविले. या प्रामाणिक अधिका-याचा मानसिक छळ करण्यात आला. या प्रकरणात खरे तर अन्न व औषध खातेच मुख्य आरोपी ठरते आणि आरोग्यमंत्री संशयाच्या घे-यात येतात. त्यामुळे सत्य बाहेर येण्यासाठी या एकूण प्रकरणाची चौकशी करावी. 

चोडणकर म्हणतात की, तामिळनाडू, केरळ, गुजरात येथून आयात होणारी मासळी गोवेकरांच्या ताटात पडेपर्यंत १0 ते १५ दिवस लागतात. रसायनाशिवाय एवढे दिवस ही मासळी टीकून राहणे कठीण आहे. त्यामुळे फॉर्मेलिनसारख्या घातक रसायनांचा वापर होतो, हे निश्चित असे चोडणकर यांचे मत आहे. 

एफएसएसएआयचे अधिकारी भास्कर यांनी फॉर्मेलिनच्या बाबतीत मर्यादेबाबत केला जाणारा दावा खोडून काढल्याने मंत्र्यांनी त्यावरही आपले मत व्यक्त करावे, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे. मंत्री विश्वजित राणे यांनी मडगांवच्या एसजीपीडीए मार्केटमध्ये गाजावाजा करुन मासळीची तपासणी करुन घेतली. परंतु सासष्टीतील एकाही लोकप्रतिनिधीला बोलावले नाही. लोकांच्या डोळ्यांना पाणी लावण्यासाठी अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. परंतु सरकारला याबाबत उघडे पाडण्याच्याबाबतीत काँग्रेसला कोणीही रोखू शकणार नाही, असे चोडणकर म्हणतात. एफडीएचा पर्दाफाश करणाºयांवर गुन्हे नोंदविण्याच्या धमक्या मंत्री देतात. परंतु गोमंतकीयांना फॉर्मेलिनयुक्त मासळी पुरविणा-या माफियांविरुध्द मात्र एकही गुन्हा नोंद केला जात नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. 

फॉर्मेलिनयुक्त मासळीची भीती अजूनही गोमंतकीयांच्या मनात आहे. त्यामुळे जोपर्यंत सुरक्षा उपाययोजना होत नाहीत. तोपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी घालावी, या मागणीचा चोडणकर यांनी पुनरुच्चार केला आहे. अन्य राज्यांमधून गोव्यात आयात केली जाणारी मासळी टिकून रहावी यासाठी या मासळीला फॉर्मेलिन लावले जात असल्याचे गेल्या जुर्ल रोजी उघड झाले होते. फॉर्मेलिन हे रसायन मानवी पार्थिव टिकून रहावे यासाठी मृतदेहावर लावले जाते. फॉर्मेलिनयुक्त मासळीचे सेवन केल्यास ते आरोग्याला धोकादायक ठरु शकते.  

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस