शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:39 IST

पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात भाजप वाढविण्यात कार्यकर्त्यांचाच मोठा हात आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत हेच कार्यकर्ते राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते भाजप मिळवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बुधवारी पणजीत उत्तर गोवा भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रोहन खंवटे, आमदार, डिलायला लोबो, जेनिफर मोन्सेरात व इतर भाजपचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते हेच भाजपचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. '२७ पार'ची घोषणा आपणाला सत्यात आणायची आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. हे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याणावर चालत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने सर्व क्षेत्रांत विकास केला आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यासाठी सर्व पंचायतीमध्ये स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे कार्यकर्त्यांचे आहे. सरकारने केलेल्या कामाची आठवण लोकांना करून द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही: दामू

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजप पक्षाने २०२७ विधानसभा निवडणुकीमध्ये ४० मतदारसंघ लढवून मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आता सर्व भाजप कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. भाजप जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही. म्हणून भाजपचे सर्वांत जास्त कार्यकर्ते राज्यात आहेत, असेही नाईक म्हणाले.

विधानसभेला २७ पेक्षा जास्त जागा मिळवू

मुख्यमंत्री म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीत ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते आणि २७पेक्षा जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. याच कार्यकर्त्यांनी आमच्या सरकारी योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात. तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून पुढच्या निवडणुकीच्या कामाची तयारी केली तर पुढील निवडणुकीत भाजपचे ध्येय साकारणे सोपे होईल. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत