शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:39 IST

पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात भाजप वाढविण्यात कार्यकर्त्यांचाच मोठा हात आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत हेच कार्यकर्ते राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते भाजप मिळवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बुधवारी पणजीत उत्तर गोवा भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रोहन खंवटे, आमदार, डिलायला लोबो, जेनिफर मोन्सेरात व इतर भाजपचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते हेच भाजपचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. '२७ पार'ची घोषणा आपणाला सत्यात आणायची आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. हे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याणावर चालत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने सर्व क्षेत्रांत विकास केला आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यासाठी सर्व पंचायतीमध्ये स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे कार्यकर्त्यांचे आहे. सरकारने केलेल्या कामाची आठवण लोकांना करून द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही: दामू

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजप पक्षाने २०२७ विधानसभा निवडणुकीमध्ये ४० मतदारसंघ लढवून मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आता सर्व भाजप कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. भाजप जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही. म्हणून भाजपचे सर्वांत जास्त कार्यकर्ते राज्यात आहेत, असेही नाईक म्हणाले.

विधानसभेला २७ पेक्षा जास्त जागा मिळवू

मुख्यमंत्री म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीत ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते आणि २७पेक्षा जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. याच कार्यकर्त्यांनी आमच्या सरकारी योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात. तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून पुढच्या निवडणुकीच्या कामाची तयारी केली तर पुढील निवडणुकीत भाजपचे ध्येय साकारणे सोपे होईल. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत