शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

रानडे यांच्या पार्थिवावर गोव्याच्या मंत्र्यांकडून पुष्पांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 19:54 IST

रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पणजी : गोवा मुक्ती संग्रामात फार मोठी कामगिरी बजावलेले आणि पोतरुगीजांविरुद्ध सश लढय़ाचा मार्ग पत्करत त्यासाठी चौदा वर्षे तुरुंगवास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे मंगळवारी पुणो येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 9क् वर्षाचे होते. रानडे यांच्या योगदानाची जागतिक इतिहासानेही यापूर्वी नोंद घेतलेली आहे.

रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रानडे यांची प्राणज्योत मालवली. गेली बरीच वर्षे रानडे सातत्याने गोव्यात यायचे. गोव्यात त्यांचे अनेक मित्र व चाहते होते. रानडे हे मूळचे महाराष्ट्रातील सांगलीमधील असले तरी, त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत योगदान देण्याचा निर्धार केला व पोतरुगीजांचा अत्याचारही सहन केला. वीर सावरकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. गोवा मुक्ती संग्रामाच्या काळात 1955 साली रानडे यांना पोतरुगीज पोलिसांनी अटक करून लिस्बनच्या तुरुंगात ठेवले होते. गोवा जरी 1961 साली मुक्त झाला तरी, रानडे यांची तुरुंगातून मुक्तता होण्यास 1969 साल उजाडावे लागले. 

रानडे यांचे योगदान गोवा कधीच विसरणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्र्यांनी रानडे यांना श्रद्धांजली वाहिली. 2क्क्1 साली रानडे यांना पद्मी जाहीर करण्यात आली. गोव्याचे नगर विकास मंत्री मिलिंद नाईक व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी मंगळवारी पुणो येथे भेट दिली. तिथे रानडे यांच्या पार्थिवाचे त्यांनी अंत्यदर्शन घेतले. वैकुंठ स्मशानभूमी, पुणो येथे त्यांनी रानडे यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहिली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार प्रदीप रावत, अॅड. दादा बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. 

जागतिक इतिहासात नोंद जुलमी पोतरुगीज सत्तेविरुद्ध रानडे यांनी सश लढा दिला. त्यांची नोंद जागतिक इतिहासात झालेली आहे. दीर्घकाळ कोठडीत कारावास भोगलेल्या क्रांतिकारकांच्या मांदियाळीत त्यांचे नाव कोरले गेले आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी श्रद्धांजली वाहिली. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी नव तरुणांना त्यांचे त्यागमय जीवन स्फुर्ती देत राहील, असे खलप यांनी म्हटले आहे.

प्रेरणादायी जीवन : लेलेरानडे यांच्या निधनाची बातमी खूपच वाईट आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान खूप आहे. गोव्यात त्यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले आहे व त्या माध्यमातून अनेकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास प्रेरणा दिली. त्यांचे जीवन माङयासारख्यांना सतत प्रेरणादायी राहीले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नाकर लेले म्हणाले.