शहरं
Join us  
Trending Stories
1
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
2
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
3
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
4
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
5
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
6
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
7
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
8
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
9
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
10
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
11
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
12
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
13
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
14
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
15
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
16
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
17
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
18
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
19
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
20
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?

बळी रोखावेच लागतील; सरकारसमोर अपघात नियंत्रणाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 14:48 IST

एकेकाळी गोव्याच्या एका राज्यपालानेदेखील गोवा हे किलर राज्य बनलेय, अशी टीका केली होती. 

राज्यातील रस्त्यांवर युवकांचे, महिलांचे, लहान मुलांचे बळी जात आहेत. खूपच मोठ्या संख्येने वाहन अपघात सुरू आहेत. सरकारने याविरुद्ध काही तरी करावे, असे सर्व गोमंतकीयांना वाटते. तरुणांचे रक्त रस्त्यावर सांडतेय हे पाहवत नाही, गोवा म्हणजे अपघातांची राजधानी झाली आहे, अशा अर्थाचे विधान परवाच आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. हे विधान वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांना आवडणार नाही. मात्र, एकेकाळी गोव्याच्या एका राज्यपालानेदेखील गोवा हे किलर राज्य बनलेय, अशी टीका केली होती. 

रोज वाहन अपघात होत आहेत आणि आमचे मायबाप सरकार काही करत नाही, अशी जनतेची भावना झाली आहे; पण मुख्यमंत्री सावंत यांनी काल गोमंतकीयांना थोडातरी दिलासा दिला आहे. अपघातांचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केला आहे, असे सावंत यांनी जाहीर केले. आरटीओ आणि सार्वजनिक बांधकाम खाते यांनी रस्ता सुरक्षेसाठी ज्या काही सूचना केल्या आहेत, त्यांची अंमलबजावणी येत्या दोन महिन्यांत केली जाईल, अशीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. खरोखर जर कडक उपाययोजना होणार असतील तर त्यांचे स्वागतच. मात्र, या घोषणा बोलाचाच भात व बोलाचीच कढी ठरू नयेत.

गोवा सरकार विविध सोहळ्यांवर प्रचंड पैसा खर्च करते, मंत्र्यांसाठी अत्यंत उंची, महागड्या गाड्या खरेदी करताना सरकारला काही वाटत नाही, जुवारी पुलाच्या एका लेनचे उदघाटन करायचे झाले तर सरकार दोन कोटी रुपयांचा चुराडा करते. मात्र, कधी कधी मद्यपी चालकांच्या तपासणीसाठी अल्कोमीटर खरेदी करायला सरकारकडे पैसे नसतात. 

रस्त्यांवर स्पीड ब्रेकर रंगवायचे असतील, दिशादर्शक फलक लावायचे असतील, वळण कापून रस्ते नीट करायचे असतील, तर शासनाकडे पैसे नसतात, बांधकाम खात्याचे काही अभियंते व काही वाहतूक पोलिसदेखील मीडियाला खासगीत सांगतात की, आम्ही दिलेल्या सूचना सरकार अमलात आणतच नाही. कारण तिजोरीत निधी नाही. सरकारने आता बहुतांश पैसा अपघाताविरुद्ध उपाय काढण्यासाठी खर्च करायला हवा. युवा-युवतींचा जीव वाचविण्यासाठी पैसा वापरावा लागेल.

चार दिवसांपूर्वीच तिसवाडीतील शिरदोन येथे दोन दुचाकींची टक्कर झाली. बिचारी बावीस वर्षांची संजना सावंत ही युवती मरण पावली. तिच्या कुटुंबावर केवढा मोठा आघात झाला असेल, याची कल्पना करता येते. घरातून सकाळी बाहेर पडणारे युवक सायंकाळी सुरक्षित घरी परततील, याची शाश्वती नाही. बिचारे पालक डोळ्यांत प्राण आणून वाट पाहत असतात. 

काही युवकही एवढ्या बेपर्वाईने वाहन चालवतात की, ते स्वतःच स्वतःचा जीव घेतात. काही कारचालक, ट्रकचालक, बसचालक रात्रीच्यावेळी मद्य ढोसून वाहन हाकतात. रस्त्याच्या बाजूने चालणाऱ्या निष्पाप व्यक्तींनादेखील उडवून जातात, मद्यपी चालकांविरुद्ध सरकारी यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी मोहीम उघडली होती. बाणस्तारी येथे एका अतिश्रीमंत व्यक्तीने अपघात करून तिघांचे जीव घेतल्यानंतर ही मोहीम सुरू झाली होती. दारुड्या चालकांविरुद्धची कारवाई नंतर का थांबली, ते जरा मुख्यमंत्री सावंत यांनी वाहतूक पोलिस विभागाला विचारावे.

सरकारी यंत्रणा एखादा अपघात झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करतात. रस्त्यांवरील खड्डेदेखील न बुजवणारे हे सरकार आहे, असे लोक कंटाळून बोलतात. गेल्या तीन वर्षात गोव्यात एकूण २७१ व्यक्तींचे जीव अपघातांमध्ये गेले. तसेच ८१७ लोक जखमी झाले. यातील काहीजण दिव्यांगही झाले असतील. हात-पाय मोडून घेणारे युवक कमी नाहीत. गोमेकॉ इस्पितळाचे डीन डॉ. बांदेकर एकदा सांगत होते की, रोज बांबोळीच्या इस्पितळात कॅज्युअल्टी विभागात जखमी तरुण येतात. त्यांची अवस्था पाहवत नाही. 

आई-वडीलही मुलांना महाग आणि भरधाव जातील अशा दुचाक्या खरेदी करून देतात. २०२० साली फक्त ६१ व्यक्ती गोव्यात अपघातात ठार झाल्या होत्या, २०२१ साली ही संख्या ८३ झाली आणि २०२२ मध्ये हे प्रमाण १२७ झाले. होय, देशाची अॅक्सिडंट राजधानी होण्यापर्यंत आपण नक्कीच प्रगती केली आहे. नाताळ व नववर्ष साजरे करण्यासाठी लाखोंची गर्दी गोव्यात होईल. तेव्हाही अपघात रोखणे हे आव्हान असेल.

 

टॅग्स :goaगोवाAccidentअपघातState Governmentराज्य सरकार