शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

जनतेची राजकीय करमणूक; सावंत-राणे एकीसाठी दिल्लीतून प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2024 09:03 IST

सावंत आणि राणे यांच्यात मनोमीलन व्हावे, म्हणून ती बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली होती.

गोवा राज्य राजकीय सर्कस आणि जीवघेण्या राजकीय कसरतींसाठी प्रसिद्ध आहेच. राजकीय हाराकिरीसाठी हा छोटा प्रदेश देशात ओळखला जातो. या राज्यात कधी लुईस प्रोत बार्बोझांसारखे सभापती फुटतात; तर कधी रवी नाईक, बाबू कवळेकर आदी विरोधी पक्षनेते फुटतात. आठ ते दहा आमदारांची एकदम घाऊक पक्षांतरे होतात. पक्षांतर बंदी कायद्याच्या चिंधड्या उडविल्या जातात. लुईझिन फालेरो यांच्यासारखा नेता, माजी मुख्यमंत्री चक्क तृणमूल काँग्रेससारख्या गोव्यातील क्षुल्लक पक्षात जातो, राज्यसभा खासदारही होतो आणि मग नाईलाजाने खासदारकीचा राजीनामादेखील देतो. 

गोव्याचे मतदारही सोशिक. ते बाबूश मोन्सेरात किंवा मिकी पाशेको-चर्चिल आलेमाव आदींच्या सर्व कवायती मनसोक्त पाहतात. कसरती करणाऱ्या राजकारण्यांकडून ते स्वतःचे मनोरंजन करून घेतात. आता गोव्यात राजकीय कुरघोडी, शहकाटशहाचे जे राजकारण रंगले आहे, त्यातूनही गोंयकारांची करमणूक होत आहे. कथित पार्टी विथ डिफरन्समध्ये हे घडत आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत व आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातील संघर्ष गेल्या तीन वर्षांपासूनचा आहे. सोमवारी केंद्रातील नेत्यांनी दिल्लीत बैठक घेतली. मुख्यमंत्री सावंत व दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री राणे या दोघांनाही बोलवण्यात आले. वास्तविक प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनादेखील या बैठकीसाठी बोलवायला हवे होते, पण तसे घडले नाही. मुख्यमंत्री सावंत व मंत्री राणे हे दोन्ही वजनदार नेते आहेत. त्यापैकी मुख्यमंत्र्यांकडे साखळी विधानसभा मतदारसंघ आहे आणि ते स्वतः भाजपच्याच केडरमध्ये तयार झालेले हाडाचे कार्यकर्ते आहेत. मंत्री राणे सात-आठ वर्षांपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये आले. त्यांच्याकडे पूर्ण सत्तरी तालुका आहे. विश्वजीतना प्रशासन जास्त चांगले कळते. अधिकाऱ्यांकडून फाइल्स लवकर हातावेगळ्या करून घेण्याची कला त्यांच्याकडे आहे, पण सावंत यांच्यासारखे ते पूर्ण राज्यभर पक्षाचे काम करत फिरत नाहीत, ही भाजपच्या कोअर टीमची खंत आहे. 

सावंत मुख्यमंत्रिपदी असले तरी, राज्यात सातत्याने निर्माण होणारे प्रश्न अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्याचे कसब त्यांना दाखवावे लागेल. सावंत राज्यभर फिरून भाजपचे काम करण्यासाठी खूप कष्ट घेतात; पण प्रशासनाला वेग देणे, भ्रष्टाचार रोखणे, नोकऱ्यांची विक्री रोखणे वगैरे आघाड्यांवर ते कमी पडले. खुद्द भाजपच्या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांसमोर बाबूशसारखा मंत्री आवाज चढवून बोलतो हे गेल्या पंधरवड्यात कोअर टीमने अनुभवले. 

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकऱ्या आपण विकल्या नाहीत, पण आरोप आपल्यावर झाला आणि मुख्यमंत्री आपल्या मदतीला धावून आले नाहीत, ही खंत बाबूशने बैठकीत व्यक्त केली होती. नोकऱ्या हाच या सरकारमध्ये कळीचा मुद्दा आहे. मंत्री विश्वजीत राणे यांनीदेखील हाच विषय दिल्लीत पोहोचवला. कर्मचारी भरती आयोग स्थापन करून नोकर भरतीची सगळी सूत्रे मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे घेतली. त्यामुळे आपण सत्तरीच्या लोकांना जास्त नोकऱ्या देऊ शकत नाही, ही समस्या राणे यांनी दिल्लीत मांडली. अर्थात यावर केंद्रीय नेत्यांनी परवाच्या बैठकीत स्पष्ट तोडगा काढला की नाही, ते कळले नाही. 

सावंत आणि राणे यांच्यात मनोमीलन व्हावे, म्हणून ती बैठक राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली होती. मनोमीलन झाले की नाही, हे भविष्यात कळेलच. विश्वजीत जरी काँग्रेमसमधून आले असले तरी, त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचा विश्वास संपादन केला आहे. विश्वजीत यांना दिल्लीत गृहमंत्री असोत किंवा नड्डा साहेब असोत या सर्वांची भेट लवकर मिळते. काँग्रेसची सरकारे गोव्यात होती, तेव्हाही मुख्यमंत्री व मंत्री यांच्यात संघर्ष रंगायचे. आताही सावंत व राणे यांच्यातील संघर्ष जास्त रंगल्याने केंद्रीय नेत्यांनी दखल घेतली. वादावर तात्पुरती मलमपट्टी केली आहे, पण शहकाटशहाचे राजकारण संपले आहे, असे दिसत नाही. यातून प्रशासनावर परिणाम होतोय, लोकांचे मनोरंजनही होतेय, एवढे मात्र खरे. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत