शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

रानडे यांच्या पार्थिवावर गोव्याच्या मंत्र्यांकडून पुष्पांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 19:54 IST

रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पणजी : गोवा मुक्ती संग्रामात फार मोठी कामगिरी बजावलेले आणि पोतरुगीजांविरुद्ध सश लढय़ाचा मार्ग पत्करत त्यासाठी चौदा वर्षे तुरुंगवास भोगलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी पद्मश्री मोहन रानडे यांचे मंगळवारी पुणो येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 9क् वर्षाचे होते. रानडे यांच्या योगदानाची जागतिक इतिहासानेही यापूर्वी नोंद घेतलेली आहे.

रानडे अलिकडे आजारी असायचे. पुणे येथील इस्पितळात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही वर्षापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास रानडे यांची प्राणज्योत मालवली. गेली बरीच वर्षे रानडे सातत्याने गोव्यात यायचे. गोव्यात त्यांचे अनेक मित्र व चाहते होते. रानडे हे मूळचे महाराष्ट्रातील सांगलीमधील असले तरी, त्यांनी गोवा मुक्ती चळवळीत योगदान देण्याचा निर्धार केला व पोतरुगीजांचा अत्याचारही सहन केला. वीर सावरकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. गोवा मुक्ती संग्रामाच्या काळात 1955 साली रानडे यांना पोतरुगीज पोलिसांनी अटक करून लिस्बनच्या तुरुंगात ठेवले होते. गोवा जरी 1961 साली मुक्त झाला तरी, रानडे यांची तुरुंगातून मुक्तता होण्यास 1969 साल उजाडावे लागले. 

रानडे यांचे योगदान गोवा कधीच विसरणार नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मंत्र्यांनी रानडे यांना श्रद्धांजली वाहिली. 2क्क्1 साली रानडे यांना पद्मी जाहीर करण्यात आली. गोव्याचे नगर विकास मंत्री मिलिंद नाईक व माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी मंगळवारी पुणो येथे भेट दिली. तिथे रानडे यांच्या पार्थिवाचे त्यांनी अंत्यदर्शन घेतले. वैकुंठ स्मशानभूमी, पुणो येथे त्यांनी रानडे यांच्या पार्थिवावर पुष्पांजली वाहिली. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, माजी खासदार प्रदीप रावत, अॅड. दादा बोंद्रे आदी यावेळी उपस्थित होते. 

जागतिक इतिहासात नोंद जुलमी पोतरुगीज सत्तेविरुद्ध रानडे यांनी सश लढा दिला. त्यांची नोंद जागतिक इतिहासात झालेली आहे. दीर्घकाळ कोठडीत कारावास भोगलेल्या क्रांतिकारकांच्या मांदियाळीत त्यांचे नाव कोरले गेले आहे, अशा शब्दांत माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप यांनी श्रद्धांजली वाहिली. भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी नव तरुणांना त्यांचे त्यागमय जीवन स्फुर्ती देत राहील, असे खलप यांनी म्हटले आहे.

प्रेरणादायी जीवन : लेलेरानडे यांच्या निधनाची बातमी खूपच वाईट आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचे योगदान खूप आहे. गोव्यात त्यांनी ज्ञानदानाचेही कार्य केले आहे व त्या माध्यमातून अनेकांना स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यास प्रेरणा दिली. त्यांचे जीवन माङयासारख्यांना सतत प्रेरणादायी राहीले, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रत्नाकर लेले म्हणाले.