सीएम व अपॉइन्टमेन्ट

By Admin | Updated: May 7, 2014 18:08 IST2014-05-06T20:44:08+5:302014-05-07T18:08:40+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात.

CM & Appointments | सीएम व अपॉइन्टमेन्ट

सीएम व अपॉइन्टमेन्ट

सीएम व अपॉइन्टमेन्ट
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट मिळावी, त्यांनी भेटीची वेळ द्यावी, आपली समस्या ऐकून घ्यावी म्हणून राज्यातील अनेक लोक आणि विविध संघटना प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकांना भेटीची वेळ मिळत नाही, अशी खंत अनेकजण व्यक्त करताना पहायला मिळतात. पर्रीकर खूप बिझी राहत असल्याने त्यांना प्रत्येकास भेटण्यासाठी वेळ मिळत नसावा. मंगळवारी पणजीत महिला संघटनांची एक बैठक झाली. त्या वेळी तीव्रपणे एक खंत व्यक्त करण्यात आली. आम्ही राज्यातील मद्यालयांच्या वेळांबाबतच्या समस्येविषयी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे भेटीची वेळ मागतोय पण ते वेळच देत नाहीत, असे महिला संघटनांच्या नेत्यांनी बैठकीत सांगितले. पणजीतील तलवार हल्ला प्रकरणी कांपालमधील काही नागरिकांनी कँडल रॅली काढली होती. कांपालमधील उपमहापौर कबिर मखिजा यांच्यासारख्या हायप्रोफाईल व्यक्तींनी मुख्यमंत्र्यांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. त्यांना लगेच भेट दिली गेली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची समस्याही ऐकून घेतली. आम्हाला मात्र सीएम भेटीसाठी वेळ देत नाहीत. मद्यालयांच्या वेळांचा विषय सरकारला गंभीर वाटत नसावा किंवा आम्ही आम आदमी असल्याने आम्हाला भेटीसाठी वेळ दिला जात नसावा, अशी चर्चा महिला कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. सॅबिना मॅडमही सरकारच्या धोरणावर खूप नाराज झाल्या आहेत.

बिच्चारे वादळग्रस्त
सत्तरी व डिचोली तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या काळात मोठे वादळ आले होते, तेव्हा सर्व पक्षाच्या राजकारण्यांनी व काही प्रमुख उमेदवारांनी तिथे धाव घेतली होती. वादळग्रस्तांची समस्या ऐकून घेतली होती. तेथील हानीची पाहणी केली होती. वादळग्रस्तांसाठी आम्ही हे करू आणि ते करू, अशा घोषणा काहीजणांनी केल्या होत्या. मात्र, अजूनही सत्तरीतील अनेक वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. ज्यांची घरे पूर्णत: मोडली त्यांना थोडी मदत मिळाली. मात्र, ज्यांच्या बागायतींची मोठी हानी झाली आहे, त्यांना काहीच अर्थसा‘ मिळालेले नाही. काहीजणांनी कृषी खात्याकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, काहीजणांनी अर्ज केलेले नाहीत. शेतकर्‍यांचे नुकसान मोठे होते; पण सरकार तुटपुंजी मदत देते. ती तुटपुंजी मदतदेखील वेळेत मिळत नाही तेव्हा शेतकरी व बागायतदार हताश होतात. सत्तरी व डिचोलीतील अनेक शेतकरी हताश झाले आहेत. लोकांनी शेतीकडे वळावे, युवकांनी स्वयंरोजगार करावा, असे राजकीय नेते सांगतात तेव्हा त्यांना शेतकर्‍यांचे दु:ख दिसत नाही.

Web Title: CM & Appointments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.