शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

'स्मार्ट सिटी'च्या भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी; काँग्रेसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 10:27 IST

चौकशी करण्याचे धाडस दाखवावे; केंद्रीय मंत्र्यांना आव्हान.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : 'स्मार्ट सिटी' कामांतील भ्रष्टाचाराची व्याप्ती मोठी आहे. या कामांमध्ये भ्रष्टाचार नसेल तर या सर्व कामांची केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशी करण्याचे धाडस दाखवावे, असे खुले आव्हान काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिले.

पुरी हे नुकतेच पणजीच्या दौऱ्यावर येऊन गेले. त्यानंतर पणजीतील 'स्मार्ट सिटी' प्रकल्पांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार नसल्याची टिप्पणी मंत्री पुरी यांनी केली होती. त्याला गोम्स यांनी प्रत्युत्तर दिले. भ्रष्टाचार सिद्ध करण्यासाठी भाजप सरकारने आपली हिंमत दाखवावी, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

गोम्स म्हणाले की, स्मार्ट सिटी प्रकल्पांव्दारे भाजपने भ्रष्टाचार सुरूच ठेवला आहे. मंत्री पुरी जेव्हा गोव्यात आले, तेव्हा त्यांनी स्मार्ट सिटी कामांचा बैठकीव्दारे आढावा घेतला. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी पणजीचा दौरा करून पणजीवासीयांच्या समस्या जाणून घेणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांनी सरकारचे मुखपत्र असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोव्दारे काँग्रेसने स्मार्ट सिटी कामांबाबत केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचे खंडन केले. स्मार्ट सिटी कामांचे सत्य त्यांनी जाणून घेणे गरजेचे होते, अशी टीका त्यांनी केली.

स्मार्ट सिटी कामांतील भ्रष्टाचार हा केवळ न्यायालयीन तपासच उघड करू शकतो. या कामांत भ्रष्टाचार झाला नसेल तर मग चौकशीचे आदेश देण्यास का टाळाटाळ केली जात आहे? भाजप सरकारने हिंमत असेल तर त्यांनी केंद्रीय दक्षता आयोगामार्फत भ्रष्टाचाराची चौकशी करावी. पणजीचे भाजप आमदार तथा मंत्री बाबुश मोन्सेरात यांनी पणजी 'स्मार्ट सिटी'ची कामे दर्जाहीन असल्याचे मान्यही केले आहे. तरीही सरकार गप्प का, असा प्रश्न गोम्स यांनी उपस्थित केला.

यावेळी प्रदेश काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, सरचिटणीस विजय भिके व पणजी महिला गटाध्यक्षा लविनिया डिकॉस्ता हजर होते.

सर्वांची चौकशी करा

स्मार्ट सिटी कामांतील भ्रष्टाचारप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह नगरविकास मंत्री, नगरविकास सचिव, मुख्य सचिव, महापालिकेचे आयुक्त, स्मार्ट सिटीचे अधिकारी हे सर्व दोषी आहेत. त्यामुळे या सर्वांची चौकशी व्हावी. मात्र, त्यांची चौकशी करण्याचे धाडस भाजप करणार नसल्याची टीका काँग्रेसने केली.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसSmart Cityस्मार्ट सिटी