शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:39 IST

पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात भाजप वाढविण्यात कार्यकर्त्यांचाच मोठा हात आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत हेच कार्यकर्ते राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते भाजप मिळवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

बुधवारी पणजीत उत्तर गोवा भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रोहन खंवटे, आमदार, डिलायला लोबो, जेनिफर मोन्सेरात व इतर भाजपचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते हेच भाजपचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. '२७ पार'ची घोषणा आपणाला सत्यात आणायची आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले.

भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. हे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याणावर चालत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने सर्व क्षेत्रांत विकास केला आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यासाठी सर्व पंचायतीमध्ये स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे कार्यकर्त्यांचे आहे. सरकारने केलेल्या कामाची आठवण लोकांना करून द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही: दामू

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजप पक्षाने २०२७ विधानसभा निवडणुकीमध्ये ४० मतदारसंघ लढवून मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आता सर्व भाजप कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. भाजप जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही. म्हणून भाजपचे सर्वांत जास्त कार्यकर्ते राज्यात आहेत, असेही नाईक म्हणाले.

विधानसभेला २७ पेक्षा जास्त जागा मिळवू

मुख्यमंत्री म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीत ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते आणि २७पेक्षा जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. याच कार्यकर्त्यांनी आमच्या सरकारी योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात. तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून पुढच्या निवडणुकीच्या कामाची तयारी केली तर पुढील निवडणुकीत भाजपचे ध्येय साकारणे सोपे होईल. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारणPramod Sawantप्रमोद सावंत