शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात 60 हजार बायो-शौचालये बांधणार : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 18:14 IST

राज्यात सर्वत्र मिळून एकूण 6क् हजार बायो- शौचालये बांधली जाणार आहेत. प्रत्येकाला शौचालय मिळावे म्हणून मुंडकारांशीनिगडी...

पणजी : राज्यात सर्वत्र मिळून एकूण 6क् हजार बायो- शौचालये बांधली जाणार आहेत. प्रत्येकाला शौचालय मिळावे म्हणून मुंडकारांशीनिगडीत कायद्यातही दुरुस्ती केली जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी बुधवारी विधानसभेत जाहीर केले. एकूण 28क् कोटी रुपये खर्चाची शौचालय बांधकाम योजना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रश्नोत्तराच्या तासावेळी काँग्रेसचे आमदार विल्फ्रेड डिसा यांनी याबाबतचा प्रश्न मांडला होता. बायो-शौचालयांच्या कामाची निविदा जारी झाली का अशी विचारणा डिसा यांनी केली होती. सरकारने सव्रेक्षण करून घेतले असून गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडून निविदा जारी केली जाईल. पंचायत व पालिका महामंडळाच्या कंत्रटदारांना सहाय्य करील, असे पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी डिसा यांना सांगितले. 

मुख्यमंत्री र्पीकर यावेळी म्हणाले, की पूर्वी 7क् हजार गोमंतकीयांकडे शौचालये नाहीत असा अंदाज काढला गेला होता. आता सव्रेक्षण पूर्ण झाले असून प्रत्यक्षात 6क् हजार कुटूंबांना शौचालये हवी आहेत हे स्पष्ट झाले आहे. सुलभ शौचालये जी पूर्वी बांधली गेली होती, त्यांचा वापर लोक करत नाहीत. त्यात जळावू लाकडे ठेवण्यासाठी वापर केला जातो. आम्ही आता बायो-शौचालये उपलब्ध करून देणार आहोत. 6क् हजारपैकी 7क् टक्के कुटूंबांकडे स्वत:ची जागा आहे पण शौचालय नाही. फक्त 3क् टक्के लोकांचे मुंडकारविषयक जमिनी व अन्य तत्सम प्रश्न आहेत. शौचालयासाठी भाटकाराची एनओसी आणावी लागणार नाही. सरकार कायद्यात दुरुस्ती करणार आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की येत्या महिन्यात निविदेअंती कंत्रटदार निश्चित केले जातील. पूर्ण राज्यासाठी सात-आठ कंत्रटदार असतील. प्रत्येकी पस्तीस ते पंचेचाळीस हजार रुपये खचरून बायो-शौचालय बांधले जाईल हे शौचालय दहा वर्षे टीकेल. शौचालयात बायो-डायजस्टर असेल. दरुगधी येणार नाही. 

यावेळी पंचायतमंत्री गुदिन्हो म्हणाले, की ग्रामपंचायतींकडून शौचालयाचे काम केले जाणार नाही. पंचायती एकाबाजूने आपल्याला अधिक निधी व अधिक अधिकार द्या अशी मागणी करतात व दुस:याबाजूने 

गोवा मुक्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारकडून मिळालेला विशेष निधीही पंचायती वापरत नाहीत. 2क्11 साली निधी दिला गेला होता. सात वर्षे झाली, अनेक पंचायतींनी त्या निधीचा विनियोगच केला नाही.