शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

राज्यात गुलाबी थंडी गायब, उष्णतेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2024 16:17 IST

ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे.

पणजी (नारायण गावस): गेल्या आठवड्यात पडलेल्या तुरळक पावसामुळे राज्यात थंडीचा गारवा गायब झाला असून कडाक्याचे ऊन पडत आहे. काही शहरांतील तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसपच्या वर पाेहचला आहे. ऐरव्ही जी जानेवारीत महिन्यात गुलाबी थंडी लागत होती ती थंडी आता कुठेतरी गायब झाली. त्यामुळे वातावरणात सध्या माेठे बदल पहायला मिळत आहे.

गुलाबी थंडी गायब

राज्यात ऑक्टाेबर नंतर पाऊस ओसरल्यावर थंडीचा हंगाम सुरु हाेत असतो. नोव्हेंबर असाच उष्णतेत गेला पण डिसेंबर महिन्यात काही दिवस थंडीचा आस्वाद लोकांना घ्यायला मिळाला. पण आता जानेवारी सुरु हाेताच पुन्हा उष्णतेचा पारा वाढला आहे. त्यामुळे पूर्वी लाेकांना जो थंडीचा आस्वाद मिळत होता तो आता नाहीसा झाला आहे. राजधानी पणजीत उष्णतेचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या वर जात आहे. तसेच इतर शहरांचा पाराही वाढत आहे. रात्रीच्यावेळीही जास्त थंडी नसते. वातावरणात दमट तसेच धव पडत असल्याने थंडी लागत नाही.

शेकोट्याही झाल्या गायब

शेकोट्याचा राहिल्या फक़्त आठवणी. ऐरव्ही नाेव्हेंबर ते जानेवारी या तीन महिन्यात अनेक ठिकाणी शेकोटीला बसलेले लोक आम्हाला दिसत होते. काही वर्षांपूर्व तर डिसेंबर जानेवारीपर्यंत सकाळी रात्री जॅकेट घातल्याशिवाय बाहेर सरता येत नव्हते तसेच रात्रीच्या वेळी गोधडी कांबळ घेऊन झाेपावे लागत होते. पण आता ही थंडी मिळत नाही. पूर्वी घरा बाहेर लाेक शेकोट्या पेटवत होते त्या शेकोट्याही आता बंद पडल्या.

ग्रामिण भागातही उष्णतेचा फटका

पर्यावरण बदल पहायला मिळत आहे. शहरी भागात वाढते कॉँक्रेटीकरणामुळे उष्णता वाढली आहे. पण आता राज्यातील ग्रामिण भागातील थंडीही गायब झाली आहे. पूर्वी काणकोण, सत्तरी सारख्या डोंगराळ परिसरातील तालुक्यामध्ये कडाक्याची थंडी लागत होती. आता या ग्रामिण भागातील थंडी गेली आहे. वातावरणात झपाट्याने बदल होताना दिसत आहे.

काजू आंब्यावर परिणाम

आता पुढील दोन महिन्यानंतर राज्यात काजू आंब्याचा हंगाम सुरु होणार आहे. पण मुबलक अशी थंडी काजू आंब्याच्या पिकाला मिळाली नाही तर या पिकावर त्याचा परिणाम जाणवू शकतो. सध्या दिवसभर उष्णता तसेच रात्री व सकाळी दव पडत असल्याने काजू आंब्याच्या पिकावर परिणाम हाेऊ शकतो. तसेच मधोमध पावसाच्या सरी पडत असल्याने काजूच झाडांना आलेला बहर कुजणार. त्यामुळे याचा शेती बागायतींप्रमाणे आरोग्यवर परिणाम जाणवणार.

टॅग्स :goaगोवाweatherहवामान