शहरं
Join us  
Trending Stories
1
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
2
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
3
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
4
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
5
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
6
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
7
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
8
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
9
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
10
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
11
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
12
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
13
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
14
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
15
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...
16
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
17
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
18
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
19
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
20
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 18:37 IST

आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

म्हापसा : मागील ९ महिन्यांपासून आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाचे परिणाम राज्याच्या कारभारावर झाले आहेत. प्रशासन ठप्प झाले आहे. राज्यावर असलेल्या कर्जाची रक्कम वाढत आहे. अशावेळी जनतेचे हित विचारात घेवून मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा पणजीतील आझाद मैदानावर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय बर्डे यांनी दिला आहे. सध्या दिल्लीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे विविध प्रस्तावांवर निर्णयावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांना दिल्लीत जावे लागते. त्यांच्या आजारपणामुळे लोकांकडून विविध कराच्या रुपात जमा झालेल्या पैशांची नाहक उधळपट्टी सुरु आहे. ही उधळपट्टी त्वरित थांबवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येवून उपचार सुरु करावे असाही सल्ला बर्डे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसात राजीनामा सादर न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. बर्डे यांच्या आमरण उपोषणाला पक्षाच्या मान्यतेसंबंधी तसेच विधानसभेतील त्यांच्या एकमेव आमदाराच्या सहकार्यासंबंधी विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या सुचनेवरुन आपण हे विधान करीत असल्याचे ते म्हणाले. आपल्या भूमिकेविषयी पक्षाच्या आमदाराच्या सहकार्याची, प्रदेश राष्ट्रवादीच्या भूमिकेची कसल्याच प्रकारची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यासंबंधी काँग्रेस पक्षाने केलेल्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसजवळ योग्य असे संख्याबळ असल्याने अधिवेशन बोलावल्यास आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकारचा पराभव होईल, या भीतीपोटी अधिवेशन बोलावले जात नसल्याचे त्यातून सिद्ध होत असल्याचे बर्डे म्हणाले. राज्यात काँग्रेस सत्तेवर असताना घेतलेल्या कर्जाचा आकडा ४ ते ५ हजार कोटी रुपयांपर्यंत होता. पण भाजपा सरकारच्या काळात कर्जाची रक्कम १८ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राज्यात विकासासाठी केंद्राकडून ३० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच जनतेवर लागू केलेल्या विविध कराच्या रुपातील महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढण्यामागील कारणावर त्यानी साशंकता व्यक्त केली. फॉर्मेलिनच्या प्रश्नावर त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर सुद्धा टिका केली आहे. मासळीची तपासणी करण्याचे काम विदेशी यंत्रणेला देणे चुकीचे असून यावरुन मंत्र्याला आपल्याला अन्न व औषधी प्रशासनावर विश्वास नसल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात येणारे पर्यटक मासळी खाण्यासाठी येत असल्याने पर्यटन व्यवसायावर सुद्धा परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला.  

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसgoaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर