शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

गोवा मुक्ती लढ्यासाठी उद्योगपती व खनिज मालकांनीही मदत केली नाही : सिनारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2017 19:08 IST

गोवा मुक्तीची चळवळ चालू होती त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. निधीहीची खूप चणचण असायची.

पणजी : गोवा मुक्तीची चळवळ चालू होती त्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांना खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. निधीहीची खूप चणचण असायची. गोव्यात त्यावेळीही मोठे व्यापारी, धनिक उद्योगपती आणि खाण व्यवसायिक होते पण त्यांनी गोवा मुक्तीच्या चळवळीवेळी स्वातंत्र्य सैनिकांना मदत केली नाही. ते पोतरुगीजधार्जीणो नव्हते पण भीतीमुळे ते मदतीसाठी आले नाहीत, असा अनुभव ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी प्रभाकर सिनारी यांनी मंगळवारी सांगितला.

गोवा मुक्ती दिनानिमित्त लोकमतच्या येथील कार्यालयात संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सिनारी यांचे आत्मचरित्र नुकतेच इंग्रजी व मराठीत प्रसिद्ध झाले आहे. लोकमतच्या संपादकीय विभागातील कर्मचा:यांशी संवाद साधताना सिनारी यांनी गोवा मुक्ती लढय़ातील अनेक थरारक अनुभव सांगितले. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची गाथा त्यांनी समोर ठेवली. अस्नोडा गावाने गोवा मुक्तीच्या चळवळीत खूप त्याग केला आहे. बाळा मापारी हे मुक्ती लढय़ातील पहिले हुतात्मा आहेत पण मुक्त गोव्याने त्यांची जेवढय़ा प्रमाणात दखल घ्यायला हवी होती, तेवढी ती घेतली नाही अशी खंतही सिनारी यांनी व्यक्त केली. मी वयाच्या पंधराव्या वर्षापासून मुक्तीलढय़ात सक्रिय झालो. विद्यार्थी दशेत एका मोर्चावेळी पोतरुगीज पोलिसांचा अमानुष अत्याचार अनुभवला. मुक्ती लढय़ात सक्रिय झाल्यानंतर मी स्वत: सतरा वर्षे घरी पोहचू शकलो नव्हतो. विश्वनाथ लवंदे, मोहन रानडे, नारायण नाईक वगैरे अनेकांनी एकत्रितपणो पोतरुगीजांविरुद्धच्या सश क्रांतीमध्ये भाग घेतला. हल्ल्यांमध्ये भाग घेतला. रात्रीच्यावेळी आम्हाला केवळ पेज जेवून रहावे लागत होते. काहीवेळा पोतरुगीजांविरुद्ध हल्ल्यांसाठी आम्हाला स्फोटकांची खूप गरज भासायची. त्यावेळी खनिज व्यवसायिक त्यांच्या खाणींवर स्फोटके वापरायचे पण आम्ही मागून देखील आम्हाला त्यांनी कधी ती दिली नाही. अर्थात पोतरुगीज त्रस करतील अशी भीती त्यांना वाटायची असे सिनारी म्हणाले. स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी एकदा स्वातंत्र्य चळवळीसाठी म्हणून पैसे देऊ केले होते पण आम्ही पैसे नको तर तुमच्या वेळगेतील खाणीवरील स्फोटके द्या, अशी विनंती केली होती पण बांदोडकर यांनी स्फोटके देण्याचा धोका पत्करला नाही असे सिनारी यांनी एका प्रश्नास उत्तर देताना सांगितले. गोवा मुक्तीची चळवळ अत्यंत शेवटच्या टप्प्यात आली तेव्हा थोडी मदत धनिकांनी केली असेल असेही ते म्हणाले.

मुक्तीनंतर गोव्यातील आणि देशातीलही कुठच्याच भागातील स्वातंत्र्य सैनिकांनी स्वत:साठी पेन्शन योजनेची मागणी केली नव्हती. स्व. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी देशाच्या काही भागांमध्ये स्वातंत्र्यसैनिक मुक्तीनंतरही भोगत असलेल्या हालअपेष्टा पाहिल्या व दरमहा शंभर रुपये अशा पद्धतीने त्यांनी पेन्शन योजना सुरू केली. गोव्यातही त्यानंतर ही योजना सुरू झाली, असे सिनारी यांनी सांगितले. गोव्यात एखादे स्मारक किंवा संग्रहालय तयार व्हायला हवे. नव्या पिढीला त्यातून गोवा मुक्ती लढय़ाचा सगळा इतिहास कळून येईल. आग्वाद तुरुंग किंवा अन्य कुठेही ते करता येईल. मी आत्मचरित्र लिहिताना तडजोड केली नाही. ते प्रमाणिकपणो लिहिले व स्पष्ट आणि सत्य लिहिल्यामुळे कदाचित काहीजणांची मने दुखावलेली असतील तर त्याबाबत मी माफी देखील मागतो, असे सिनारी म्हणाले. गोवा मुक्तीनंतर मी पोलिस उपाधीक्षक म्हणून सेवेत रुजू झालो. मुक्तीनंतर झालेल्या निवडणुकीत अनेक स्वातंत्र्यसैनिक उतरले तरी, माझा काही त्या निवडणुकीशी संबंध आला नाही, असे सिनारी यांनी सांगितले. मी विद्यार्थी दशेत हायस्कुलमध्ये असताना माङया शिक्षकाला पोतरुगीजांनी प्रचंड मारहाण केली. त्या दिवशी 19 जून होता. मी त्याच दिवशी पोतरुगीजांविरुद्ध कायम लढण्याचा निर्धार केला. सातारा व अन्य भागांतील क्रांतीकारकांची आम्हाला खूप मदत झाली, असे सिनारी यांनी सांगितले.