शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

बुडालेल्या चारही जणांचे मृतदेह सापडले

By admin | Updated: May 31, 2014 01:37 IST

दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले.

 दोडामार्ग : परमे येथे तिळारी नदीपात्रात बुडालेल्या एकाच कुटुंंबातील चौघाही भावंडांचे मृतदेह शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थांनी नदीपात्रातून बाहेर काढले. मृतदेह शोधण्याचे काम सकाळी ६ वाजल्यापासूनच हाती घेण्यात आले होते. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर ग्रामस्थांच्या शोधकार्यास यश आले. गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास परमे येथे तिळारी नदीपात्रात हत्तीचा गुंडा या ठिकाणी अर्जुन वासुदेव आरोसकर हे आपला मुलगा अक्षय आरोसकर (१७), आकाश आरोसकर (१८), मुलगी अरुणा आरोसकर (२१), भाचा अंकित अंकुश गवस (१८) व भाची अक्षता अंकुश गवस (१५) यांना घेऊन आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ केल्यानंतर नदीपात्रातून बाहेर पडत असतानाच अरुणा हिचा पाय घसरल्याने ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागली. तिला वाचविण्याच्या प्रयत्नात अक्षय, आकाश, अंकित व अक्षता यांनीही पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने आणि यातील कोणालाच पोहता येत नसल्याने पाचही भावंडे वाहून गेली. या वेळी अर्जुन आरोसकर यांनी लाकडी बांबू नदीत टाकून भाचीला वाचविले; परंतु तोपर्यंत इतर चारही जण पाण्यात बुडाली होती. सायंकाळच्या वेळी ही घटना घडल्याने काळोखामुळे त्यांचा शोध घेणे शक्य नव्हते. त्यामुळे शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच नदीपात्रात शोधकार्यास सुरुवात करण्यात आली. शोधकार्यात मनसेचे उपतालुकाध्यक्ष मायकल लोबो, साटेली-भेडशीचे माजी उपसरपंच संजय धर्णे, नागेश मयेकर, परमे येथील कांता नाईक व इतरांनी सहभाग घेतला. चार तासांच्या अथक परिश्रमानंतर १० वाजण्याच्या सुमारास अक्षय व आकाश आरोसकर आणि अंकित गवस यांचे मृतदेह हाती लागले. त्यानंतर तासाभराने अरुणाचा मृतदेह सापडला. (प्रतिनिधी)