शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 12:20 IST

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत.

पणजी - 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत. यापुढे लोकसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिलिंद नाईक यांना मंत्रिपद देणे व सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून फोडून स्वत:कडे वळविणे हा याच योजनेचा भाग आहे, असे मानले जात आहे. मात्र आयाराम-गयाराम राजकारण हे अशाच मतदारांमधील अनेकांना मान्य नाही व भाजपाचेही माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री त्यावर टीका करत असल्याने भाजपासाठी वाट निसरडी बनली आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने भंडारी समाजातील एकूण 10 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नऊजण पराभूत झाले. या उलट काँग्रेसच्या तिकीटावर बहुजन समाजातील जास्त उमेदवार निवडून आले. एसटी समाजातील जास्त नेते भाजपकडे नसले तरी, अनुसूचित जमातीतील (एसटी) मतदारांना भाजपाने गृहित धरलेले आहे. एसटींची लोकसंख्या गोव्यात 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भंडारी समाजातील अधिकाधिक मते स्वत:कडे वळली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवेळी धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना भाजपाला आहे. अगोदरच खनिज खाणी बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेला सांगे, डिचोली, सत्तरी, केपे या चार तालुक्यांमधील हिंदू बहुजन समाजत अस्वस्थ आहे. खाण बंदीबाबत बरेच लोक मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही अप्रत्यक्षरित्या दोष देत आहेत. भाजपाने प्रथम मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिले व आता भंडारी समाजातीलच सुभाष शिरोडकर सोपटे यांना आपल्याबाजूने घेऊन भाजपाने शिरोडा व मांद्रे मतदारसंघातील बहुजन व्होट बँकेवर दावा सांगितला आहे. मात्र काँग्रेसचे दोन आमदार फोडणे व त्यांना भाजपामध्ये प्रवेश देणे हे लोकांच्या पचनी पडलेले नाही. जे कट्टर भाजपा समर्थक आहेत, त्यांच्याकडूनच या फुटीचे समर्थन केले जात आहे.  खुद्द ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नव्या फुटीच्या विषयावरून भाजपाच्या नेतृत्वावर टीका केली आहे तर माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी फुटीच्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश चोडणकर हे भंडारी समाजातीलच नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक आपल्याकडे ओढण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालविले आहेत. श्रीपाद नाईक यांना आता पक्षात थोडे तरी महत्त्व दिले जात आहे. मात्र भाजपा स्वत:च्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होईल काय हे आगामी काळातच कळून येईल. श्रीपाद नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली तर, भाजपाला ते जास्त उपयुक्त ठरेल अशी भाषा पक्षातील एक गट करत आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर