शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

पाकच्या तुलनेत भारत अल्पसंख्याकांसाठी अधिक सुरक्षित, भारतीय असल्याचा आनंद अन् अभिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2024 11:22 IST

लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला.

धीरज हरमलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव: गोवा मुक्तीपूर्वी पाकिस्तानात गेलेल्या, गोव्यात जन्मलेल्या जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते 'भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले. अल्पसंख्याक समुदायांना राहण्यासाठी भारत हे पाकिस्तानच्या तुलनेत सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे, असे परेरा म्हणाले.

गोव्याच्या स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण आणि नोकरीसाठी पाकिस्तानात गेलेले नीज गोंयकार जोसेफ फ्रान्सिस परेरा हे आता गोव्यात परतले असून गेल्या ११ वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर बुधवारी परेरा यांना आता कुठे भारतीय नागरिकत्व मिळाले. लोकमत प्रतिनिधीने परेरा यांच्या कासावली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली असता, त्यांच्या आयुष्याचा प्रवास आणि आठवणी उलगडताना त्यांना आनंद झाला.

परेरा म्हणाले, त्यांचा जन्म गोव्यात झाला असून सुरुवातीचे शालेय शिक्षण कासावलीच्या तेव्हाच्या पोर्तुगीज शाळेतून गोव्यात पोर्तुगीज राजवटीत झाले. १९५९ मध्ये त्यांचे मामा आपल्या बहिणीला भेटायला गोव्यात आले. त्यानंतर त्यांनी जोसेफची चौकशी केली आणि त्याला उच्च शिक्षणासाठी कराची, पाकिस्तानला नेण्यात रस दाखवला.

१९६० मध्ये जोसेफ गोवा सोडून कराची पाकिस्तानला गेले आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मॅट्रिक पूर्ण केले. त्यांचे मामा कराचीत अॅफेक्स फर्नाडिस हे संगीत शिक्षक होते आणि उच्च पदाधिकाऱ्यांच्या मुलांना सेलो, व्हायोलिन आणि पियानो वाजवायला शिकवत असत. मामांच्या चांगल्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीमुळे जोसेफला पाकिस्तानात उच्च शिक्षण मिळण्याचे भाग्य लाभले.

५० आणि ६० च्या दशकात अयुब खान पाकिस्तानवर राज्य करत होते आणि पोर्तुगालचा सालाझार यांच्याशी त्यांचे संबंध मैत्रिपूर्ण होते. त्यामुळे गोमंतकीयांना पाकिस्तानात शिकण्याची आणि काम करण्याची मुभा होती, अशी माहिती परेरा यांनी दिली. त्यानंतर १९६४ मध्ये परेरा हे आपल्या कुटुंबाला पाहण्यासाठी मुंबई तीर्थक्षेत्र प्रदर्शनासाठी वाफेच्या बोटीतून गोव्यात परत आले आणि काही दिवसांनी कराचीला परत गेले.

रेफ्रिजरेशन कोर्स पूर्ण केल्यानंतर १९७५ मध्ये त्यांनी बहरीनमध्ये "वर्क सुपरवायझर" म्हणून नोकरी स्वीकारली. १९७८ मध्ये त्यांनी गोव्यात येऊन लग्न केले. २०१३ मध्ये ते नोकरीतून निवृत्त झाले आणि परत गोव्यात त्यांच्या मूळ गावी कासावली येथे आले.

१९८० नंतर अल्पसंख्याकांना केले जातेय टार्गेट

पाकिस्तानच्या तुलनेत भारतामधील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीबद्दल त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल विचारले असता, परेरा यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याकांचा छळ केला जातो. पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना छोटी कामे आणि अतिशय कमी सुविधा दिल्या जातात.

मातृभूमीची ओढ 

नंतर त्यांना पोर्तुगीज नागरिकत्व सहज मिळू शकत असताना भारतीय नागरिकत्व का निवडले, असे विचारले असता, या प्रश्नाचे उत्तर देताना जोसेफ भावुक झाले. ते म्हणाले, परदेशात मला सर्व काही मिळत होते, पण माझी मातृभूमी भारत आणि माझे राज्य गोवा यांची मला आठवण यायची. माझी मातृभूमी, माझे कुटुंब, संस्कृती याविषयी मला तीव्र ओढ आहे म्हणून मला भारतीय नागरिकत्व हवे होते.

...म्हणून भारतच सुरक्षित 

ते म्हणाले, अल्पसंख्याकांसाठी राहण्यासाठी, काम करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि मुक्तपणे जगण्यासाठी भारत हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. इथे प्रत्येकाला त्यांच्या धार्मिक आणि जातीय विविधतेचा विचार न करता अधिकार, सुविधा आणि समान संधी दिल्या जातात. मला भारतीय नागरिक, म्हणवून घेण्यात अभिमान आणि आनंद वाटतो, असे परेरा म्हणाले.

...आणि विनंती अर्ज मंजूर झाला? 

भारतीय नागरिकत्व मिळवण्याच्या त्यांच्या ११ वर्षांच्या दीर्घ प्रवासाबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, "बऱ्याच संघर्षानंतर मी यावर्षी जूनमध्ये नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि १० दिवसांच्या आत मला मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. चार सदस्यांच्या समितीने माझ्या सर्व कागदपत्रांची छाननी केली. जन्म प्रमाणपत्र, पालकांचे प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र इत्यादी तपासण्यात आले. जुलै अखेरीस मला कळविण्यात आले की, माझी भारतीय नागरिकत्व मिळविण्याची विनंती मंजूर झाली आहे. माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण होता" असे परेरा यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतIndiaभारतPakistanपाकिस्तानIndiaभारत