शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

गोव्याला नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र - रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 22:20 IST

नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र गोव्यात सुरु करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करील, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली.

पणजी : नॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजीचे केंद्र गोव्यात सुरु करण्यासाठी सरकार आवश्यक ती सर्व मदत करील, अशी घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केली. नव्या तंत्रज्ञानामुळे नोक-यांवर गदा येत नाही तर उलट नोक-यांची नवी संधी निर्माण होते, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. 

राज्याचे आयटी धोरण प्रकाशित केल्यानंतर ते बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, राज्याचे आयटीमंत्री रोहन खंवटे, गृहनिर्माणमंत्री जयेश साळगांवकर, मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा, मणिपाल ग्लोबल एज्युकेशन सर्व्हिसेसचे अध्यक्ष मोहनदास पै, एसटीपीआयचे सरसंचालक ओंकार राय, माहिती तंत्रज्ञान सचिव अमेय अभ्यंकर, इंटेलच्या भारतातील प्रमुख श्रीमती निवृती राय, नॅस्कॉमचे सह संस्थापक अशांक देसाई  उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले की,‘आयटी क्षेत्रात आज ४0 लाखांहून अधिक लोक प्रत्यक्ष काम करीत आहेत. तर सव्वा कोटीहून अधिकजणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळालेला आहे. मोबाइल फोन बनविणारे १२0 कारखाने देशात कार्यरत आहेत. देशात केवळ २ मोबाईल कंपन्या होत्या आज त्या १२0 वर पोचल्या.  नव्या तंत्रज्ञानामुळे एक नोकरी गेली तर २0 नव्या नोक-या निर्माण होतात.’ नॅस्कॉमच्या अहवालाचा हवाला देऊन ते पुढे म्हणाले की, ‘कन्वेंशनल आयटी उद्योगांमध्ये ६ लाख रोजगार दरवर्षी निर्माण होतो. नवी डिजिटल इको सिस्टम ब-यापैकी नोक-या निर्माण करील. आज जग भारताकडे या आशेने बघत आहे. २७ शहरांमध्ये ९१ बीपीओ कार्यरत आहे. २0१५ साली ग्रामीण भागांमध्ये बीपीओची योजना आणली. या बीपीओंमध्ये ग्रामीण मुले, मुली काम करतात. आयटी क्रांतीचे नेतृत्त्व करण्याची क्षमता या देशामध्ये आहे.’

ते पुढे म्हणाले की, ‘नोयडा येथे अलीकडेच सॅमसंगच्या विस्तार विभागाचे उदघाटन करण्यात आले तेथे महिन्याला १ कोटी १0 लाख फोन निर्माण होणार आहेत. दरवर्षी २0 कोटी मोबाइल संच विकले जाताते. महसूल १ लाख ३२ हजार कोटींवर पोचला आहे. केवळ मोबाइल इलेक्ट्रॉनिक्सच नव्हे तर डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स यातही देश प्रगती करणार आहे. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांसाठी गोवा हब बनू शकतो.’

‘१९७0 च्या औद्योगिक क्रांतीला आणि नंतर उद्योजक क्रांतीलाही देश मुकला आता डिजिटल क्रांतीला आम्ही मुकायचे नाही. १ लाख ग्रामपंचायती आॅप्टिकल फायबरने जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित पंचायतीसही वर्षअखेरपर्यंत जोडल्या जातील. १२१ कोटी मोबाइल संच आज वापरले जात आहेत.’ आधार कार्डवरील माहिती सुरक्षितच असल्याचा दावा करताना त्याबद्दल कोणी संशय घेण्याचे कारण नसल्याचा दावाही प्रसाद यांनी केला. 

डिसेंबरपर्यंत सर्व व्यवहारांचे डिजिटलायझेशन : पर्रीकर 

येत्या डिसेंबरपर्यंत राज्यातील सर्व व्यवहारांचे डिजिटलायझेशन होईल, असे पर्रीकर यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, ‘सरकारने धनादेश देण्याचे बंद केले आहे. आर्थिक व्यवहार आता आरटीजीएस किंवा अन्य पद्धतीने केले जातात. सर्व पेमेंट आॅनलाइन होतात.’

माहिती तंत्रज्ञानाचे काही दुष्परिणामही आहेत. खोटी माहिती किंवा अफवा पसरविल्या जातात जे समाजासाठी अत्यंत घातक आहे. माहिती तंत्रज्ञान सर्वत्र पोचले आहे. मोबाइल कनेक्टिव्हीटी मानवी आरोग्यासाठी धाकादायक असल्याची माहिती पसरविली जाते आणि लोक त्यांच्या गावात टॉवर्सना विरोध करु लागतात. खोट्या बातम्या अशा पध्दतीने मारक ठरु शकतात हे लोकांनी जाणले पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :goaगोवा