शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भाजपाकडून हिंदू बहुजन व्होटबँक आकर्षित करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 12:20 IST

2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत.

पणजी - 2017 च्या विधानसभा निवडणुकीवेळी गोव्यातील हिंदू बहुजन समाजाने भाजपाला मते दिली नाहीत. यापुढे लोकसभा निवडणुका होणार असल्याने लोकसभेच्या दोन्ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक स्वत:कडे आकर्षित करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मिलिंद नाईक यांना मंत्रिपद देणे व सुभाष शिरोडकर, दयानंद सोपटे यांना काँग्रेसमधून फोडून स्वत:कडे वळविणे हा याच योजनेचा भाग आहे, असे मानले जात आहे. मात्र आयाराम-गयाराम राजकारण हे अशाच मतदारांमधील अनेकांना मान्य नाही व भाजपाचेही माजी मंत्री, माजी मुख्यमंत्री त्यावर टीका करत असल्याने भाजपासाठी वाट निसरडी बनली आहे.

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने भंडारी समाजातील एकूण 10 उमेदवार उभे केले होते. त्यापैकी नऊजण पराभूत झाले. या उलट काँग्रेसच्या तिकीटावर बहुजन समाजातील जास्त उमेदवार निवडून आले. एसटी समाजातील जास्त नेते भाजपकडे नसले तरी, अनुसूचित जमातीतील (एसटी) मतदारांना भाजपाने गृहित धरलेले आहे. एसटींची लोकसंख्या गोव्यात 12 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. भंडारी समाजातील अधिकाधिक मते स्वत:कडे वळली नाही तर, येत्या लोकसभा निवडणुकीवेळी धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना भाजपाला आहे. अगोदरच खनिज खाणी बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेला सांगे, डिचोली, सत्तरी, केपे या चार तालुक्यांमधील हिंदू बहुजन समाजत अस्वस्थ आहे. खाण बंदीबाबत बरेच लोक मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही अप्रत्यक्षरित्या दोष देत आहेत. भाजपाने प्रथम मिलिंद नाईक यांना मंत्रिपद दिले व आता भंडारी समाजातीलच सुभाष शिरोडकर सोपटे यांना आपल्याबाजूने घेऊन भाजपाने शिरोडा व मांद्रे मतदारसंघातील बहुजन व्होट बँकेवर दावा सांगितला आहे. मात्र काँग्रेसचे दोन आमदार फोडणे व त्यांना भाजपामध्ये प्रवेश देणे हे लोकांच्या पचनी पडलेले नाही. जे कट्टर भाजपा समर्थक आहेत, त्यांच्याकडूनच या फुटीचे समर्थन केले जात आहे.  खुद्द ज्येष्ठ भाजपा नेते तथा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नव्या फुटीच्या विषयावरून भाजपाच्या नेतृत्वावर टीका केली आहे तर माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी फुटीच्या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

गिरीश चोडणकर हे भंडारी समाजातीलच नेते काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी आल्यापासून भाजपाने हिंदू बहुजन व्होट बँक आपल्याकडे ओढण्यासाठी सर्व ते प्रयत्न चालविले आहेत. श्रीपाद नाईक यांना आता पक्षात थोडे तरी महत्त्व दिले जात आहे. मात्र भाजपा स्वत:च्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होईल काय हे आगामी काळातच कळून येईल. श्रीपाद नाईक यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची धुरा सोपवली तर, भाजपाला ते जास्त उपयुक्त ठरेल अशी भाषा पक्षातील एक गट करत आहे.

टॅग्स :BJPभाजपाgoaगोवाPoliticsराजकारणManohar Parrikarमनोहर पर्रीकर