शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:19 IST

भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारींचे मोठे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन करुन येत्या दहा वर्षात केरळ, तामीळनाडूतही भाजप सत्ता स्थापन करील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. अटल स्मृती संमेलनात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंगर कामत, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, माजी महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सुभाष साळकर, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अटलर्जीनी राष्ट्र प्रथम भावनेने समर्पितपणे काम केले. रा. स्व. संघ, जनसंघ व भाजपच्या कामात स्वतःला वाहून घेतले. श्रीपाद नाईक म्हणाले की, की अटलजींचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेचे राजकारण केले ठराविक वर्गाचेच तुष्टीकरण केले. त्याचे परिणाम आजही देशाला भोगवे लागत आहेत. 

अटलजींच्या काळात काम केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रामराव देसाई हेही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शेवटी म्हणाले की, अटलजींच्या काळात काम केलेल्या सर्वांपर्यंत पोचणे कदाचीत शक्य झाले नसेल. कोणी चुकून राहिले असतील तर त्यांना अटलजींची फोटो फ्रेम पाठवून दिली जाईल.' संमेललनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण